शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

अनधिकृत धार्मिक स्थळे; महापालिकेपुढे पेच

By admin | Updated: June 23, 2016 00:03 IST

चार महिने शिल्लक : २८४ धार्मिक स्थळे रडारवर

नाशिक : महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात सन २००९ नंतरची अनधिकृत आढळून आलेली २८४ धार्मिक स्थळे २७ आॅक्टोबर २०१६ पर्यंत हटविण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असल्याने मनपा प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. अवघ्या चार महिन्यांत करावयाच्या कारवाईबाबत प्रशासनात सध्या खल सुरू असून, पोलीस आयुक्तांकडे लवकरच अहवाल पाठविला जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासनाने अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत २०११ मध्ये महापालिकांना कारवाईचे आदेश काढले होते. मात्र, कारवाईला झालेल्या विलंबामुळे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल होऊन न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यासाठी २१ आॅक्टोबर २०१५ पासून दोन वर्षे इतका कालबद्ध कार्यक्रम आखून दिलेला आहे. त्यानुसार, महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी शहरातील १२ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण केले होते. सर्वेक्षणात महापालिका हद्दीत सन २००९ पूर्वीची १०६४, तर सन २००९ नंतरची २८४ अनधिकृत धार्मिक स्थळे आढळून आली होती. त्यात सन २००९ नंतर उभी राहिलेली २८४ धार्मिक स्थळे शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीनुसार २७ आॅक्टोबर २०१६ पर्यंत हटविण्याची कारवाई महापालिकेला करायची आहे. तर २९ सप्टेंबर २००९ पूर्वीच्या १०६४ अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत नियमितीकरण, स्थलांतरण अन्यथा निष्कासन या तीन पातळ्यांवर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यातील जी बांधकामे रस्त्यात अडथळा ठरणार नसतील आणि कागदोपत्री काही पुरावे असतील तर नियमित करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी २७ एप्रिल २०१६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. जी बांधकामे स्थलांतरित करणे शक्य आहे त्यासाठी २७ जुलै २०१६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यातील नियमितीकरण आणि स्थलांतरितही होऊ न शकणारी बांधकामे मात्र २७ आॅक्टोबर २०१७ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत हटविली जाणार आहेत. दरम्यान, महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत हरकती मागविल्या असता ६३ हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यावर सुनावणी होऊन अतिक्रमण विभागाने अहवाल आयुक्तांकडे रवाना केला असून, लवकरच सदर अहवाल पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्त यांच्या समितीपुढे तो सादर केला जाणार आहे. २८४ धार्मिक स्थळे कोणत्याही परिस्थितीत आॅक्टोबरपूर्वी हटविण्याची कार्यवाही मनपाला करावी लागणार आहे. त्यातच पावसाळा सुरू झाल्याने आणि मनपाकडून इतरही प्राप्त तक्रारींनुसार अनधिकृत बांधकामे हटविण्याची कार्यवाही सुरू असल्याने संवेदनशील मानल्या जाणाऱ्या धार्मिक स्थळांबाबत मनपा प्रशासनाने सावध पवित्रा घेतला आहे. (प्रतिनिधी)