शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

पाण्यासाठी लाक्षणिक उपोषण

By admin | Updated: June 21, 2016 00:07 IST

सटाणा : नदीजोड प्रकल्पात उत्तर महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातकडे नेण्यास विरोध

 सटाणा : नदीजोड प्रकल्पाच्या नावाखाली उत्तर महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातकडे पळविण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर प्रसंगी रक्त सांडू पण आमचे हक्काचे पाणी जाऊ दिले जाणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे माजी प्रांतिक अध्यक्ष रामचंद्रबापू पाटील यांनी दिला.नदीजोड प्रकल्पाच्या नावाखाली उत्तर महाराष्ट्राचे हक्काचे पाणी पळविणे बंद करा व मांजरपाडा-२ चे काम तत्काळ सुरू करा, या मागणीसाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयासमोर रामचंद्रबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात आले. मुळातच तापी खोरे हे त्रुटीचे खोरे आहे. त्यासाठी पाणी उपलब्ध करणे आवश्यक आहे. पाणी उपलब्ध करण्यासाठी पश्चिमेकडून अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी वळण योजनांद्वारे गिरणा, गोदावरी खोऱ्यात टाकणे गरजेचे असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी नदीजोड प्रकल्पाच्या नावाखाली हे पाणी गुजरातकडे पळवून नेण्याचा घाट घालत असल्याची टीका उपोषणकर्त्यांनी केली आहे. तसेच मांजरपाडा-२ च्या कामाला अद्यापही मुहूर्त सापडत नाही. राज्यकर्त्यांनी उदासीनता झटकून या प्रकल्पाचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी केली आहे. सायंकाळी तहसीलदार सुनील सौंदाणे यांना उपोषणकर्त्यांनी आपल्या मागणीचे निवेदन सादर केले, त्याप्रसंगी रामचंद्रबापू पाटील यांनी उपरोक्त इशारा दिला. लाक्षणिक उपोषणात के. एन. अहिरे, दिनकर जाधव, मविप्रचे संचालक डॉ. तुषार शेवाळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय भामरे, यशवंत अहिरे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे, तालुकाध्यक्ष सुभाष नंदन, शरद शेवाळे, संजय चव्हाण, धर्मराज खैरनार, जिल्हा परिषद सदस्य शैलेश सूर्यवंशी, प्रकाश निकम, अनिल चव्हाण, भिकानाना सोनवणे, विजय वाघ, काका रौंदळ, संजय देवरे, शक्ती दळवी, ज. ल. पाटील, कुबेर जाधव, संजय पवार, सुभाष अहिरे, अतुल पवार, नितीन भामरे, मनोहर देवरे, उदय अहेर, बळीराम जाधव आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर)