शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

औद्योगिक क्षेत्रात वृक्षतोडीचे प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:10 IST

नाशिक: गेल्या तीन दिवसांपासून शहरात लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरण बंद आहे. त्यामुळे ज्यांचा दुसरा डोस आहे अशा नागरिकांना ...

नाशिक: गेल्या तीन दिवसांपासून शहरात लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरण बंद आहे. त्यामुळे ज्यांचा दुसरा डोस आहे अशा नागरिकांना तीन ते चार दिवसांना विलंब झाला आहे. आणखी किती दिवस विलंब होणार या बाबतचीही चिंता आहे. त्यामुळे किती दिवस विलंबाने लस घेतली जाऊ शकते, याबाबतची विचारणा केंद्रांवर होताना दिसत आहे.

रेल्वे प्रवासी संघटनेचे निवेदन

नाशिकरोड : मध्य रेल्वेच्या गाड्यांना सर्वसाधारण तिकीट व मासिक पास सुरू करावे, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकाचे प्रबंधक आर. के. कुठार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पासेस नसल्यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे.

संचारबंदीतही रस्त्यांवरील गर्दी कायम

नाशिक:शहरातील वाढती रुग्ण संख्या आणि संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे जिल्ह्यातील निर्बंध कठोर करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र बाजारपेठेतील गर्दी कमी होताना दिसत नाही. दुपारी ४ वाजेनंतर संचारबंदी व जमावबंदीचा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा आदेश कायम असतानाही शहरातील विविध भागात संचारबंदीतही नागरिकांचा मुक्त संचार कायम आहे.

मध्य रेल्वेच्या गाड्या सुरू

नाशिकरोड : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष गाड्यांचा विस्तार केला आहे. या गाड्यांमध्ये मुंबई-एलटीटी-गोरखपूर गाडी दररोज धावणार असून, एलटीटी-छपरा गाडी ८ जुलैपासून दर गुरुवारी धावणार आहे. जुलैच्या पहिल्या तारखेपासूनच गाड्यांच्या संख्येत वाढ होणार असल्याने उत्तर भारतीय प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

रिक्षा, टॅक्सी पासिंगला अडचणी

नाशिकरोड : दीड-दोन वर्षांपासून रिक्षा, काळी-पिवळी टॅक्सी आदी वाहन व्यावसायिकांना फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगारही गेला असून उपासमारीची वेळ आली. त्यामुळे रिक्षा, काळी-पिवळी टॅक्सी या वाहनांचे पासिंग कोरोनामुळे दोन वर्षे वाढवून द्यावे, अशी मागणी होऊ लागली आहे.