शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय स्वार्थातून मंत्र्यांचे चरित्रहन करण्याचे प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:13 IST

नाशिक : अलीकडे राजकीय नेत्यांची कोंडी करण्याचा, त्यांचे चरित्रहनन करून राजकीय बळी करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा प्रकारांमुळे ...

नाशिक : अलीकडे राजकीय नेत्यांची कोंडी करण्याचा, त्यांचे चरित्रहनन करून राजकीय बळी करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा प्रकारांमुळे तरी आपल्याला यश मिळेल, असे अनेकांना वाटते, असे सांगून खासदार संजय राऊत यांनी भाजपावर अप्रत्यक्ष आरोप केला. वनमंत्री संजय राठोड यांच्यावरील आरोपाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. चौकशीअंती सत्य समोर येईल, असेही राऊत म्हणाले.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या नूतनीकरणाच्या उद‌्घाटन प्रसंगी राऊत पत्रकारांशी बोलत होते. राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावरील आरोपाविषयी विचारले असता, राऊत यांनी सत्य हे सत्य असल्याचे सांगून चौकशीअंती सर्व समोर येईल असे सांगितले. मध्यंतरी धनंजय मुंडे यांच्याबाबत असाच प्रयत्न करण्यात आल्यानंतर संबधित महिलेने तक्रार मागे घेतली आहे. राठोडप्रकरणी चौकशी केली जात असल्याचे राऊत म्हणाले.

राठोड हे विदर्भातील मोठे नेते आहेत, पक्षाचे मोठा आधार असलेले नेते असून, समाजाचे मोठे पाठबळ त्यांना आहे. त्यांच्याविषयी काेण काय मागणी करतो, याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नसल्याचे राऊत म्हणाले, तर आमदार नीलेश राणे यांनी राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यास महत्त्व देण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले.

आंदोलकांना आंदोलनजीवी म्हणणे चुकीचे असल्याचेही राऊत म्हणाले, लोकशाहीत आंदोलन करणे हा नागरिकांना अधिकार असल्याचे राज्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे. आज भाजप सत्तेत आहे, उद्या सत्ता गेली, तर त्यांनाही अनेकदा आंदोलने करावी लागतील. आंदोलने करूनच भाजप सत्तेपर्यंत पोहोचले आहे. आंदोलने कुणी थांबवू शकत नाही. भाजपची आंदोलनाची व्याख्या बदलली असेल, तर ते त्यांचे ढोंग आहे, अशी टीका राऊत यांनी केली. आंदोलकांचा आवाज तुम्ही का ऐकत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

--इन्फो--

भाजपशी राजकीय मतभेद

राजकारणात कुणीच कुणाचे कायमचे शत्रू असत नाही. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आहे. भाजपशी आमचे राजकीय मतभेद आहेत, राजकीय शत्रुत्व नाही. त्यांचा सामना आम्ही विचारातून, निवडणुकीतून करू. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची परंपरा लाभली आहे. ही परंपरा सुसंस्कृत आणि संस्कृतीची आहे, असेही राऊत म्हणाले.