शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय स्वार्थातून मंत्र्यांचे चरित्रहन करण्याचे प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:13 IST

नाशिक : अलीकडे राजकीय नेत्यांची कोंडी करण्याचा, त्यांचे चरित्रहनन करून राजकीय बळी करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा प्रकारांमुळे ...

नाशिक : अलीकडे राजकीय नेत्यांची कोंडी करण्याचा, त्यांचे चरित्रहनन करून राजकीय बळी करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा प्रकारांमुळे तरी आपल्याला यश मिळेल, असे अनेकांना वाटते, असे सांगून खासदार संजय राऊत यांनी भाजपावर अप्रत्यक्ष आरोप केला. वनमंत्री संजय राठोड यांच्यावरील आरोपाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. चौकशीअंती सत्य समोर येईल, असेही राऊत म्हणाले.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या नूतनीकरणाच्या उद‌्घाटन प्रसंगी राऊत पत्रकारांशी बोलत होते. राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावरील आरोपाविषयी विचारले असता, राऊत यांनी सत्य हे सत्य असल्याचे सांगून चौकशीअंती सर्व समोर येईल असे सांगितले. मध्यंतरी धनंजय मुंडे यांच्याबाबत असाच प्रयत्न करण्यात आल्यानंतर संबधित महिलेने तक्रार मागे घेतली आहे. राठोडप्रकरणी चौकशी केली जात असल्याचे राऊत म्हणाले.

राठोड हे विदर्भातील मोठे नेते आहेत, पक्षाचे मोठा आधार असलेले नेते असून, समाजाचे मोठे पाठबळ त्यांना आहे. त्यांच्याविषयी काेण काय मागणी करतो, याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नसल्याचे राऊत म्हणाले, तर आमदार नीलेश राणे यांनी राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यास महत्त्व देण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले.

आंदोलकांना आंदोलनजीवी म्हणणे चुकीचे असल्याचेही राऊत म्हणाले, लोकशाहीत आंदोलन करणे हा नागरिकांना अधिकार असल्याचे राज्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे. आज भाजप सत्तेत आहे, उद्या सत्ता गेली, तर त्यांनाही अनेकदा आंदोलने करावी लागतील. आंदोलने करूनच भाजप सत्तेपर्यंत पोहोचले आहे. आंदोलने कुणी थांबवू शकत नाही. भाजपची आंदोलनाची व्याख्या बदलली असेल, तर ते त्यांचे ढोंग आहे, अशी टीका राऊत यांनी केली. आंदोलकांचा आवाज तुम्ही का ऐकत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

--इन्फो--

भाजपशी राजकीय मतभेद

राजकारणात कुणीच कुणाचे कायमचे शत्रू असत नाही. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आहे. भाजपशी आमचे राजकीय मतभेद आहेत, राजकीय शत्रुत्व नाही. त्यांचा सामना आम्ही विचारातून, निवडणुकीतून करू. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची परंपरा लाभली आहे. ही परंपरा सुसंस्कृत आणि संस्कृतीची आहे, असेही राऊत म्हणाले.