शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

राजकीय स्वार्थातून मंत्र्यांचे चरित्रहन करण्याचे प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:13 IST

नाशिक : अलीकडे राजकीय नेत्यांची कोंडी करण्याचा, त्यांचे चरित्रहनन करून राजकीय बळी करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा प्रकारांमुळे ...

नाशिक : अलीकडे राजकीय नेत्यांची कोंडी करण्याचा, त्यांचे चरित्रहनन करून राजकीय बळी करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा प्रकारांमुळे तरी आपल्याला यश मिळेल, असे अनेकांना वाटते, असे सांगून खासदार संजय राऊत यांनी भाजपावर अप्रत्यक्ष आरोप केला. वनमंत्री संजय राठोड यांच्यावरील आरोपाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. चौकशीअंती सत्य समोर येईल, असेही राऊत म्हणाले.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या नूतनीकरणाच्या उद‌्घाटन प्रसंगी राऊत पत्रकारांशी बोलत होते. राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावरील आरोपाविषयी विचारले असता, राऊत यांनी सत्य हे सत्य असल्याचे सांगून चौकशीअंती सर्व समोर येईल असे सांगितले. मध्यंतरी धनंजय मुंडे यांच्याबाबत असाच प्रयत्न करण्यात आल्यानंतर संबधित महिलेने तक्रार मागे घेतली आहे. राठोडप्रकरणी चौकशी केली जात असल्याचे राऊत म्हणाले.

राठोड हे विदर्भातील मोठे नेते आहेत, पक्षाचे मोठा आधार असलेले नेते असून, समाजाचे मोठे पाठबळ त्यांना आहे. त्यांच्याविषयी काेण काय मागणी करतो, याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नसल्याचे राऊत म्हणाले, तर आमदार नीलेश राणे यांनी राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यास महत्त्व देण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले.

आंदोलकांना आंदोलनजीवी म्हणणे चुकीचे असल्याचेही राऊत म्हणाले, लोकशाहीत आंदोलन करणे हा नागरिकांना अधिकार असल्याचे राज्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे. आज भाजप सत्तेत आहे, उद्या सत्ता गेली, तर त्यांनाही अनेकदा आंदोलने करावी लागतील. आंदोलने करूनच भाजप सत्तेपर्यंत पोहोचले आहे. आंदोलने कुणी थांबवू शकत नाही. भाजपची आंदोलनाची व्याख्या बदलली असेल, तर ते त्यांचे ढोंग आहे, अशी टीका राऊत यांनी केली. आंदोलकांचा आवाज तुम्ही का ऐकत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

--इन्फो--

भाजपशी राजकीय मतभेद

राजकारणात कुणीच कुणाचे कायमचे शत्रू असत नाही. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आहे. भाजपशी आमचे राजकीय मतभेद आहेत, राजकीय शत्रुत्व नाही. त्यांचा सामना आम्ही विचारातून, निवडणुकीतून करू. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची परंपरा लाभली आहे. ही परंपरा सुसंस्कृत आणि संस्कृतीची आहे, असेही राऊत म्हणाले.