शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
3
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
4
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
5
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
6
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
7
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
8
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
9
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
10
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
11
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
12
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
13
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
14
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
15
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
16
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
17
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
18
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
19
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
20
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन

हा तर ‘जखम डोक्याला, मलम पायाला’ लावण्याचा प्रकार !

By admin | Updated: March 8, 2017 01:10 IST

नाशिक: निवडणुकीच्या तोंडावर जन्माला आलेल्या पुरोगामी आघाडीला महापालिका निवडणुकीत एक हाती सत्ता मिळाल्याचे दिवास्वप्न पडाव, स्वप्नभंग होताच, पराभवाचे खापर मतदान यंत्रावर फोडावे याला काय म्हणणार?

श्याम बागुल : नाशिकनिवडणुकीला सामोरे जाताना पूर्ण बहुमताची वल्गना करणाऱ्या सेनेला निम्म्या जागांवरच अडकून पडावे लागले, विद्यमान काळात सत्तेवर असलेल्या मनसेचे इंजिन पाचवा डबा ओलांडू शकले नाही, कधी काळी सत्तेत असलेल्या दोन्ही कॉँग्रेसची जेमतेम इभ्रत वाचली अशा राजकीय ध्रुवीकरणात राज्य व राष्ट्रीय पक्षांची धूळधाण झालेली असताना निव्वळ निवडणुकीच्या तोंडावर जन्माला आलेल्या पुरोगामी आघाडीला महापालिका निवडणुकीत एक हाती सत्ता मिळाल्याचे दिवास्वप्न पडावे आणि स्वप्नभंग होताच, पराभवाचे खापर मतदान यंत्रावर फोडावे याला काय म्हणणार?  नाशिक महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात आले. जसे नाशिकसाठी मतदान झाले तसेच ते राज्यातील अन्य दहा महापालिका व २१ जिल्हा परिषदांसाठी त्याचदिवशी व ठरलेल्या वेळेतही झाले. या निवडणुकीची मतमोजणी दोन दिवसांनी म्हणजेच २३ रोजी झाली व भल्याभल्यांची झोप उडाली. ठाणे, मुंबई वगळता विद्यमान सत्ताधाऱ्यांना महापालिकेतून पायउतार व्हावे लागले व सर्वत्र भाजपाने बाजी मारली. जिल्हा परिषदांचे निकालही याच वळणावर गेल्यामुळे राजकीय पक्षांप्रमाणेच उमेदवारांनीही पराभवाचे आत्मपरीक्षण व कारणमीमांसा करून आपल्यापरिने पराभव मान्य केला. नाशकात मात्र विविध संस्था, संघटनांचे कडबोळे करून फक्त निवडणुकीपुरतेच अस्तित्वात आलेल्या पुरोगामी लोकशाही आघाडीने मात्र आपल्या उमेदवारांच्या पराभवाचे खापर थेट सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर व पर्यायाने मतदान यंत्रावर फोडून आपल्यातील कमकुवतपणा व दुर्बलतेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. मुळात या आघाडीचे नेतृत्व केलेल्यांनी यापूर्वी विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया चांगलीच नजरेखालून घालत त्याचा अनुभव घेतला आहे. निवडणूक आयोगाचे काटेकोर नियम व लोकप्रतिनिधी कायद्यान्वये घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांमध्ये तशी गडबड होण्याची शक्यता जवळजवळ नसताना, महापालिका निवडणुकीत भाजपाने मतदान यंत्रात ‘सेटिंग’ केल्याचा आरोप ‘जखम डोक्याला, मलम पायाला’ लावणारा ‘डॉक्टर’च करू शकतो याची खात्री पटते. मतदार याद्यांमध्ये घोळ केल्याचा व त्यापाठोपाठ मतदान यंत्राला ‘व्हीव्ही पॅट’ न बसविल्याचा आरोपही असाच हास्यास्पद आहे. २०१४ च्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत प्रायोगिक पातळीवर राबविण्यात आलेला व्हीव्ही पॅटचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर केंद्रीय आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांकरिता सरसकट व्हीव्ही पॅट यंत्र वापरण्याचा निर्णय घेतला असला तरी, राज्य निवडणूक आयोगाला अशा प्रकारचे यंत्र वापरण्यासाठी कायद्यात तशी तरतूद करावी लागेल. नाशिक महापालिका असो वा जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारित घेतल्या जात असल्याची माहितीही जर आघाडीचे नेतृत्व करणाऱ्यांना नसेल तर त्यांची निवडणूक प्रक्रिया व त्या संदर्भातील कायदेशीर ज्ञानाबाबत संशय घेण्यास पुरेसा वाव आहे. मुळात निवडणुकीच्या तोंडावर अस्तित्वात आलेल्या या आघाडीला ना शेंडा ना बुडखा होता, ना प्रचाराचे मुद्दे, ना साधनसामग्री, कोणा एकावर विश्वास ठेवावा, अशा चेहऱ्याचा अभाव व त्यातही महत्त्वाचे म्हणजे निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी लागणारी तयारी या आघाडीकडे नव्हती, त्यामुळे पदरी पराभव ठरल्याची जाणीव आघाडीच्या नेत्यांना अगोदरपासूनच होती, म्हणूनच त्यांचे प्रचारातील अस्तित्व नगण्य होते, त्यापेक्षा ‘इव्हीएम हटाओ, बॅलेट लाओ’ म्हणण्यात उपस्थिती अधिक !  नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत कोणा एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची छातीठोक खात्री तशीही कोणी देत नव्हते, त्यामुळे भाजपाला हे यश मिळाल्याने साहजिकच त्याकडे संशयाने बघितले जाणे शक्य असले तरी, हा संशय वास्तवात खरा ठरविण्यासाठी कायदेशीर व तार्किक मार्गाच्या ज्या काही आयुधांचा वापर करायला हवा त्याचा बहुधा या मंडळींना विसर पडला. भाजपाने मतदान यंत्रात ‘सेटिंग’ केल्याचे एक वेळ मान्य केले तरी, जी मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपाने सेनेशी आपली २५ वर्षांची मैत्री पणाला लावली, राज्य सरकारवर अस्थिरतेची टांगती तलवार स्वत:हूनच लादून घेतली त्या भाजपाला मुंबई व ठाण्यातील मतदान यंत्राचे ‘सेटिंग’ करणे नाशिकच्या मानाने परवडले नसते काय? याचा विचार तक्रारकर्त्या तज्ज्ञांनी केला तर बरे झाले असते.