शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

अवकाळी पावसाने घेतले दोन बळी

By admin | Updated: March 1, 2016 23:53 IST

अवकाळी पावसाने घेतले दोन बळी

नाशिक : जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाने दोन जणांचे बळी घेतले आहेत. या पावसाने द्राक्षबाग आणि अन्य पिकांना चांगलाच फटका बसला आहे. शहर व जिल्ह्यात मंगळवारी दुसऱ्या दिवशी देखील पावसाने विजेच्या गडगडाट व वादळासह हजेरी लावली. मालेगाव शहरातील गुलशन-ए-इब्राहीम येथे दुपारी चार वाजेच्या सुमारास अंगावर वीज कोसळल्याने बालकाचा मृत्यू झाला. शेख इमरान शेख फिरोज (१४) रा. पाचवी गल्ली, गुलशेरनगर असे मृत बालकाचे नाव आहे. गेल्या २४ तासात वीज व वादळामुळे दोन बालकांनी जीव गमावला. अन्य घटना कळवण तालुक्यातील मानूर येथे घडली. अंगावर वीज कोसळल्याने शीतल अशोक हळदे (१८) या तरुणीचा मृत्यू झाला. गेल्या काही वर्षांपासून घटलेले पर्जन्यमान आणि गारांचा मारा यामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना यंदाही बेमोसमी पावसाचा फटका सहन करावा लागत असल्याने बळीराजात चिंतेचे वातावरण आहे. दिंडोरी, वणी, पिंपळगाव, भालूर, मनमाड, भालूर, एकवई, धनेर, नवसारी, चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव, वडाळीभोई गावांमध्ये विजांच्या कडकडाट होऊन पाऊस झाला. पावसामुळे कांदा, गहू, हरबरा याबरोबरच द्राक्ष व डाळींबबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांचा निर्यात होणारा द्राक्षमाल गारपिटीमुळे खराब झाला आहे.