शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

दोनदा महापौरपद लाभूनही विकास दूर

By admin | Updated: January 18, 2017 00:27 IST

सातपूर विभाग : सिंहस्थ काळातीलच कामे सर्वाधिक

गोकूळ सोनवणे : सातपूरगेल्या २५ वर्षांत महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधींच्या राजवटीत सातपूर विभागाकडे दोन वेळा सर्वोच्च असे महापौरपद आणि एक वेळा स्थायीसमिती सभापतिपद मिळाले. महत्त्वाची पदे मिळवूनही सातपूर विभागातील विकासाचे प्रकल्प रेंगाळलेलेच आहेत.गेल्या २५ वर्षांच्या कारकिर्दीत महापालिकेत अनेक पक्षांची सत्ता आली. दुसऱ्या पंचवार्षिक काळात सातपूर विभागाला प्रकाश मते यांच्या रुपाने महापौरपद मिळाले. त्यावेळी महापौरपद एक वर्षासाठी होते. मते यांनी सातपूर विभागासाठी काही ठोस विकासाची कामे केली नसली तरी त्यांनी संपूर्ण शहरासाठी घंटागाडी संकल्पना मात्र राबविली. त्यानंतर तिसऱ्या पंचवार्षिक काळात दशरथ पाटील यांनी महापौरपद खेचून आणले. ऐन सिंहस्थ कुंभमेळा काळात पाटील यांची महापौरपदी वर्णी लागल्याने केंद्र व राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांचे श्रेय साहजिकच पाटील यांनी घेण्याचा प्रयत्न केला. त्याकाळात सातपूर विभागासाठी तरण तलाव, चौक सुशोभीकरण, जलशुद्धीकरण केंद्र, गंगापूर गावात रु ग्णालय, शाळेची इमारत, गंगापूर ते जलालपूर नदीवर पूल, पिंपळगाव बहुला त्र्यंबक रस्त्यावर पूल, सातपूर कॉलनीत प्रथमोपचार केंद्र, भव्य कमान आदी विविध विकासाची कामे झाली. तर सद्यस्थितीत सलीम शेख हे स्थायी समिती सभापतिपद भूषिवत आहेत. शेख यांच्या सभापतीपदाच्या काळात नवीन घंटागाड्या, खतप्रकल्पाचे खासगीकरण, उद्यानांची देखभाल यासह मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत. दोन वेळा महापौरपद लाभूनही सातपूर विभाग मात्र अजूनही अन्य विभागांच्या तुलनेत विकासापासून दूर आहे.