शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

मजूर संस्थांचे अडकले केंद्राकडे दोन हजार कोटी

By admin | Updated: July 25, 2014 00:39 IST

मजूर संस्थांचे अडकले केंद्राकडे दोन हजार कोटी

नाशिक : जिल्ह्यातील सुमारे अकराशेच्या आसपास आणि राज्यातील सुमारे बारा हजार मजूर संस्थांकडून गेल्या आठ वर्षांत सुमारे दोन हजार कोटींची वसुली १ टक्का उपकरापोटी केंद्र व राज्य सरकारने केली असून, प्रत्यक्षात मजूर संस्थेतील कामगारांना सुविधा मात्र पुरविल्याच नसल्याचे समजते. यासंदर्भात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागील आठवड्यातच जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष राजाराम खेमनार यांनी दाद मागितली आहे.महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० नुसार शहरी व ग्रामीण भागातील ५ मैल त्रिजेच्या आत राहणाऱ्या शारीरिक श्रमाची कामे करणाऱ्या ५१ मजुरांच्या संस्थेला मजूर सहकारी संस्था नावाने मान्यता व नोंदणी देण्यात आली आहे. त्यामुळे विनानिविदा स्पर्धेशिवाय त्यांना प्रचलित शासकीय दराने कामे देण्यास सुरुवात करण्यात आली. १९७९ मध्ये मजूर संस्थांना शासकीय सवलतीने एक लाखापर्यंतची कामे निविदा स्पर्धेशिवाय अंदाजपत्रकीय दराने देण्याची सवलत दिली. पुढे ही सवलत १९८४ मध्ये दोन लाखापर्यंत, सन २००० मध्ये पाच लाखांपर्यंत व सन २००६ मध्ये १५ लाखांपर्यंत शासनाने वेळोवेळी शासनाच्या आदेशान्वये मजूर संस्थांना सवलीच्या दराने कामे देण्याच्या मर्यादेत वाढ केली आहे. मजूर संस्थांना अंदाजपत्रकीय दराने कामे देताना, अंदाजपत्रकात व्हॅट कर, रॉयल्टी आदि करांचा समावेश असतो. त्यामुळे देयकातून त्यांची वसुली होत असते. मात्र नव्याने लागू केलेल्या इमारत व इतर बांधकाम कामगार सेवाशर्ती नियमाच्या कायद्यानुसार प्रत्येकी एक टक्का उपकर केंद्र व राज्य शासनाने मजूर संस्थांकडून गेल्या सात-आठ वर्षांपासून वसूल केला आहे. हा उपकर मजुरांना विमा संरक्षण, पायाभूत सोयीसुविधा, आरोग्य सुविधा इत्यादींसाठी कपात करण्याचे कारण देण्यात आले आहे. हा कायदा केंद्र सरकारने मालक व कामगार हे नाते जेथे लागू होते, त्या सर्व क्षेत्रांसाठी लागू केलेला आहे. प्रत्यक्षात मजूर संस्थांचे कार्यक्षेत्र सहकार क्षेत्राकडे येत असून, त्यांना इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम कायदा लागू होत नसल्याचे मजूर संस्थांचे मत आहे. त्यामुळे मजूर संस्थांकडून ही एक टक्का उपकराची कपात करण्यात येऊ नये, असे मजूर संस्थांचे म्हणणे आहे. मात्र यापोटी जी काही एक टक्का उपकराची रक्कम गोळा झाली आहे, त्या रकमेतून मजूर संस्थांतील कामगारांना कोणत्या सुविधा मिळाल्या हा प्रश्नच आहे.(प्रतिनिधी)