शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

पहिनेजवळील तलावात दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

By admin | Updated: June 26, 2017 22:45 IST

मविप्र अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यां

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : त्र्यंबकेश्वर - घोटी रस्त्यावरील पहिने परिसरातील तलावात बुडून मराठा विद्या प्रसारक समाजसंस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि़२६) दुपारच्या सुमारास घडली़ कौस्तुभ प्रमोद भिंगारदिवे (२६, रा़राहुरी, जि़अहमदनगर) व संग्राम शिवाजी सिरसाठ (२३, रा़इंदिरानगर, नाशिक) असे बुडून मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत़ रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयास सुटी असल्याने सहलीसाठी ते मित्रांसमवेत आले होते़ या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

 

वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार रमजान ईदनिमित्त मविप्रच्या कर्मवीर बाबूराव ठाकरे महाविद्यालयास सुटी होती़ या महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलीकम्युनिकेशनच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थी कौस्तुभ भिंगारदिवे व संग्राम सिरसाठ हे आपल्या आठ सहकाऱ्यांसह पहिने परिसरात सहलीसाठी आले होते़ पहिने परिसरात रस्त्यालगत असलेल्या तलावात पोहोण्यासाठी उतरले़ दुपारी चार वाजेच्या सुमारास पोहोता येत नसलेले कौस्तुभ व संग्राम हे दोघे तलावात बुडाले, त्यांच्या मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही़या दोघांच्या सहकाऱ्यांनी घटनेची माहिती त्यांचे पालक व पोलिसांना दिली़ त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी व वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक नाईक यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला़ अखेर सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी या दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले़ दरम्यान, कोस्तुभ भिंगारदिवे हा मूळचा राहुरीचा, तर संग्राम सिरसाठ हा इंदिरानगरमधील रहिवासी आहे़ --कोट--निसर्गाचा आनंद घ्या, मात्र जरा जपूनत्र्यंबकेश्वर व परिसरातील निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी महाविद्यालयीन तरुण-तरुणी तसेच शहरातील नागरिक व पर्यटक मोठ्या संख्येने येतात़ मात्र, पाण्याच्या ठिकाणच्या खोलीचा त्यांना अंदाज नसतो वा नको ते धाडस करताना अशा प्रकारच्या दुर्घटना घडतात़ त्यामुळे निसर्गाचा आनंद जरूर घ्या, मात्र त्याबरोबरच सावधानताही बाळगायला हवी़- शीतलकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक, वाडीवऱ्हे

--कोट--केटीएचएम महाविद्यालयातील हे सर्व विद्यार्थी अंघोळीसाठी पाण्यात उतरले होते़ कौस्तुभ व संग्राम यांच्यापैकी एक जण पाण्यात बुडाल्याचे लक्षात येताच तेथे असलेल्या पर्यटकांनी वाचवा-वाचवा अशी ओरडही केली़ त्यावेळी उर्वरित दुसऱ्याने वाचविण्याचा प्रयत्न केला असता दुसराही बुडाला़ विशेष म्हणजे या ठिकाणी सर्वजण अंघोळ करीत असूनही कोणाच्याही हा प्रकार लक्षात आला नाही़ गेल्यावर्षी याच ठिकाणी वाढदिवस साजरा केल्यानंतर दोघांचा बुडून मृत्यू झाला होता़ त्यामुळे या ठिकाणची जागा धोकादायक जागा आहे, असा फलक लावायला हवा. जेणे करून पर्यटकांना याची माहिती मिळेल़- ज्ञानेश्वर गांगुर्डे, प्रत्यक्षदर्शी, नाशिक