शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

पहिनेजवळील तलावात दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

By admin | Updated: June 26, 2017 22:45 IST

मविप्र अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यां

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : त्र्यंबकेश्वर - घोटी रस्त्यावरील पहिने परिसरातील तलावात बुडून मराठा विद्या प्रसारक समाजसंस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि़२६) दुपारच्या सुमारास घडली़ कौस्तुभ प्रमोद भिंगारदिवे (२६, रा़राहुरी, जि़अहमदनगर) व संग्राम शिवाजी सिरसाठ (२३, रा़इंदिरानगर, नाशिक) असे बुडून मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत़ रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयास सुटी असल्याने सहलीसाठी ते मित्रांसमवेत आले होते़ या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

 

वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार रमजान ईदनिमित्त मविप्रच्या कर्मवीर बाबूराव ठाकरे महाविद्यालयास सुटी होती़ या महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलीकम्युनिकेशनच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थी कौस्तुभ भिंगारदिवे व संग्राम सिरसाठ हे आपल्या आठ सहकाऱ्यांसह पहिने परिसरात सहलीसाठी आले होते़ पहिने परिसरात रस्त्यालगत असलेल्या तलावात पोहोण्यासाठी उतरले़ दुपारी चार वाजेच्या सुमारास पोहोता येत नसलेले कौस्तुभ व संग्राम हे दोघे तलावात बुडाले, त्यांच्या मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही़या दोघांच्या सहकाऱ्यांनी घटनेची माहिती त्यांचे पालक व पोलिसांना दिली़ त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी व वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक नाईक यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला़ अखेर सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी या दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले़ दरम्यान, कोस्तुभ भिंगारदिवे हा मूळचा राहुरीचा, तर संग्राम सिरसाठ हा इंदिरानगरमधील रहिवासी आहे़ --कोट--निसर्गाचा आनंद घ्या, मात्र जरा जपूनत्र्यंबकेश्वर व परिसरातील निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी महाविद्यालयीन तरुण-तरुणी तसेच शहरातील नागरिक व पर्यटक मोठ्या संख्येने येतात़ मात्र, पाण्याच्या ठिकाणच्या खोलीचा त्यांना अंदाज नसतो वा नको ते धाडस करताना अशा प्रकारच्या दुर्घटना घडतात़ त्यामुळे निसर्गाचा आनंद जरूर घ्या, मात्र त्याबरोबरच सावधानताही बाळगायला हवी़- शीतलकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक, वाडीवऱ्हे

--कोट--केटीएचएम महाविद्यालयातील हे सर्व विद्यार्थी अंघोळीसाठी पाण्यात उतरले होते़ कौस्तुभ व संग्राम यांच्यापैकी एक जण पाण्यात बुडाल्याचे लक्षात येताच तेथे असलेल्या पर्यटकांनी वाचवा-वाचवा अशी ओरडही केली़ त्यावेळी उर्वरित दुसऱ्याने वाचविण्याचा प्रयत्न केला असता दुसराही बुडाला़ विशेष म्हणजे या ठिकाणी सर्वजण अंघोळ करीत असूनही कोणाच्याही हा प्रकार लक्षात आला नाही़ गेल्यावर्षी याच ठिकाणी वाढदिवस साजरा केल्यानंतर दोघांचा बुडून मृत्यू झाला होता़ त्यामुळे या ठिकाणची जागा धोकादायक जागा आहे, असा फलक लावायला हवा. जेणे करून पर्यटकांना याची माहिती मिळेल़- ज्ञानेश्वर गांगुर्डे, प्रत्यक्षदर्शी, नाशिक