शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आणखी दोन दिवस उष्माघात

By admin | Updated: March 28, 2017 00:41 IST

नाशिक : हवामान खात्याने येत्या ४८ तासांत मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागाने विभागातील नागरिकांना दक्षतेच्या सूचना दिल्या

नाशिक : हवामान खात्याने येत्या ४८ तासांत मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्याने राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने नाशिकसह विभागातील नागरिकांना दक्षतेच्या सूचना दिल्या असून, त्यासाठी घ्यावयाची काळजीबाबत मार्गदर्शनही केले आहे.  गेल्या दोन दिवसांपासून नाशिकसह मध्य महाराष्ट्रात उष्मालाट आली असून, तपमानाने चाळीशी पार केल्याने त्याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. सकाळी १० वाजेपासूनच उन्हाचा तडाखा बसू लागल्याने घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक हरतऱ्हेचे प्रयत्न करू लागले आहेत.  येत्या ४८ तासांत उष्णतेची लाट अशीच कायम राहील किंबहुना त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेता राज्य आपत्ती व्यवस्थापन  विभागाने दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. वाढत्या उष्मेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता अधिक असल्याचेही आपत्ती व्यवस्थापन विभागाने म्हटले आहे. काय करावेतहान लागली नसली तरी जास्तीत जास्त पाणी प्यावेहलकी व पातळ सच्छिद्र सुती कपडे वापरावीतबाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलांचा वापर करावाप्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावीशरीरातील पाणी कमी झाल्यास लस्सी, लिंबू पाणी, ताक याचा वापर करावाअशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे असल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जावेघरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यातजागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी.काय करू नयेलहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.दुपारी बारा ते साडेतीन या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळा.गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावेबाहेर तपमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत, दुपारी बारा ते साडेतीन या वेळेत बाहेर काम करणे टाळावेउन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे.मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराच्या खिडक्या, दरवाजे उघडे ठेवावीत.