शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

दोनशे वाड्या-वस्त्यांना हवे नावाचे ‘गाव’

By admin | Updated: June 27, 2014 00:11 IST

दोनशे वाड्या-वस्त्यांना हवे नावाचे ‘गाव’

 

नाशिक : आदिवासी बहुल क्षेत्रातील वाड्या-वस्त्यांनी त्यांना स्वतंत्र हक्काचे नाव असलेले ‘गाव’ असल्याची मागणी केल्यास आता तसे प्रत्यक्षात त्या वाड्या-वस्त्यांना गावाचा दर्जा मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयाचा लाभ उचलण्यासाठी जिल्ह्णातील नऊ तालुक्यांतील २० वाड्या-वस्त्यांनी त्यांना गावाचा दर्जा मिळावा, म्हणून ग्रामसभेचे ठराव मंजूर करून तसेच प्रस्ताव प्रांत कार्यालयास सादर केले आहेत.शासनाने पेसा (आदिवासी प्रक्षेत्र) कायद्यानुसार ज्या वाड्या, वस्त्या, तांडे व पाडे यांनी त्यांच्या लोकसंख्येच्या ५० टक्के ग्रामस्थांनी मागणी केल्यास त्या वाड्या-वस्त्यांना, गावाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रधानसचिव परिमल सिंह यांनी नाशिक दौऱ्यात नुकतीच त्यासंदर्भात माहिती दिली. गावाचा दर्जा देण्यास लोकसंख्येची अट टाकण्यात आलेली नाही. मात्र किमान पन्नास टक्के ग्रामस्थांची तशी मागणी हवी, अशी अट आहे. जिल्ह्णात आजमितीस १३८० ग्रामपंचायती, तर १९२० महसुली गावे आहेत. मागील वर्षापर्यंत १३७६ ग्रामपंचायती होत्या, त्यात खरपडी (पेठ), पुनदनगर (कळवण), मोडाळे व कुशेगाव (इगतपुरी) या चार नवीन ग्रामपंचायतींचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. नऊ आदिवासी तालुक्यांचा विचार केला, तर या नऊ तालुक्यांत ५६७ ग्रामपंचायती तर ९५२ महसुली गावे आहेत. आता पेसा कायद्यानुसार २०६ वाड्या-वस्त्यांनी त्यांना गावाचा दर्जा देण्याबाबत प्रस्ताव सादर केलेले आहेत. त्यात इगतपुरी-१८, पेठ-४, त्र्यंबकेश्वर-३, कळवण-५६, सुरगाणा-७४, नाशिक-४, देवळा-३, दिंडोरी-४, बागलाण-३७ अशा २०६ वाड्यांचा समावेश आहे. प्रांत कार्यालयाकडून हे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आल्यानंतर त्यांना गावाचा दर्जा देण्याबाबत निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.(प्रतिनिधी)