शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
8
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
9
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
12
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
13
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
14
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
15
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
16
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
17
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
18
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
19
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
20
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP

आंदोलन करणाऱ्या दोनशे शेतकऱ्यांना अटक

By admin | Updated: June 6, 2017 01:42 IST

कळवण : कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी दि. १ जूनपासून संपावर गेलेल्या कळवण शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांनी अखेर सरकारविरोधात कळवण शहर व तालुका बंदचा आसूड उगारला.

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी दि. १ जूनपासून संपावर गेलेल्या कळवण शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांनी अखेर सरकारविरोधात कळवण शहर व तालुका बंदचा आसूड उगारला. यात व्यापारी व व्यावसायिकांनी सहभागी होत पाठिंबा दिला. कळवणसह अभोणा, कनाशी आदी आदिवासी भागात १०० टक्के बंद पाळण्यात आला. कळवण बसस्थानकाजवळ तब्बल दोन तास शेतकरी तळ ठोकून होते. यावेळी कळवण पोलिसांनी दोनशे-तीनशे राजकीय पक्ष पदाधिकारी व शेतकऱ्यांना अटक करु न नंतर सोडून दिले.शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, मविप्र संचालक रवींद्र देवरे, जिल्हा युवक कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष शैलेश पवार, शेतकरी नेते शांताराम जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख जितेंद्र वाघ, समता परिषदेचे कौतिक गांगुर्डे, प्रदेश उपाध्यक्ष माणिक देवरे आदींच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.कळवण शहरात मोटारसायकल रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आले होते. बसस्थानकाजवळ शेतकरी नेते व शेतकरी बांधवांनी एकत्र येत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सदाभाऊ खोत व जयाजी सूर्यवंशी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत भाजपा सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी बसस्थानकामधून एकही बस बाहेर पडू न देण्याचा इशारा देऊन दोन तास बसस्थानकाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संपाला पाच दिवस होत असताना राज्य सरकारने कर्जमाफीबाबत कोणतीच भूमिका न घेतल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली. राज्यभरातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आपल्या भावना प्रकट करीत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलीस खोटे गृन्हे नोंदवून आंदोलक शेतकऱ्यांवर कारवाई करीत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी, शेतकरी संप सुरूच राहणार असून, कोण्याही शेतकऱ्याने गुजरात राज्याकडे व शहराकडे भाजीपाला व शेतमाल पाठवू नये. दळवट येथे तीन दिवस मोठे आंदोलन होऊन पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यामुळे संप शेतकरी बांधवांनी हातात घेतला असल्याने संपाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. शेतकरी नेते शांताराम जाधव यांनी राज्य सरकारने आश्वासने दिली असली तरी ती मान्य नसल्याने हे आंदोलन सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगून संप काळात शेतमालाची वाहतूक करणारे शेतकरी व त्यांची गावे जनतेला समजू द्या, त्यांना त्या पध्दतीने उत्तर देण्याचा इशारा देऊन संप यशस्वी करण्याची शपथ दिली. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर यांनी सरकारवर जोरदार टीका करून शेतकरी आता आक्र मक झाला आहे. शेतकरी संपात शिवसेना अग्रभागी असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, नाशिक जिल्हा युवक कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष शैलेश पवार, समता परिषदेचे कौतिक गांगुर्डे यांनी मनोगत व्यक्त करून शेतकरी संप यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. यावेळी देवराम कृष्णा पगार, शरद गुंजाळ, चंद्रकांत पवार, घनश्याम पवार, विलास रौंदळ, माणिक देवरे, पोपट पवार, दिलीप देशमुख, भिला पवार, रामा पाटील, योगेश खैरनार, गोरख खैरनार, मुरलीधर पगार, हरिभाऊ वाघ, विनोद खैरनार, नरेंद्र वाघ, नितीन पवार, सुनील गांगुर्डे, बापू जगताप, अमोल पगार, भाऊसाहेब पवार, दीपक पवार, साहेबराव निकम, शरद गांगुर्डे, राकेश गुंजाळ आदीसह असंख्य शेतकरी उपस्थित होते.