शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
4
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
5
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
6
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
7
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
8
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
9
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
10
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
11
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
12
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
13
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
14
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
15
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
16
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
17
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
18
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
19
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
20
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार

आंदोलन करणाऱ्या दोनशे शेतकऱ्यांना अटक

By admin | Updated: June 6, 2017 01:42 IST

कळवण : कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी दि. १ जूनपासून संपावर गेलेल्या कळवण शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांनी अखेर सरकारविरोधात कळवण शहर व तालुका बंदचा आसूड उगारला.

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी दि. १ जूनपासून संपावर गेलेल्या कळवण शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांनी अखेर सरकारविरोधात कळवण शहर व तालुका बंदचा आसूड उगारला. यात व्यापारी व व्यावसायिकांनी सहभागी होत पाठिंबा दिला. कळवणसह अभोणा, कनाशी आदी आदिवासी भागात १०० टक्के बंद पाळण्यात आला. कळवण बसस्थानकाजवळ तब्बल दोन तास शेतकरी तळ ठोकून होते. यावेळी कळवण पोलिसांनी दोनशे-तीनशे राजकीय पक्ष पदाधिकारी व शेतकऱ्यांना अटक करु न नंतर सोडून दिले.शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, मविप्र संचालक रवींद्र देवरे, जिल्हा युवक कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष शैलेश पवार, शेतकरी नेते शांताराम जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख जितेंद्र वाघ, समता परिषदेचे कौतिक गांगुर्डे, प्रदेश उपाध्यक्ष माणिक देवरे आदींच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.कळवण शहरात मोटारसायकल रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आले होते. बसस्थानकाजवळ शेतकरी नेते व शेतकरी बांधवांनी एकत्र येत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सदाभाऊ खोत व जयाजी सूर्यवंशी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत भाजपा सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी बसस्थानकामधून एकही बस बाहेर पडू न देण्याचा इशारा देऊन दोन तास बसस्थानकाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संपाला पाच दिवस होत असताना राज्य सरकारने कर्जमाफीबाबत कोणतीच भूमिका न घेतल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली. राज्यभरातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आपल्या भावना प्रकट करीत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलीस खोटे गृन्हे नोंदवून आंदोलक शेतकऱ्यांवर कारवाई करीत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी, शेतकरी संप सुरूच राहणार असून, कोण्याही शेतकऱ्याने गुजरात राज्याकडे व शहराकडे भाजीपाला व शेतमाल पाठवू नये. दळवट येथे तीन दिवस मोठे आंदोलन होऊन पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यामुळे संप शेतकरी बांधवांनी हातात घेतला असल्याने संपाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. शेतकरी नेते शांताराम जाधव यांनी राज्य सरकारने आश्वासने दिली असली तरी ती मान्य नसल्याने हे आंदोलन सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगून संप काळात शेतमालाची वाहतूक करणारे शेतकरी व त्यांची गावे जनतेला समजू द्या, त्यांना त्या पध्दतीने उत्तर देण्याचा इशारा देऊन संप यशस्वी करण्याची शपथ दिली. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर यांनी सरकारवर जोरदार टीका करून शेतकरी आता आक्र मक झाला आहे. शेतकरी संपात शिवसेना अग्रभागी असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, नाशिक जिल्हा युवक कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष शैलेश पवार, समता परिषदेचे कौतिक गांगुर्डे यांनी मनोगत व्यक्त करून शेतकरी संप यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. यावेळी देवराम कृष्णा पगार, शरद गुंजाळ, चंद्रकांत पवार, घनश्याम पवार, विलास रौंदळ, माणिक देवरे, पोपट पवार, दिलीप देशमुख, भिला पवार, रामा पाटील, योगेश खैरनार, गोरख खैरनार, मुरलीधर पगार, हरिभाऊ वाघ, विनोद खैरनार, नरेंद्र वाघ, नितीन पवार, सुनील गांगुर्डे, बापू जगताप, अमोल पगार, भाऊसाहेब पवार, दीपक पवार, साहेबराव निकम, शरद गांगुर्डे, राकेश गुंजाळ आदीसह असंख्य शेतकरी उपस्थित होते.