शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

हलगर्जीपणा करणारे दोन ग्रामसेवक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2022 01:51 IST

कामकाजात हलगर्जीपणा करून ग्रामस्थांना सेवेपासून वंचित ठेवल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक लीना बनसोड यांनी कोटंबी व कोमलवाडी येथील ग्रामपंचायतीच्या दोन्ही ग्रामसेवकांना सेवेतून निलंबित केले आहे. या कारवाईमुळे ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहे.

ठळक मुद्देसीईओंची कारवाई : ग्रामसेवकांचे धाबे दणाणले

नाशिक : कामकाजात हलगर्जीपणा करून ग्रामस्थांना सेवेपासून वंचित ठेवल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक लीना बनसोड यांनी कोटंबी व कोमलवाडी येथील ग्रामपंचायतीच्या दोन्ही ग्रामसेवकांना सेवेतून निलंबित केले आहे. या कारवाईमुळे ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोटंबी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पांडुरंग जाणू खरपडे यांच्याविरुद्ध कार्यालयीन कामकाजाबाबत ग्रामस्थांनी लेखी तक्रार अर्ज सादर केलेले होते. त्यानुसार प्रशासक आर. आर. बोडके यांनी ३ नोव्हेंबर व १२ जानेवारी रोजी भेट दिली असता खरपडे हे गैरहजर असल्याचे आढळून आले. तसेच खरपडे वारंवार अनधिकृतपणे गैरहजर असल्यामुळे ग्रामस्थांना शासकीय दाखले वेळेत न मिळणे, आदिवासी योजनांपासून गावास वंचित ठेवणे, ग्रामसभा न घेणे, पाणी शुद्धीकरणासाठी टीसीएल पावडर संपल्यानंतर नवीन साठा उपलब्ध करून न देणे, गावांत ३ विहिरी असून त्यापैकी कोटंबी येथील दोन विहिरीवर विद्युत कनेक्शन नियमित करण्यासाठी कोटेशन भरणेबाबत वारंवार सूचना देऊनही त्या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे बोरपाडा व बेहेडपाणी येथील ग्रामस्थांना विहिरीतून पाणी ओढून न्यावे लागत आहे. घरपट्टी, पाणीपट्टी वसुली न करणे, पंधराव्या वित्त आयोगाची रक्कम खर्च न करणे आदी दोषारोप ठेवण्यात आले आहेत. तसेच राजेंद्र भाऊराव निकम हे ग्रामपंचायत कोमलवाडी ता. सिन्नर येथे कार्यरत असून गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांनी विकासकामांचा आढावा घेण्यासाठी ग्रामपंचायतीस भेट दिली असता निकम हे अनधिकृतपणे गैरहजर होते. त्यामुळे निकम यांना कारणे दाखवा नोटीस दिली असता समाधानकारक लेखी खुलासा सादर केलेला नाही. निकम हे गैरहजर असल्याने तसेच ग्रामपंचायतीचे दप्तर तपासणी केली असता ग्रामपंचायतीकडील नोंदवह्या अपूर्ण असल्याचे आढळले आहे. निकम यांच्या कामकाजाबाबत सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी तक्रार केली असून त्यांचे कामकाज असमाधानकारक असल्यामुळे त्याचा परिणाम ग्रामपंचायतीच्या विकासकामावर व प्रशासनावर होत आहे. त्यामुळे त्यांची अन्यत्र बदली करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार त्यांना निलंबित करण्यात आले आहे. दोन्ही ग्रामसेवकांना त्यांच्या कार्यालयीन कामकाजात सुधारणा व्हावी व गावांचा विकास करावा याबाबत संधी देऊनही त्यात सुधारणा न झाल्याने शेवटचा पर्याय म्हणून त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) रवींद्र परदेशी यांनी दिली.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदGovernmentसरकार