शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

हलगर्जीपणा करणारे दोन ग्रामसेवक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2022 01:51 IST

कामकाजात हलगर्जीपणा करून ग्रामस्थांना सेवेपासून वंचित ठेवल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक लीना बनसोड यांनी कोटंबी व कोमलवाडी येथील ग्रामपंचायतीच्या दोन्ही ग्रामसेवकांना सेवेतून निलंबित केले आहे. या कारवाईमुळे ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहे.

ठळक मुद्देसीईओंची कारवाई : ग्रामसेवकांचे धाबे दणाणले

नाशिक : कामकाजात हलगर्जीपणा करून ग्रामस्थांना सेवेपासून वंचित ठेवल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक लीना बनसोड यांनी कोटंबी व कोमलवाडी येथील ग्रामपंचायतीच्या दोन्ही ग्रामसेवकांना सेवेतून निलंबित केले आहे. या कारवाईमुळे ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोटंबी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पांडुरंग जाणू खरपडे यांच्याविरुद्ध कार्यालयीन कामकाजाबाबत ग्रामस्थांनी लेखी तक्रार अर्ज सादर केलेले होते. त्यानुसार प्रशासक आर. आर. बोडके यांनी ३ नोव्हेंबर व १२ जानेवारी रोजी भेट दिली असता खरपडे हे गैरहजर असल्याचे आढळून आले. तसेच खरपडे वारंवार अनधिकृतपणे गैरहजर असल्यामुळे ग्रामस्थांना शासकीय दाखले वेळेत न मिळणे, आदिवासी योजनांपासून गावास वंचित ठेवणे, ग्रामसभा न घेणे, पाणी शुद्धीकरणासाठी टीसीएल पावडर संपल्यानंतर नवीन साठा उपलब्ध करून न देणे, गावांत ३ विहिरी असून त्यापैकी कोटंबी येथील दोन विहिरीवर विद्युत कनेक्शन नियमित करण्यासाठी कोटेशन भरणेबाबत वारंवार सूचना देऊनही त्या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे बोरपाडा व बेहेडपाणी येथील ग्रामस्थांना विहिरीतून पाणी ओढून न्यावे लागत आहे. घरपट्टी, पाणीपट्टी वसुली न करणे, पंधराव्या वित्त आयोगाची रक्कम खर्च न करणे आदी दोषारोप ठेवण्यात आले आहेत. तसेच राजेंद्र भाऊराव निकम हे ग्रामपंचायत कोमलवाडी ता. सिन्नर येथे कार्यरत असून गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांनी विकासकामांचा आढावा घेण्यासाठी ग्रामपंचायतीस भेट दिली असता निकम हे अनधिकृतपणे गैरहजर होते. त्यामुळे निकम यांना कारणे दाखवा नोटीस दिली असता समाधानकारक लेखी खुलासा सादर केलेला नाही. निकम हे गैरहजर असल्याने तसेच ग्रामपंचायतीचे दप्तर तपासणी केली असता ग्रामपंचायतीकडील नोंदवह्या अपूर्ण असल्याचे आढळले आहे. निकम यांच्या कामकाजाबाबत सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी तक्रार केली असून त्यांचे कामकाज असमाधानकारक असल्यामुळे त्याचा परिणाम ग्रामपंचायतीच्या विकासकामावर व प्रशासनावर होत आहे. त्यामुळे त्यांची अन्यत्र बदली करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार त्यांना निलंबित करण्यात आले आहे. दोन्ही ग्रामसेवकांना त्यांच्या कार्यालयीन कामकाजात सुधारणा व्हावी व गावांचा विकास करावा याबाबत संधी देऊनही त्यात सुधारणा न झाल्याने शेवटचा पर्याय म्हणून त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) रवींद्र परदेशी यांनी दिली.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदGovernmentसरकार