शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

हलगर्जीपणा करणारे दोन ग्रामसेवक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2022 01:51 IST

कामकाजात हलगर्जीपणा करून ग्रामस्थांना सेवेपासून वंचित ठेवल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक लीना बनसोड यांनी कोटंबी व कोमलवाडी येथील ग्रामपंचायतीच्या दोन्ही ग्रामसेवकांना सेवेतून निलंबित केले आहे. या कारवाईमुळे ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहे.

ठळक मुद्देसीईओंची कारवाई : ग्रामसेवकांचे धाबे दणाणले

नाशिक : कामकाजात हलगर्जीपणा करून ग्रामस्थांना सेवेपासून वंचित ठेवल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक लीना बनसोड यांनी कोटंबी व कोमलवाडी येथील ग्रामपंचायतीच्या दोन्ही ग्रामसेवकांना सेवेतून निलंबित केले आहे. या कारवाईमुळे ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोटंबी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पांडुरंग जाणू खरपडे यांच्याविरुद्ध कार्यालयीन कामकाजाबाबत ग्रामस्थांनी लेखी तक्रार अर्ज सादर केलेले होते. त्यानुसार प्रशासक आर. आर. बोडके यांनी ३ नोव्हेंबर व १२ जानेवारी रोजी भेट दिली असता खरपडे हे गैरहजर असल्याचे आढळून आले. तसेच खरपडे वारंवार अनधिकृतपणे गैरहजर असल्यामुळे ग्रामस्थांना शासकीय दाखले वेळेत न मिळणे, आदिवासी योजनांपासून गावास वंचित ठेवणे, ग्रामसभा न घेणे, पाणी शुद्धीकरणासाठी टीसीएल पावडर संपल्यानंतर नवीन साठा उपलब्ध करून न देणे, गावांत ३ विहिरी असून त्यापैकी कोटंबी येथील दोन विहिरीवर विद्युत कनेक्शन नियमित करण्यासाठी कोटेशन भरणेबाबत वारंवार सूचना देऊनही त्या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे बोरपाडा व बेहेडपाणी येथील ग्रामस्थांना विहिरीतून पाणी ओढून न्यावे लागत आहे. घरपट्टी, पाणीपट्टी वसुली न करणे, पंधराव्या वित्त आयोगाची रक्कम खर्च न करणे आदी दोषारोप ठेवण्यात आले आहेत. तसेच राजेंद्र भाऊराव निकम हे ग्रामपंचायत कोमलवाडी ता. सिन्नर येथे कार्यरत असून गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांनी विकासकामांचा आढावा घेण्यासाठी ग्रामपंचायतीस भेट दिली असता निकम हे अनधिकृतपणे गैरहजर होते. त्यामुळे निकम यांना कारणे दाखवा नोटीस दिली असता समाधानकारक लेखी खुलासा सादर केलेला नाही. निकम हे गैरहजर असल्याने तसेच ग्रामपंचायतीचे दप्तर तपासणी केली असता ग्रामपंचायतीकडील नोंदवह्या अपूर्ण असल्याचे आढळले आहे. निकम यांच्या कामकाजाबाबत सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी तक्रार केली असून त्यांचे कामकाज असमाधानकारक असल्यामुळे त्याचा परिणाम ग्रामपंचायतीच्या विकासकामावर व प्रशासनावर होत आहे. त्यामुळे त्यांची अन्यत्र बदली करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार त्यांना निलंबित करण्यात आले आहे. दोन्ही ग्रामसेवकांना त्यांच्या कार्यालयीन कामकाजात सुधारणा व्हावी व गावांचा विकास करावा याबाबत संधी देऊनही त्यात सुधारणा न झाल्याने शेवटचा पर्याय म्हणून त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) रवींद्र परदेशी यांनी दिली.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदGovernmentसरकार