शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
3
“राजन पाटलांच्या वाया गेलेल्या कार्ट्यांना सत्तेचा माज…”, बाळराजे पाटलांना अजितदादांच्या आमदाराने सुनावले
4
सावधान! फक्त एक फोन कॉल अन् गमावले तब्बल ३२ कोटी; महिलेसोबत नेमकं काय घडलं?
5
लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक; पाहा नवी किंमत
6
"मॅचच्या ४ दिवस आधी BCCIचे क्यूरेटर आले अन्.."; कोलकाता पिच वादावर सौरव गांगुलीचा खुलासा
7
Eye Infections: मुंबईत वाढताहेत संसर्गाचे रुग्ण; डोळ्यांत डोळे घालाल तर पस्तावाल, 'अशी' घ्या काळजी!
8
१,२,३,४... बाप रे बाप...! एका ऑटोरिक्‍शातून बाहेर पडली तब्बल 22 मुलं! व्हिडिओ बघून धक्का बसेल
9
९४% रिटर्न दिल्यावर 'ग्रोव'ला १०% लोअर सर्किट! गुंतवणूकदारांनी शेअर विकायला का लावली रांग?
10
प्रशासकीय दिरंगाईमुळे बोनस रखडला; संतप्त कामगारांचे नायर रुग्णालयासमोर 'बोंबाबोंब' आंदोलन
11
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
12
Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
“आता ‘प्रो बैलगाडा लीग’ लवकरच, महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा...”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
14
सरकारच्या 'या' स्कीममध्ये मिळवा विना गॅरेंटी व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन; केवळ एका डॉक्युमेंटची लागेल गरज
15
मुलांच्या भवितव्याशी खेळ! Noge, Eare, Iey... चुकीचं इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाचा Video व्हायरल
16
आरक्षण मर्यादेचं उल्लंघन, राज्यातील निवडणुकांचं काय होणार? आता २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी, सुप्रिम कोर्टात आज काय घडलं
17
दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
18
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
19
SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?
20
“काँग्रेस-वंचित पक्षाची आघाडी व्हावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना”; नेते म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याकडून दोन शेळ्या फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 22:56 IST

वटार : येथील सावतावाडी वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जिभाऊ दगा बागुल यांच्या दोन गाभण शेळ्या ठार झाल्या. मंगळवारी दुपारी चार ते पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बिबट्याचा मुक्त संचार असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. परिसरात बिबट्याचा वावर नित्याचा झाला आहे. येथील शेतकरी पशुपालन करणारा असून, दुभती जनावरे मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे पशुधन धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देखबरदारीची उपाययोजना म्हणून वनविभागाने लक्ष घालून परिसरात पिंजरे लावावे

ग्रामस्थ भयभीत : वटार परिसरातील पशुधन धोक्यात; पिंजरा लावण्याची मागणी

 

वटार : येथील सावतावाडी वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जिभाऊ दगा बागुल यांच्या दोन गाभण शेळ्या ठार झाल्या. मंगळवारी दुपारी चार ते पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बिबट्याचा मुक्त संचार असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. परिसरात बिबट्याचा वावर नित्याचा झाला आहे. येथील शेतकरी पशुपालन करणारा असून, दुभती जनावरे मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे पशुधन धोक्यात आले आहे.येथील शेतकरी बाबा जयराम बागुल यांच्या पाच शेळ्या एकाच रात्री फस्त केल्या होत्या. या घटनेला आठ दिवस होत नाही तोच पुन्हा बिबट्याने दोन शेळ्या फस्त केल्या. गेल्या काही दिवसांपूर्वी पारडू फस्त केले होते. एकाच महिन्यात तीन हल्ल्यात आठ प्राण्यांचा बळी गेला आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी मागणी करूनही वनविभाग पिंजरा का लावत नाही, असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला आहे.सावतावाडी परिसरात बिबट्याचा बºयाच दिवसांपासून वावर असून, शेतकºयांना अनेकवेळा दर्शनही झाले आहे. दरवर्षी पाण्याच्या शोधात बिबटे गाव वस्तीवर येतात व पाळीव प्राण्यांवर ताव मारतात. लपण्यासाठी परिसरात मोठी काटेरी जुडपे असल्याने बिबट्यांचा वावर नित्याचा झाला आहे.वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या तीन ते चार महिन्यांत परिसरातील २० पाळीव प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. बिबट्याचे हल्ले असेच सुरू राहिले तर मानवालासुद्धा जीव गमवावा लागण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.मंगळवारी घडलेल्या घटनेची माहिती वनविभागाला कळवली असता, बोरसे यांनी वस्तीवर येऊन पंचनामा केला. यावेळी परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. खबरदारीची उपाययोजना म्हणून वनविभागाने लक्ष घालून परिसरात पिंजरे लावावे, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केलीआहे.यावेळी जिभाऊ खैरनार, उपसरपंच जितेंद्र शिंदे, पोलीसपाटील किरण खैरनार, मच्छिंद्र बागुल, जिभाऊ बागुल, हिरामण बागुल, हरी बागुल आदी शेतकरी उपस्थित होते.हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यांत दरवर्षी चार ते पाच मेंढ्यांचा बळी जात असल्याने मेंढपाळ जेरीस आले आहेत. येथील शेतकरी पशुपालन करणारा असून, शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतो. बिबट्याचा वावर असल्यामुळे वाड्या वस्त्यांवरील शेतकºयांना रात्र जागून काढावी लागत आहे. मेंढपाळ रात्रीच्या वेळी फटाके फोडून आपल्या पशुधनाचे रक्षण करत आहे.