शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

बागलाणमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 00:36 IST

सटाणा : बागलाण तालुक्यात कर्जबाजारीपणा व शेतमालाला भाव मिळत नसल्याने आलेल्या नैराश्येतून दोन युवा शेतकºयांनी जीवन संपविल्याच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यातील भडाणे येथील शेतकरी तात्याभाऊ साहेबराव खैरनार (३७) यांनी कांदाचाळीत गळफास लावून आत्महत्या केली, तर सारदे येथील शेतकरी मनोज रामराव धोंडगे (३२) यांनी विष प्राशन करून मृत्यूला कवटाळले. 

ठळक मुद्देतालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.

सटाणा : बागलाण तालुक्यात कर्जबाजारीपणा व शेतमालाला भाव मिळत नसल्याने आलेल्या नैराश्येतून दोन युवा शेतकºयांनी जीवन संपविल्याच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यातील भडाणे येथील शेतकरी तात्याभाऊ साहेबराव खैरनार (३७) यांनी कांदाचाळीत गळफास लावून आत्महत्या केली, तर सारदे येथील शेतकरी मनोज रामराव धोंडगे (३२) यांनी विष प्राशन करून मृत्यूला कवटाळले. केंद्र शासन शेतीविषयी चुकीचे धोरण अवलंबत असल्यानेच आत्महत्यांचे प्रमाण वाढले असल्याची चर्चा शेतकºयांमध्ये केली जात आहे. भडाणे येथील शेतकरी तात्याभाऊ खैरनार यांनी एका बॅँकेकडून कर्ज घेतले होते तसेच काही रक्कम हातउसनवार घेतली होती. खैरनार यांनी कांद्याला भाव वाढतील या अपेक्षेने चाळीत तब्बल पाचशे क्विंटल वर कांदा साठवून ठेवला होता. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीत अवघ्या शंभर ते दीडशे रुपये भावात कांदा विकला जात असल्याने पुढील कर्ज व देणेकºयांचे घेतलेले पैसे फेडणार तरी कसे या विवंचनेत ते सापडले होते. कांद्याचे भाव कोसळतच असल्याचे पाहून ते हताश झाले होते. गेल्या काही दिवसांपासून नैराश्येच्या गर्तेत सापडलेले तात्याभाऊ खैरनार अस्वथ झाले होते. त्यांनी शुक्र वारी शेतातील कांदा चाळीतच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.तहसीलदार प्रमोद हिले यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तात्याभाऊ खैरनार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. जायखेडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली गोरख गर्दे करीत आहेत.दुसºया घटनेत सारदे (ता. बागलाण) येथील कर्जबाजारी तरुण शेतकरी मनोज रामराव धोंडगे यांनी शुक्र वारी शेतात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. नातेवाइकांनी त्यांना मालेगाव येथील सामान्य रु ग्णालय दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान शनिवारी (दि.८) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. एका वर्षापूर्वीच त्यांच्या पत्नी व मुलाचे निधन झाले होते. शेतातील पाण्याच्या नियोजनासाठी धोंडगे यांनी शेततळे तयार केले होते. शेतीत डाळिंब व कांद्याची लागवड केली होती. शेतपिकांना भाव नसल्याने सातबारा उताºयावरचा बॅँक आॅफ महाराष्ट्र या बॅँकेचा एकवीस लाखांचा बोजा कमी कसा करावा या विवंचनेत ते होते. अनेक दिवसांपासून त्यांची चलबीचलत वाढली असल्याचे सांगितले जाते. कर्जाचा वाढता डोंगर आणि घेतलेले कर्ज फेडणार कसे याच नैराश्येतून त्यांनी विष प्राशन करून मृत्यूला कवटाळले असल्याचे बोलले जात आहे. जायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तहसीलदार प्रमोद हिले यांनीही भेट दिली. जायखेडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मनोज धोंडगे यांच्या पश्चात सहा वर्षांची मुलगी व आईवडील असा परिवार आहे.कोट-शेतकºयांच्या आत्महत्या ही अत्यंत दु:खद घटना आहे. शासन पीडित परिवारांसोबत आहे. यावर्षी जरी पाऊस कमी पडला असला तरी पुढील वर्षी चांगला पडेल अशी आशा बाळगू. शेतकºयांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये.- प्रमोद हिले, तहसीलदार बागलाण.तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. जनावरांना चारा नाही तसेच विहिरींनीही तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकंती करावी लागत आहे. बहुतांश शेतकºयांनी पाण्याअभावी कमी क्षेत्रात कांदा लागवड केली. मात्र पाण्याअभावी लागवड केलेला कांदा सोडून देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यातच आजमितीला कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी आपल्या जीवाला वैतागले असल्याचे चित्र आहे.- भाऊसाहेब भामरे, सभापती, नामपूर बाजार समिती