शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

मालेगाव शहराला आता दोन दिवसाआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 01:32 IST

मालेगाव : तालुक्यातील दुष्काळी स्थिती, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा व चणकापूर धरणातील जलसाठ्याचा विचार करून व गेल्यावर्षीच्या तुलनेत पाण्याची वाढलेली मागणी लक्षात घेता महापालिका प्रशासनाने शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आठवडाभरात पाणीपुरवठा वेळापत्रकाचे नियोजन केले जाणार आहे. शहरवासीयांवर पाणी कपातीचे संकट ओढावले आहे.

ठळक मुद्दे तळवाडे साठवण तलावात आवर्तन सोडल्यामुळे पाणी उपलब्ध आहे.

मालेगाव : तालुक्यातील दुष्काळी स्थिती, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा व चणकापूर धरणातील जलसाठ्याचा विचार करून व गेल्यावर्षीच्या तुलनेत पाण्याची वाढलेली मागणी लक्षात घेता महापालिका प्रशासनाने शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आठवडाभरात पाणीपुरवठा वेळापत्रकाचे नियोजन केले जाणार आहे. शहरवासीयांवर पाणी कपातीचे संकट ओढावले आहे.भविष्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी महापालिकेने पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. चणकापूर धरणातून अजून तीन पाण्याचे आवर्तन येणार आहेत. ३५० दलघफू पाणी एका आवर्तनातून सोडले जाते. तळवाडे साठवण तलावाची ८७ दलघफू क्षमता आहे. एका आवर्तनाद्वारे ९० दलघफू पाणी तळवाडे साठवण तलावात उपलब्ध होत असते. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांची बैठक झाली आहे.याबैठकीत दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.शहराला गिरणा व चणकापूर धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. चणकापूर धरणातून १४००, तर गिरणा धरणातून ६०० दलघफू पाणी आरक्षित करण्यात आले आहे. गिरणा धरणात महापालिकेचा ३६ टक्के जलसाठा शिल्लक आहे, तर तळवाडे साठवण तलावात आवर्तन सोडल्यामुळे पाणी उपलब्ध आहे.