शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

दोघा नगरसेवकांचा राजीनामा

By admin | Updated: February 1, 2017 00:42 IST

कारवाईचा धसका : पक्षबदलू ४३ नगसेवकांवर टांगती तलवार

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर केलेले कॉँग्रेसचे नगरसेवक शिवाजी गांगुर्डे आणि मनसेचे नगरसेवक शशिकांत जाधव यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याकडे सुपूर्द केला. निवडणुकीत पुन्हा निवडून गेल्यास कायदेशीर प्रक्रियेत अडकू नये याची खबरदारी घेत दोघा नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. उर्वरित ३९ पक्षबदलू नगरसेवकांवरही भविष्यात संबंधित राजकीय पक्षांकडून कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्यांच्याकडूनही राजीनाम्यासाठी आयुक्तांकडे परेड होण्याची शक्यता आहे. चालू पंचवार्षिक काळात आतापर्यंत ४८ नगरसेवकांनी पक्षांतर केलेले आहे. त्याची सुरुवात लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी झाली. सर्वांत प्रथम मनसेच्या तिकिटावर निवडून गेलेले हेमंत गोडसे यांनी पक्षांतर करत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर, जनराज्यचे  अपूर्व हिरे हे भाजपात तर त्यांच्याच पक्षाच्या शोभा निकम यांनी शिवसेनेची वाट धरली. मनसेचे नीलेश शेलार व शोभना शिंदे यांनी पक्षादेशाचे उल्लंघन करत सेनेला मदत केली. त्यामुळे त्यांना नंतर नगरसेवकपद गमवावे लागले.  गेल्या सात - आठ महिन्यांत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल ४२ नगरसेवकांनी पक्षांतर केलेले आहे. या सर्वच नगरसेवकांनी नव्या घरात प्रवेश करण्यापूर्वी पुन्हा उमेदवारी मिळण्यासाठी दावा केलेला आहे. त्यातील काही नगरसेवकांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. आता नामनिर्देशनपत्र दाखल केले जात असून, प्रवेश केलेल्या पक्षाकडून उमेदवारी दाखल केल्यास अथवा निवडून आल्यानंतर भविष्यात पक्षांतर बंदीच्या कायद्याच्या कचाट्यात आपण अडकू नये, याची खबरदारी घेत मंगळवारी (दि. ३१) कॉँग्रेसमधून भाजपात गेलेले नगरसेवक शिवाजी गांगुर्डे आणि मनसेतून भाजपात गेलेले नगरसेवक शशिकांत जाधव यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याकडे या दोहोंनी आपले राजीनामापत्र सुपूर्द केले. दोहोंनी अगोदर टपालाने राजीनामा पत्र पाठविले होते, परंतु राजीनामापत्र हे प्रत्यक्ष सादर करावे लागत असल्याने आयुक्तांनी त्यांना पाचारण करत ओळखपरेड करून घेतली. (प्रतिनिधी)कशी होऊ शकते कारवाई?विद्यमान नगरसेवकांची मुदत ही १५ मार्चपर्यंत आहे. पक्षांतर केलेल्या नगरसेवकांनी प्रवेश केलेल्या  पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि ते पुन्हा निवडून आले तर नवीन महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी त्यांच्याविरुद्ध संबंधित पक्षांकडून पक्षांतरबंदी कायद्यान्वये विभागीय आयुक्तांकडे तक्रार नोंदविली जाऊ शकते. त्यामुळे पक्षांतरबंदी  कायद्याच्या कचाट्यात अडकून होणाऱ्या कारवाईला सामोरे जावे लागेल.  परिणामी भविष्यात नगरसेवकपदावरही गंडांतर येऊ शकते. त्यामुळेच खबरदारी म्हणून गांगुर्डे व जाधव यांना सुचलेले शहाणपण अन्य पक्षबदलूंना येण्याची शक्यता आहे.