शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

अडीच हजार विद्यार्थ्यांनी मारली दांडी राज्यसेवा परीक्षा : दोन परीक्षा केंद्रांमध्ये ऐनवेळी बदल; काहीसा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:24 IST

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (दि.८)घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेस अडीच हजारांहून अधिक उमेदवारांनी दांडी मारली.

ठळक मुद्देपरीक्षेच्या दोन परीक्षा केंद्रांमध्ये ऐनवेळी बदल दोन हजार ५२६ उमेदवार गैरहजर

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (दि.८)घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेस अडीच हजारांहून अधिक उमेदवारांनी दांडी मारली. यात सकाळच्या सत्रात दोन हजार ५२६, तर दुपारच्या सत्रातील दोन हजार ५७० गैरहजर राहिले, तर सुमारे ८ हजार ३०० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. पूर्वनियोजित परीक्षा केंद्रांपैकी राज्य सेवा (पूर्व) परीक्षेच्या दोन परीक्षा केंद्रांमध्ये ऐनवेळी बदल करण्यात आला होता. त्यातच शहरात राज्यसेवा परीक्षा व बारावीच्या विद्यार्थ्यांचा जेईई मेन या दोन्ही परीक्षा एकाच वेळी आल्याने परीक्षा केंद्राविषयी उमेदवारांमध्ये काहीकाळ संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. राज्यसेवा परीक्षेसाठी उपकेंद्र क्र मांक २ के. के. वाघ इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, येथील विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था के. के. वाघ इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटेक्निकच्या इमारतीत करण्यात आली होती. राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी दोन सत्रातील राज्यसेवा पूर्वपरीक्षेस सकाळच्या पहिल्या सत्रात ८ हजार ३०६ परीक्षार्थींपैकी दोन हजार ५२६ उमेदवार गैरहजर होते, तर दुपारच्या सत्रात दोन हजार ५७० परीक्षार्थी गैरहजर राहिले. शहरातील एकूण २८ परीक्षा केंद्रांवर ७३५ केंद्र निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. या सर्व केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडल्याची माहिती परीक्षा नियंत्रक विभागाकडून देण्यात आली.