शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
5
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
6
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
7
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
8
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
9
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
10
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
11
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
12
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
13
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
14
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
15
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
16
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
17
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
18
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
20
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...

बावीस मिनिटानंतर चंद्रावर पडणार पृथ्वीची सावली: खंडग्रास चंद्रग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 23:11 IST

सोमवारी (दि.७) रात्री १० वाजून ५२ मिनिटाला सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे तीनही ग्रह एका सरळ रेषेत येणार आहेत. त्यामुळे दोन वर्षापुर्वी एप्रिलमध्ये घडलेल्या खंडग्रास चंद्रग्रहणाची पुनरावृत्ती होऊन पृथ्वीच्या सावलीखाली निम्मा चंद्र पुन्हा झाकला जाऊन खंडग्रास चंद्रग्रहण संपूर्ण देशभरात घडणार आहे.

- अझहर शेख

नाशिक, दि. 7 - सोमवारी (दि.७) रात्री १० वाजून ५२ मिनिटाला सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे तीनही ग्रह एका सरळ रेषेत येणार आहेत. त्यामुळे दोन वर्षापुर्वी एप्रिलमध्ये घडलेल्या खंडग्रास चंद्रग्रहणाची पुनरावृत्ती होऊन पृथ्वीच्या सावलीखाली निम्मा चंद्र पुन्हा झाकला जाऊन खंडग्रास चंद्रग्रहण संपूर्ण देशभरात घडणार आहे.खगोलप्रेमींसाठी औत्सुक्याची आणि आवडीची बाब असलेला खंडग्रास चंद्रग्रहण यापूर्वी ४एप्रिल २०१५ साली ईशान्य भारतातून बघावयास मिळाला होता. त्यानंतर सोमवारी रात्री १० वाजून ५२ मिनिटाला पृथ्वीची सावली हळूहळू चंद्रावर पडण्यास सुरूवात होणार आहे. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे तीनही ग्रह एका सरळ रेषेत येऊन चंद्रग्रहण बघावयास मिळणार आहे. हे खंडग्रास प्रकारचे ग्रहण आहे. चंद्रग्रहणाला वेधआरंभ दुपारी १२वाजून ४४ मिनिटाला झाला. या ग्रहणाचा चंद्राला स्पर्श १० वाजून ५२ मिनिटाला होऊन रात्री १२ वाजून ४४ मिनिटाला मोक्ष अर्थात पृथ्वीच्या सावलीतून चंद्राची सुटका होईल. ग्रहणाचा हा संपूर्ण कालावधीचा पर्व १ तास ५७ मिनिटाचा राहणार आहे. जवळपास दोन तास खंडग्रास चंद्रग्रहण देशभरात पहावयास मिळेल.नाशिक शहर व परिसरासह राज्याच्या विविध शहरांमध्ये रात्रीच्या सुमारास ढगाळ हवामान व काही भागात रिमझिम पाऊस होत असल्यामुळे नागरिकांना चंद्रग्रहण कितपत बघता येईल, याची शाश्वती नाही.

काय आहे ‘खंडग्रास’ चंद्रग्रहणसूर्य-पृथ्वी-चंद्र हे जेव्हा एका सरळ रेषेत येतात तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि त्यामुळे चंद्राचा प्रकाशमान भाग काही प्रमाणात झाकला जातो. परिणामी आपल्याला चंद्र काही अंश प्रकाशमान दिसतो आणि काही अंशी चंद्रावर अंधार पडल्याचे जाणवते. या अवस्थेला खगोलीय भाषेत ‘खंडग्रास’ चंद्रग्रहण असे म्हणतात. तसेच अंशिक चंद्रग्रहण असाही शब्दप्रयोग केला जातो. याउलट स्थिती म्हणजे पृथ्वीची पूर्ण सावली चंद्रावर जेव्हा येते तेव्हा खग्रास चंद्रग्रहण होतो.

निव्वळ अंधश्रद्धाच...चंद्रग्रहण असो किंवा सूर्यग्रहण असो त्या कालावधीत कुठल्याही प्रकारे अन्नपदार्थ दूषित होत नाहीत किंवा त्यामध्ये जंतुंची वाढदेखील होत नाहीत. बुवाबाजी करणा-यांनी चंद्र व सूर्यग्रहणासंदर्भात विविध अंधश्रद्धा समाजात पसरविल्या असून, त्याला वैज्ञानिकदृ्या व प्रयोगाअंती कोणताही आधार नसल्याचे सिद्ध झाले आहे.

- किरणकुमार जोहरे, भौतिकशास्त्रज्ञ