शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

निकालाच्या सूत्राने उडविली बारावीच्या विद्यार्थ्यांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : बारावीच्या निकालाचे सूत्र ३०-३०-४० टक्के म्हणजे दहावी ३० टक्के, अकरावी ३० टक्के आणि बारावी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : बारावीच्या निकालाचे सूत्र ३०-३०-४० टक्के म्हणजे दहावी ३० टक्के, अकरावी ३० टक्के आणि बारावी ४० टक्के असे ठरले आहे. तिन्हीचे मिळून विद्यार्थ्यांना ॲव्हरेज गुण मिळणार आहेत. याचाच फटका बसण्याची चिंता विद्यार्थ्यांना लागली आहे.

बारावीसाठी गुणदान करताना दहावीतील सर्वाधिक गुण असलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण ३० टक्के प्रमाणात, अकरावीचे वार्षिक विषयनिहाय गुण ३० टक्के, तसेच बारावीतील वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय गुण ४० टक्के, असे एकूण १०० टक्के गुणांचे गुणदान केले जाणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना दहावीला चांगले गुण मिळतात. परंतु ते अकरावीला थेट बारावीच्या अभ्यासक्रमाची आणि पुढील स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. अकरावीच्या अभ्यासक्रमावर फारसे लक्ष केंद्रित करीत नाहीत. त्यामुळेे विद्यार्थ्यांना दहावीत चांगले गुण असूनही अकरावीत कमी गुण मिळतात. परंतु, सध्याच्या निकाल पद्धतीत अकरावीचे गुणही गृहित धरले जाणार असल्याने त्याचा परिणाम बारावीच्या गुणवत्तेवर होऊन विद्यार्थ्यांचे अप्रत्यक्ष नुकसान होणार असल्याची चिंता विद्यार्थ्यांना सतावत आहे.

---

जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी...

सीबीएसई बारावीतील विद्यार्थी - १५७०

मुले - ८१५

मुली - ७५५

---

स्टेट बोर्डचे विद्यार्थी - ६७९१८

मुले - ३६६३४

मुली -३१२८४

-----

३० टक्के सूत्र गणित बिघडविणार !

बारावी निकालाचे सूत्र अकरावी आणि दहावीच्या गुणांवर आधारित असल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढविली आहे. अनेक विद्यार्थी अकरावीला फारसा अभ्यास न करता थेट बारावीच्या परीक्षेवर लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे अशाप्रकारे गुणदान झाले, तर विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितच फटका बसू शकतो.

- संजय कदम, विद्यार्थी, उपनगर

बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुणदान हे अकरावी व बारावीच्या अंतर्गत परीक्षा, प्रॅक्टिकलच्या आधारे केले जाणार आहे. परंतु, यंदा प्रॅक्टिकल झालेले नाही. त्यामुळे गुणदान कसे करणार, याची माहिती अद्याप शाळेकडून मिळालेली नाही. शिवाय दहावीनंतर विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास वाढून तो अधिक गुण मिळविण्यास सक्षम बनू शकतो. अशा मूल्यांकनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.

- तनुश्री डोंगरे, विद्यार्थिनी, इंदिरानगर

विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा

- अनेक विद्यार्थी अकरावीचे वर्ष हे रेस्ट ईयर समजून अभ्यासाकडे फारसे लक्ष देत नाहीत. या विद्यार्थ्यांचे लक्ष प्रामुख्याने दहावी व बारावीच्या परीक्षांसोबत जेईई, नीट, सीईटीसारख्या प्रवेशपरीक्षांवर केंद्रित असते. ते अकरावी सहजपणे उत्तीर्ण करतात. परंतु, गुणसंपादनाकडे फारसे लक्ष देत नाहीत. अशा विद्यार्थ्यांचे यावर्षी तीन वर्षांच्या मूल्यांकनामुळे नुकसान होणार आहे. परंतु बारावीनंतरचे बहुतेक सर्वच अभ्यासक्रम सीईटीआधारे होणार असल्याने विद्‌यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

- अनेक विद्यार्थ्यांना दहावीला चांगले गुण मिळतात. परंतु ते अकरावीला थेट बारावीच्या अभ्यासक्रमाची आणि पुढील स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. अकरावीच्या अभ्यासक्रमावर फारसे लक्ष केंद्रित करीत नाहीत. त्यामुळेे विद्यार्थ्यांना दहावीत चांगले गुण असूनही अकरावीला कमी गुण मिळतात. परंतु, सध्याच्या निकाल पद्धतीत अकरावीचे गुणही गृहित धरले जाणार असल्याने त्याचा परिणाम बारावीच्या गुणवत्तेवर होऊन विद्यार्थ्यांचे अप्रत्यक्ष नुकसान होणार आहे. परंतु विद्यार्थ्यांनी पुढील प्रवेश प्रक्रिया तसेच पदवी अभ्यासक्रमांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला विविध महाविद्यालयांतील प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.