शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वीज कडाडताच मोबाइल बंद करा; झाडांपासून दूर रहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:11 IST

नाशिक : पावसाळ्यात आकाशात वीज चमकत असतात, तर अनेकदा वीज जमिनीवर कोसळून मोठी दुर्घटना घडते. वीज पडल्यामुळे मनुष्यहानी ...

नाशिक : पावसाळ्यात आकाशात वीज चमकत असतात, तर अनेकदा वीज जमिनीवर कोसळून मोठी दुर्घटना घडते. वीज पडल्यामुळे मनुष्यहानी तसेच जनावरेदेखील मृत्युमुखी पडत असतात. या नैसर्गिक आपत्तीला रोखता येत नसले तरी आपण आपली काळजी घेणे अपेक्षित आहे. आकाशातील विजेबाबत अनेक गैरसमज समाजात असल्यानेदेखील काही दुर्घटना घडल्या.

पावसाळ्यात वीज अंगावर पडण्याचा धोका लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडूनदेखील आवाहन केले जाते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज अटकाव यंत्रेदेखील बसविण्यात आलेली आहेत. उंच इमारतींवरदेखील अशा प्रकारचे नियोजन केले जाते. शहरापेक्षा ग्रामीण भागातील शेतमळ्यात, डोंगरमाथा तसेच झाडांवर वीज पडून अपघात होण्याच्या घटना अधिक घडतात.

--इन्फो--

वीज कडाडताना घ्या अशी काळजी

आकाशात वीज चमकत असताना शक्यतो घरातील विजेची उपकरणे बंद करावीत, अशावेळी विजेवर चालणाऱ्या वस्तूंची दुरुस्ती, जोडणी अथवा वायरींशी खेळ करू नये, वीज पटकन अशा यंत्रणाकडे आकर्षित होत असल्याने त्यांचा वापरही यावेळी करू नये, अशावेळी पाण्यात उभे राहू नये, फोटो काढण्यासाठी मोबाइलचा वापर करूच नये, मोबाइलमध्ये वीज खेचली जाण्याचा धोका असतो.

--काेट--

वीज चमकत असताना झाडाखाली, विजेच्या खांबाखाली थांबू नये. कारण येथून वीज पास होऊ शकते. पतंगदेखील उडवू नये, गच्चीवर असाल तर खाली यावे, शक्यतो उंचावर, मोकळ्या मैदानात थांबणे धोक्याचे ठरते.

-अजित टक्के, मराठी विज्ञान परिषद.

--इन्फो--

जिल्ह्यातील वीज अटकाव यंत्रणा

जिल्ह्यात आकाशातील विजेमुळे दुर्घटना होऊ नये याबाबतची दक्षता घेतली जाते. पावसाळ्यात याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते. जिल्हा प्रशासनाने याबाबतचा कृती आराखडादेखील तयार केला आहे. जिल्ह्यात २५ ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा कार्यन्वित आहे. जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इमारतींवर ही यंत्रणा कार्यान्वित आहे. त्याप्रमाणे प्रत्येक तहसील कार्यालयातही यंत्रणा बसविण्यात आली आहे.

--इन्फो--

वीज पडल्याने घडणाऱ्या घटना नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो अर्थात एनसीआरबीची आकडेवारी पाहिल्यास भारतात २०१७ मध्ये २८२५, २०१८ मध्ये २३५७ आणि २०१९ मध्ये २,८७६ इतक्या जणांचा वीज पडल्यामुळे मृत्यू झाला आहे. टेलिफोन किंवा विजेच्या खांबांखाली थांबू नका ते विजेला आकर्षित करतात.

विजा चमकत असताना मोबाइल फोनचा वापर करू नये.

--इन्फो--

वीज पडून मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या वारसाला राज्य शासनाकडून चार लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली जाते. महसूल, मदत व पुनर्वसन विभागातर्फे ही माहिती दिली जाते. ‌विजेमुळे ६० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व आलेल्या व्यक्तीस दोन लाख रुपयांची मदत दिली जाते. वीज पडून ४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास ५९ हजार १०० तर ६० टक्केपेक्षा अधिक अपंगत्व आल्यास दोन लाखांची मदत मिळते. एका आठवड्यापेक्षा जादा काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल असल्यास १२ हजार ७०० तर एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी चार हजार ३०० रुपये इतकी मदत मिळते.