शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

पाण्याअभावी उद्योग अडचणीत

By admin | Updated: May 29, 2016 00:29 IST

टंचाईची झळ : उद्योजकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

 सातपूर : गेल्या पंधरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याअभावी उद्योजकांचे प्रचंड हाल होत आहेत. पाण्याअभावी उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. उद्योग वाचविण्यासाठी दोन दिवसांत पाण्याचे आवर्तन सोडण्याची कळकळीची मागणी सिन्नरच्या त्रस्त उद्योजकांनी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांच्याकडे केली आहे.सिन्नर निमाचे अतिरिक्त उपाध्यक्ष अरु ण चव्हाणके, चिटणीस आशिष नहार, किरण जैन, मनीष रावळ, व्हीनस वाणी यांच्या नेतृत्वाखाली उद्योजकांच्या शिष्ठमंडळाने शुक्रवारी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांची भेट घेतली. धरणांमध्ये पाण्याचा साठा कमी असल्यामुळे औद्योगिक वसाहतीत पाणी कपात करण्यात आली आहे. माळेगाव औद्योगिक वसाहत पाण्यामुळे ठप्प झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही, त्यामुळे उद्योगांवर विपरीत परिणाम होत आहे. आर्थिक उलाढाल मंदावली आहे. उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्याने बेरोजगारी वाढणार असून, पर्यायी नियोजन करून नियमाप्रमाणे उद्योगासाठीचे आरक्षित पाण्याचे आवर्तन सोडण्याची आग्रही मागणी या उद्योजकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यावेळी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता पी. आर. बंडूपीया, उपभियंता नरवाडे उपस्थित होते. याबाबत लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी या उद्योजकांना दिल्याची माहिती निमा पदाधिकाऱ्यांनी दिली. (वार्ताहर)