शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2016 23:07 IST

त्र्यंबकेश्वर : नागरिकांच्या मदतीसाठी समाजसेवकांचाही पुढाकार

 त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर शहर व परिसरात सध्या पाण्याची टंचाई भासत असून, जो तो आपल्यापरीने पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. त्र्यंबक नगर परिषद, पालिका पदाधिकारी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांबरोबरच येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले वैद्यकीय व्यावसायिक डॉ. किरण कांबळे व डॉ. पंकज बोरसे यांनी पाण्याचे स्रोत श्रमदानाने प्रसंगी पदरमोड करून लोकांसाठी व भाविकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.गेल्या वर्षाच्या तुलनेत त्र्यंबकेश्वरला अत्यंत कमी पाऊस (१४०० मि.मी.) झाला. त्र्यंबकेश्वर पाणीपुरवठा करणारे अहिल्या धरण, अंबोली धरण बेझे (गौतमी प्रकल्प) यातील पाणी कमी झाले. अहिल्या धरण तर पूर्ण सुकले आहे. साहजिकच त्र्यंबकला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. अंबोली धरणाचे पाणी जुलैपर्यंत पुरेल, असा अंदाज आहे.पाणीटंचाई दूर करण्यासाठी त्र्यंबकेश्वरमधील समाजसेवकांनी आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून त्र्यंबकेश्वरमधील प्रसिद्ध गंगाद्वार जवळील सूर्यकुंड गाळाने प्रचंड भरले होते. साहजिकच त्यातील पाणीही दूषित झाले होते. डॉ. बोरसे व डॉ. कांबळे या डॉक्टरांसोबत सुभाष कांबळे, गणेश पाटील, विजय गंगापुत्र, बाळासाहेब अडसरे, डॉ. मनोज गायकवाड, दिलीप माळी व विद्यमान उपनगराध्यक्ष संतोष कदम, मनोज काळे, आदिंनी गंगाद्वार परिसरातील वस्तीवरील स्थानिक रहिवाशांच्या सहकार्याने सूर्यकुंड पूर्णत: स्वच्छ केले. आज या कुंडात स्वच्छ व नितळ पाणी उपलब्ध झाले आहे. या कुंडाच्या पाण्याचा उपयोग स्थानिक रहिवासी यांना तर होतच आहे तथापि येणाऱ्या हजारो यात्रिकांना होत आहे, नव्हे त्यांची तृष्णा भागवित आहे.गंगाद्वार परिसरातीलच मेटघर किल्ला, गंगाद्वारची मेट, विनायक खिंड मेट, सुपलीची मेट, महादरवाजाची मेट येथेदेखील पाणीटंचाईने उग्रस्वरूप धारण केले आहे. एक वेळेस गावात टॅँकर आदिंनी पाणीपुरवठा होऊ शकेल पण डोंगरावरील वस्त्यांवर पाणीपुरवठा करणे जिकिरीचे असते. मात्र या समाजसेवकांनी अन्य सेवाभावी संस्थांच्या मदतीने बाळासाहेब सावंत, मनोज काळे यांनी नाशिक येथील माहेश्वरी महिला मंडळाच्या सहकार्याने टॅँकरने पाणी उपलब्ध करून दिला.या महिलांना जवळपास दोन कि.मी. पायपीट करावी लागत होती. या महिलांची पाण्यासाठी होणारी ससेहोलपट थांबविण्यासाठी डॉ. पंकज बोरसे, डॉ. किरण कांबळे यांनी तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांची कायमस्वरूपी नळपाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी शासनाच्या जलस्वराज्य किंवा अन्य प्रकल्पातून राबविता येईल किंवा काय याबाबत भेट घेतली.शहरात आज जल साठ्याचे खोलीकरण स्वच्छता करण्यासाठी त्र्यंबक नगर परिषद पालिका पदाधिकारी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट आदिंनी अहल्या धरण, मुकुंद तलाव, बिल्वतीर्थ (त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट) या बरोबरच काही तीर्थे आदिंची खोली वाढविणे, सफाई करणे वगैरे उपक्रम हाती घेतले आहेत. हेतू एकच पाण्याचा साठा वाढविणे, जलस्त्रोत निर्माण करणे त्यातलाच हा प्रकार असून गंगाद्वार-ब्रह्मगिरी परिसरात पाण्याचे उद्भव निर्माण करणे, असलेल्या पाण्याच्या साठ्यात वाढ करणे वगैरेंचे काम या सामाजिक कार्यकर्त्यांनी श्रमदानाने व पदरमोड करून सुरू केले आहे.(वार्ताहर)