शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
3
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
4
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
5
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
6
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
7
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
8
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
9
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
10
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
11
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
12
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
13
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
14
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
15
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
16
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
17
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
18
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
19
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
20
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार

विश्वस्तपदाचा वाद न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:30 IST

श्री काळाराम संस्थान विश्वस्त मंडळाच्या विश्वस्तपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने दहा विश्वस्तांच्या जागांपैकी अध्यक्षांनी निवडलेल्या तीन जागांवर एका माजी विश्वस्ताने हरकत घेत उच्च न्यायालयात दावा दाखल केल्याने तिघा विश्वस्तांची निवड वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

ठळक मुद्देकाळाराम मंदिर : माजी विश्वस्तांनी घेतली हरकत

पंचवटी : श्री काळाराम संस्थान विश्वस्त मंडळाच्या विश्वस्तपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने दहा विश्वस्तांच्या जागांपैकी अध्यक्षांनी निवडलेल्या तीन जागांवर एका माजी विश्वस्ताने हरकत घेत उच्च न्यायालयात दावा दाखल केल्याने तिघा विश्वस्तांची निवड वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.काळाराम विश्वस्त मंडळ सहा वर्षांसाठी असते. त्यात विश्वस्त मंडळाच्या एकूण दहा जागा असून, त्यात घटनेनुसार जिल्हा व सत्र न्यायाधीश हे संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. विश्वस्तांच्या दहा जागांपैकी तीन जागा या पुजारी घराण्यातील, तर तीन विश्वस्त जुन्या विश्वस्तातून निवडण्याचे अधिकार अध्यक्षांना आहेत व उर्वरित चार जागा धर्मादाय आयुक्तांकडून निवडल्या जातात. अध्यक्षांनी जुन्या विश्वस्त मंडळातील मंदार जानोरकर, वैद्य एकनाथ कुलकर्णी, दत्तप्रसाद निकम यांची अलीकडेच नियुक्ती केली आहे.२०१९ ते २५ या सहा वर्षांच्या कालावधीसाठी व घटनेत नमूद असलेल्या जुन्या सदस्यातून ३ सदस्य निवडताना १४ आॅक्टोबर २०१९ रोजी बैठकीचा अजेंडा काढला आहे. त्यात बैठकीचे ठिकाण जिल्हा न्यायालयातील त्यांच्या स्वत:च्या निजी कक्षात दर्शविले आहे. मुळात संस्थेची बैठक अशा न्यायालय आवारात निजी कक्षात घेता येत नाही.दरम्यान, धमार्दाय आयुक्तांकडून नियुक्त केल्या जाणाºया चार जागांसाठी तब्बल ७२ इच्छुकांनी अर्ज केले होते. त्यातून सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त शांताराम अवसरे, अ‍ॅड. दिलीप कैचे, शुभम मंत्री आणि डॉ. मिलिंद तारे या चौघांची निवड करण्यात आली. तर पुजारी घराण्यातून धनंजय पुजारी, मंगेश पुजारी, नरेश पुजारी यांची निवड करण्यात आली आहे.संस्थेच्या पैशाचा गैरवापरदत्तप्रसाद निकम हे संस्थेचे संचालक असताना त्यांनी संस्थेच्या कार्यक्रमात पत्नीच्या नावे गायनापोटी ११ हजार रुपये मानधन मिळवून दिले आहे. संस्थेच्या संचालकांनी स्वत:च्या किंवा कुटुंबातील कोणतीही व्यक्तीसाठी संस्थेच्या पैशांचा वापर करणे हे मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायद्याने गुन्हा असल्याची हरकत माजी विश्वस्त पांडुरंग बोडके यांनी घेत न्यायालयात दावा दाखल केला आहे.धर्मादाय आयुक्तांनी चौघा विश्वस्तांची निवड केली, मात्र त्यांचा काळाराम मंदिराशी काही एक संबंध नाही. अनेक जण वर्षानुवर्षे देवाची सेवा करतात त्यांना संधी दिली गेली पाहिजे होती. स्थानिकांना डावलून कोणत्या निकषावर विश्वस्त नियुक्त केले हे स्पष्ट होणे गरजेचे आहे.- रावसाहेब कोशिरे, अध्यक्ष,रास्ते आखाडा तालीम संघ

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळे