शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

ट्रक २५ फूट खड्ड्यात कोसळला

By admin | Updated: May 15, 2015 23:51 IST

हरसूलचे तीन ठार : आठंबेनजीकची घटना; पाच गंभीर

 कळवण : नांदुरी रस्त्यावरील आठंबे गावानजीक घाटातील वळणावर बालभारती नाशिक येथून शालेय पुस्तके घेऊन कळवणकडे निघालेल्या आयशर ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने ट्रक २५ फूट खड्ड्यात कोसळून उलटल्याने तीन जणांचा मृत्यू, तर पाच गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. नाशिक येथून बालभारतीमधून शुक्रवारी सकाळी ११ वाजता कळवण येथील पंचायत समितीत पाठ्यपुस्तके घेऊन येणारा आयशर ट्रक (क्र. एमएच १५ सीके-५९४०) आठंबेपासून एक किमी अंतरावरील घाटातील शेवटच्या धोकादायक वळणावरून चालकाचा ताबा सुटल्याने २५ फूट वळणावरील खड्ड्यात जाऊन उलटला.  ह्या ट्रक मध्ये असलेले आठ जण ट्रक व पुस्तके यांच्याखाली दाबले गेले. घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनातील लोकांच्या मदतीने ट्रक सरळ करून दाबल्या गेलेल्या व्यक्तींना बाहेर काढले मात्र ह्या घटनाक्र मात रोहिदास चिमणा हिलीम (२० ), धाकलु सीताराम पानगे (२०) रा. सर्व गोलदरी हरसुल, जि. नाशिक हे दोघे जागीच ठार झाले तर नाशिक येथे औषधोपचार दरम्यान संतोष यशवंत कामडी (२०) यांचा मृत्यु झाला. राजाराम शंकर कामडी (१७ ), तुषार सुरेश कामडी (२० ), भागिरथ गोपाळ गहवाळ (१७ ), गोकुळ विष्णू धोंडगे (२५ ) मनोहर गंगाराम कामडी (१८) सर्व रा. गोलदरी ता. हरसूल हे जखमी झाले. पुढील तपास कळवणचे पोलीस निरीक्षक मधुकर गावित यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण पोलीस करीत आहे