शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

कमी विवाह मुहूर्तामुळे मंगल कार्यालय, केटरिंग व्यावसायिक येणार अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 16:02 IST

अवघे ६४ विवाह मुहूर्त : उलाढालीवर होणार परिणाम, वधूपालकही चिंतेत

ठळक मुद्दे गुरू-शुक्राचा अस्त, चतुर्मास आणि त्यात अधिक ज्येष्ठ मास येत्या २१ नोव्हेंबरपासून लग्नाचे बार उडण्यास सुरुवात होणार

नाशिक : गुरू-शुक्राचा अस्त, चतुर्मास आणि त्यात अधिक ज्येष्ठ मास यामुळे येत्या वर्षभरात अवघे ६४ विवाह मुहूर्त असल्याने मंगल कार्यालये, लॉन्ससह केटरिंग व्यवसाय अडचणीत सापडणार आहे. विवाह सोहळ्याशी संबंधित व्यवसायातील कोट्यवधीची उलाढालही मंदावणार असून, दाट लग्नतिथीमुळे सर्व योग जुळवून आणताना वधूपालकांची दमछाक होण्याची चिन्हे आहेत.तुळशीचे लग्न आटोपल्यानंतर आता येत्या २१ नोव्हेंबरपासून लग्नाचे बार उडण्यास सुरुवात होणार आहे. १२ डिसेंबर २०१७ नंतर पौष महिन्यात विवाहाचे मुहूर्त नाहीत. त्यामुळे थेट ५ फेबु्रवारी २०१८ रोजीच विवाह मुहूर्त आहे. १४ मार्चनंतर पुन्हा चैत्र महिन्यात मुहूर्त नाहीत. दि. १६ डिसेंबर २०१७ ते १ फेबु्रवारी २०१८ दरम्यान शुक्राचा अस्त, दि. १६ मे ते १३ जून २०१८ या कालावधीत ज्येष्ठ अधिक मास, दि. २३ जुलै ते २० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत चतुर्मास आणि दि. १५ नोव्हेंबर ६ डिसेंबर २०१८ या दरम्यान गुरूचा अस्त असल्यामुळे विवाह मुहूर्त नाहीत. त्यामुळे वर्षभरात केवळ ६४ विवाह मुहूर्त असणार असून, या मुहूर्तावर लग्नाचा बार उडवताना वधू-वर पित्यांची चांगलीच दमछाक होताना दिसून येणार आहे. कमी विवाह मुहूर्त असल्यामुळे विवाह सोहळ्याशी संबंधित मंगल कार्यालये, लॉन्सचालक, केटरिंग व्यावसायिक, स्टेज सजावटकार यापासून ते पुरोहितापर्यंत सारेच आर्थिक अडचणीत सापडणार आहेत. आधीच नोटाबंदीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीतून अद्यापही मंगल कार्यालयासह केटरिंग व्यावसायिक मंदीच्या परिस्थितीतून बाहेर आलेले नाही. त्यात घटत्या विवाह मुहूर्तांमुळे व्यावसायिकांच्या आणखी चिंता वाढणार आहेत. विवाह सोहळ्याशी निगडित छायाचित्रकार, सजावटकार, फुलविक्रेते, पुरोहित आदी छोटे व्यावसायिकही अडचणीत येणार आहेत. दाट लग्नतिथीच्या दिवशी संबंधित व्यावसायिकांची सुविधा पुरविताना दमछाक होणार आहे. विवाह मुहूर्तांची संख्या कमी असल्यामुळे आतापासूनच पुढील वर्षाच्या तारखांना मंगल कार्यालयांसह केटरिंग व्यावसायिकांचे बुकिंग सुरू झाले असून, अपेक्षित मंगल कार्यालय मिळविताना वधूपित्यांची दमछाक होताना दिसून येत आहे.२०१८ मध्ये विवाह मुहूर्त कमी गुरू-शुक्राचा अस्त काळ आणि अधिक मासात विवाह केले जात नाहीत. सन २०१८ मध्ये विवाह मुहूर्त कमी आहेत. त्यामुळे प्रत्येक मुहूर्तावर विवाहांची संख्या जास्त राहील. तुळशीचा विवाह आटोपल्यानंतर आता लग्नाचे बार उडण्यास सुरुवात होईल. विवाह मुहूर्त कमी असल्यामुळे एकाच तारखांना मंगल कार्यालय, केटरिंग, गुरुजी आदी सुविधा उपलब्ध होण्यास अडचणी येतील.- जितेंद्र चित्राव, ज्योतिष अभ्यासक

आर्थिक फटका बसणार

सर्वसाधारणपणे वर्षभरात १०० मुहूर्त असले की, ४० ते ५० तारखांना बुकिंग होते. यंदा मात्र, मुहूर्तांची संख्या निम्म्यावर आल्याने बुकिंग आणखी घटणार आहे. त्यामुळे साहजिकच मंगल कार्यालयांना आर्थिक फटका बसणार आहे. मंगल कार्यालय अधिक दिवस रिकामे राहिले तर देखभालीचा जास्त खर्च येतो. याशिवाय वीज, पाणी यांचाही खर्च असतोच. मजुरांचेही वेतन द्यावे लागते.- प्रकाश माळोदे, संचालक, शेवंता लॉन्स, नाशिक