शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

त्रिपूर वातींनी उजळणार ‘त्रिपुरारी’

By admin | Updated: November 6, 2014 00:21 IST

दीपोत्सव : गोदाघाटावर दीपदानासाठी थाटली दुकाने

नाशिक : सज्जनांचे रक्षण करत दुष्टांचे निर्दालन करा, हा सामाजिक संदेश देणाऱ्या ‘त्रिपुरारी’ पौर्णिमेनिमित्त गुरुवारी (दि. ६) शहरातील गोदाघाटासह मंदिरांचा कोपरान्कोपरा त्रिपुरी वातींनी प्रकाशमान होणार असून, विविध धार्मिक विधींचेही आयोजन करण्यात आले आहे. त्रिपुरारी पौर्णिमेबाबत लोककथा सांगितली जाते. त्रिपूर नावाच्या असुराची आकाशसंचारासह तीन पुरे अर्थात नगरे होती. ब्रह्मदेवाने या असुराला देवता, मनुष्य, निशाचर किंवा रोग यांच्यापासून मरण नसल्याचा वर दिला होता. परंतु या असुराने नंतर आपला उन्मत्तपणा दाखविण्यास सुरुवात केली. तेव्हा सर्व देवांनी भगवान शंकराला साकडे घातले. शंकराने त्रिपूर असुराची तिन्ही पुरे जाळून टाकली आणि त्याचा नायनाट केला. तो दिवस कार्तिकी पौर्णिमेचा होता. त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते. त्रिपूर असुराचा संहार झाल्याबद्दल ही पौर्णिमा दीप पेटवून साजरी केली जाते. त्रिपुरारी पौर्णिमेला कार्तिकेय स्वामींचे दर्शन घेतले जाते. गंगास्नान केले जाते आणि ब्रह्मवृंदाना दीपदान करण्याची प्रथा आहे. मत्स्यावतारही याच दिवशी झाल्याची आख्यायिका सांगितली जात असल्याने त्याचाही आनंद साजरा केला जातो. कार्तिकी पौर्णिमेला प्रदोष काळी त्रिपुरासुराला ठार मारले असल्याने त्याचा आनंदोत्सव म्हणून दिवाळीप्रमाणेच मंदिरे, नदीकिनारी दीप प्रज्वलित केले जातात. शिवमंदिरांसमोर त्रिपूर वातींनी परिसर प्रकाशमान केला जातो. दीपमाळ दिव्यांनी सजविली जाते. याचबरोबर नदीच्या पात्रातही प्रज्वलित केलेले दीप सोडण्याची प्रथा आहे. तसेच ‘त्रिपूरज्वलन’ हे व्रत केले जाते. शिवापुढे वाती लावणे, वाती जाळणे, दीपपात्री दान करणे असा विधी शास्त्रात सांगितला आहे. उत्तर भारतात त्रिपुरारी पौर्णिमा स्कंद जयंती म्हणून साजरी केली जाते, तर दक्षिण भारतात त्रिपुरारी पौर्णिमेला कृतिका महोत्सव साजरा होतो. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात नरकासुर, त्रिपुरासुर आणि अन्य असुरांचा देवादिकांनी वध केल्याने दीपावलीपासून दीपप्रज्वलन करण्याची परंपरा सुरू झाली. त्रिपुरारी पौर्णिमेला दीपावलीची सांगता होत असते. समाजातील दुष्ट प्रवृत्ती जाळून टाका, असा सामाजिक संदेश त्रिपुरी वातींनी जाळून दिला जातो. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गोदाघाट दिव्यांनी उजळणार असून, सायंकाळी नदीपात्रात दीप सोडण्यासाठीही महिलावर्गाची मोठी गर्दी उसळणार आहे. सोमेश्वरजवळील बालाजी मंदिरही त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सहस्त्र दिव्यांनी उजळून निघणार आहे. (प्रतिनिधी)