शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

ट्रीपल लेअर मास्क अत्यावश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:15 IST

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रकोपात सर्वाधिक महत्त्वाच्या बाबींमध्ये मास्क, सुरक्षित अंतर आणि हातांची स्वच्छता यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यातही ...

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रकोपात सर्वाधिक महत्त्वाच्या बाबींमध्ये मास्क, सुरक्षित अंतर आणि हातांची स्वच्छता यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यातही मास्क हा ट्रीपल लेअरचा असणे नागरिकांना अधिक सुरक्षित करते.

प्रत्येक नागरिकाने आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करणे काळाची गरज झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकाला जर सुरक्षित राहायचे असेल तर त्या व्यक्तीने थंड पदार्थांपासून स्वत:ला कटाक्षाने दूर ठेवणे आवश्यक आहे. मुळात घराबाहेरचे खाद्यपदार्थ पूर्णपणे वर्ज्य करावेत. तसेच घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने सकाळ आणि संध्याकाळ असे दोनवेळा तर घरीच असणाऱ्या व्यक्तींनी दिवसातून किमान एकदा तरी वाफ घ्यावी. तसेच बाहेरून घरी आल्यानंतर प्रत्येक नागरिकाने त्यांचे कपडे स्वत:च गरम पाण्यात भिजवावेत. अत्यंत आवश्यकता असेल तेव्हाच घराबाहेर पडण्याबाबत स्वत: नागरिकांनीच ठाम राहायला हवे. तसेच घरी अत्यंत सकस आणि संतुलित आहाराचा समावेश असावा. त्यात पुरेशा प्रमाणात प्रथिनांचा समावेश असणे आवश्यक आहे. तसेच दररोज किमान सात तासाची झोप घेणेदेखील अत्यावश्यक आहे. सकाळी आणि रात्री दररोज कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे आवश्यक आहे. पाण्याने नागरिकांनी अधिकाधिक प्रमाणात दक्षता बाळगतानाच या साध्यासोप्या उपायांचा अवलंब केल्यास त्यांचा निश्चितपणे फायदा होऊ शकतोे. तसेच प्रत्येक नागरिकाने लसीकरणाचे दोन डोस निर्धारित कालावधीत पूर्ण करून घेतल्यास ते कोरोनापासून स्वत:चा बचाव करू शकतात.

डॉ. अनंत पवार. जिल्हा कोरोना नोडल अधिकारी

फोटो

२६ डॉ. पवार