शहरं
Join us  
Trending Stories
1
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
2
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
3
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
4
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
5
महापालिका निवडणुकीस BJP सज्ज, कार्यकर्त्यांना नवे बळ; संघटनबांधणी मजबूत, पक्षशक्ती भक्कम
6
मुकेश अंबानींची रोजची कमाई किती? आकडा वाचून बसेल धक्का; दर तासाला कुठून येतात कोट्यवधी रुपये
7
धक्कादायक! उत्तर प्रदेशातील 'ब्लू ड्रम'नंतर आता उत्तराखंडमध्ये पत्नीने पेट्रोल ओतून पतीला जाळले
8
“उद्धव ठाकरे महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का?”; युती चर्चांवर मनसे नेत्याचा थेट सवाल
9
ट्रम्प टॅरिफचा पहिला धक्का! 'ही' दिग्गज कंपनी ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढणार
10
सर्वोच्च न्यायालयाचा अपमान, निशिकांत दुबे अडचणीत; कारवाई होणार? भाजपने हात झटकले...
11
झांबियामध्ये १९ कोटी रुपये अन् ४ कोटींचे सोने घेऊन जाताना भारतीयाला पकडले; दुबईला जाण्याच्या तयारीत होता
12
घरगुती मीटरवर इलेक्ट्रीक कार चार्ज केली; केला २५००० चा दंड, कार मालक रडकुंडीला आला...
13
IPL 2025 : सतरावं वरीस मोक्याचं! युवा क्रिकेटरच्या 'विरार टू चेन्नई व्हाया मुंबई' प्रवासाची गोष्ट
14
मुकेश अंबानींच्या रिलायन्सपासून ते टाटा ग्रुपपर्यंत, या १० कंपन्यांनी फक्त ३ दिवसांत कमावला मोठा नफा
15
वैजापूरमध्ये पहाटे थरार! चोरीच्या प्रयत्नात बँक जळून खाक...खातेदारांच्या पैशांचे काय होणार?
16
वैभव सूर्यवंशीच्या धडाकेबाज खेळाने गुगलचे सीईओही भारावले, सुंदर पिचाई कौतुक करत म्हणाले, "वयाच्या १४ व्या वर्षी…’’  
17
पंचग्रही योगात नववर्षाचे पहिले पंचक: ५ दिवस प्रतिकूल, अशुभ; ५ कामे टाळा, नेमके काय करू नये?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
19
पुण्यात कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, वॉटर पार्कमध्ये झिपलायनिंग करताना...
20
भीषण अपघात! लग्नावरून परतणाऱ्या तरुणांची कार गॅस टँकरला धडकली, २ जणांचा मृत्यू ,एक जखमी

त्र्यंबकेश्वरला उटीची वारी अर्थात वरु थिनी एकादशी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 19:56 IST

त्र्यंबकेश्वर : आज दुपारी दोन वाजता संत निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीला थंडगार सुवासिक चंदनाच्या उटीचा व विविध सुवासिक आयुर्वेदिक वनौषधींचा लेप चढविण्यात आला. तर उन्हाचा दाह या लेपानंतर शांत झाल्यानंतर रात्री बारानंतर तिच उटी उतरवली जाते. ती अंगावर पडल्यानंतर तच उटीचा प्रसाद होय.

ठळक मुद्देसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीला चंदन,वनौषधांचा चढविला लेप

त्र्यंबकेश्वर : आज दुपारी दोन वाजता संत निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीला थंडगार सुवासिक चंदनाच्या उटीचा व विविध सुवासिक आयुर्वेदिक वनौषधींचा लेप चढविण्यात आला. तर उन्हाचा दाह या लेपानंतर शांत झाल्यानंतर रात्री बारानंतर तिच उटी उतरवली जाते. ती अंगावर पडल्यानंतर तच उटीचा प्रसाद होय.श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीला सुगंधी चंदनाच्या उटीसह विविध सुगंधी व थंडगार आयुर्वेदिक वनस्पतींचा चंदनाच्या उटीचा लेप लावण्यासाठी वरु थिनी एकादशीच्या दिवशी लेप चढवितात. त्यालाच उटीची वारी असे म्हणतात.ऐन वैशाखाच्या रणरणत्या उन्हाचा दाह दरवर्षी वाढत असतो. उन्हाच्या या उष्णतेचा त्रास चराचरातील पशुपक्षांना जाणवत असतो. संत श्रीनिवृत्तीनाथ महाराजांनी तर सातशे वर्षांपुर्वी संजीवन समाधी घेतली होती. साहजिकच उन्हाच्या उष्णतेचा प्रभाव संजीवन समाधीला न बसेल तर नवलच ! उन्हाचा दाहच्या झळा संजीवन समाधीला बसत असतील या श्रध्देने वारकरी सांप्रदायिक स:त निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीला हा थंडगार आयुर्वेदिक व सुगधी गुणधर्म असलेल्या चंदनाच्या उटीसह अन्य सुगंधी वनस्पतींचा लेप सुमारे १२ तास चढविला जातो.यासाठी चैत्र कृ.पंचमी पासुनच सुगंधी चंदनाची खोडं उगाळण्यास सुरवात होत असते. त्यासाठी महिला पुरु ष विशेषत: महिला वर्ग अभंग म्हणत सहाणेवर उटी उगाळतात. त्यात सुगंधी वनौषधी द्रव्य घालुन तो लेप उटीच्या स्वरु पात मंगळवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान उटी चढविण्यास प्रारंभ होतो. रात्री १२ वाजेपर्यंत उटीचा लेप समाधीवर असतो. नंतर मात्र उतरविला जातो. तोपर्यंत रात्रीचे एक दिड वाजतात.रात्री बारा वाजता उटी उतरविण्यास प्रारंभ होतो. आणि उतरविलेली उटी उपस्थित वारकऱ्यांच्या अंगावर शिंपडली जाते. तोच प्रसाद म्हणुन भाविकांना दिला जातो. उटीच्या वारीसाठी हजारो वारकरी त्र्यंबकेश्वर येथे येत असतात. नाशिक जिल्ह्यातुन अनेक दिंड्या टाळ मृदंगाच्या गजरात श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरला येथे येत असतात. सर्वत्र हरीनामाचा जयघोष सुरु असतो. उटीच्या वारीला मिनी निवत्तीनाथ यात्रा असेही म्हणतात.निवृत्तीनाथ समाधी परिसरात जत्रा भरलेली असून तेथे हॉटेल्स दुकाने खजुर पेढे केळी पेरु उसाचा रस आदींची दुकाने लावलेली आहेत.या वारीसाठी श्रीनिवृत्तीनाथ समाधी संस्थानचे विश्वस्त मंडळ सज्ज झाले असुन अध्यक्ष पंडीतराव कोल्हे, सचिव जिजाबाई लांडे, पालखी प्रमुख पुंडलिक थेटे, त्र्यंबकराव गायकवाड, संजय धोंडगे, पवन भुतडा, रामभाऊ मुळाणे, डॉ.धनश्री हरदास, ललिता शिंदे, जयंत गोसावी, अविनाश गोसावी, योगेश गोसावी आदी प्रयत्नशील आहे.दरम्यान संत निवृत्तीनाथ मंदीर परिसरात चौकीमाथा येथील ठाकुर विहीरी समोरील श्रीहनुमान मंदीर येथे श्रीहनुमानाची यात्रा भरलेली आहे. त्यामुळे उटीच्या वारीबरोबर श्रीहनुमान यात्रा असल्याने गर्दीत भरच पडत आहे.