शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

त्र्यंबकेश्वरला उटीची वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 18:29 IST

दुपारी दोन वाजता संत निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीला थंडगार सुवासिक चंदनाच्या उटीचा व विविध सुवासिक आयुर्वेदिक वनौषधींचा लेप चढविण्यात आला. तर उन्हाचा दाह या लेपानंतर शांत झाल्यानंतर रात्री बारानंतर तिच उटी उतरवली जाते. ती अंगावर पडल्यानंतर तच उटीचा प्रसाद होय.

ठळक मुद्देसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीला चंदन,वनौषधांचा चढविला लेप

त्र्यंबकेश्वर :  दुपारी दोन वाजता संत निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीला थंडगार सुवासिक चंदनाच्या उटीचा व विविध सुवासिक आयुर्वेदिक वनौषधींचा लेप चढविण्यात आला. तर उन्हाचा दाह या लेपानंतर शांत झाल्यानंतर रात्री बारानंतर तिच उटी उतरवली जाते. ती अंगावर पडल्यानंतर तच उटीचा प्रसाद होय.श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीला सुगंधी चंदनाच्या उटीसह विविध सुगंधी व थंडगार आयुर्वेदिक वनस्पतींचा चंदनाच्या उटीचा लेप लावण्यासाठी वरु थिनी एकादशीच्या दिवशी लेप चढवितात. त्यालाच उटीची वारी असे म्हणतात.ऐन वैशाखाच्या रणरणत्या उन्हाचा दाह दरवर्षी वाढत असतो. उन्हाच्या या उष्णतेचा त्रास चराचरातील पशुपक्षांना जाणवत असतो. संत श्रीनिवृत्तीनाथ महाराजांनी तर सातशे वर्षांपुर्वी संजीवन समाधी घेतली होती. साहजिकच उन्हाच्या उष्णतेचा प्रभाव संजीवन समाधीला न बसेल तर नवलच ! उन्हाचा दाहच्या झळा संजीवन समाधीला बसत असतील या श्रध्देने वारकरी सांप्रदायिक स:त निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीला हा थंडगार आयुर्वेदिक व सुगधी गुणधर्म असलेल्या चंदनाच्या उटीसह अन्य सुगंधी वनस्पतींचा लेप सुमारे १२ तास चढविला जातो.यासाठी चैत्र कृ.पंचमी पासुनच सुगंधी चंदनाची खोडं उगाळण्यास सुरवात होत असते. त्यासाठी महिला पुरु ष विशेषत: महिला वर्ग अभंग म्हणत सहाणेवर उटी उगाळतात. त्यात सुगंधी वनौषधी द्रव्य घालुन तो लेप उटीच्या स्वरु पात मंगळवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान उटी चढविण्यास प्रारंभ होतो. रात्री १२ वाजेपर्यंत उटीचा लेप समाधीवर असतो. नंतर मात्र उतरविला जातो. तोपर्यंत रात्रीचे एक दिड वाजतात.रात्री बारा वाजता उटी उतरविण्यास प्रारंभ होतो. आणि उतरविलेली उटी उपस्थित वारकऱ्यांच्या अंगावर शिंपडली जाते. तोच प्रसाद म्हणुन भाविकांना दिला जातो. उटीच्या वारीसाठी हजारो वारकरी त्र्यंबकेश्वर येथे येत असतात. नाशिक जिल्ह्यातुन अनेक दिंड्या टाळ मृदंगाच्या गजरात श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरला येथे येत असतात. सर्वत्र हरीनामाचा जयघोष सुरु असतो. उटीच्या वारीला मिनी निवत्तीनाथ यात्रा असेही म्हणतात.निवृत्तीनाथ समाधी परिसरात जत्रा भरलेली असून तेथे हॉटेल्स दुकाने खजुर पेढे केळी पेरु उसाचा रस आदींची दुकाने लावलेली आहेत.या वारीसाठी श्रीनिवृत्तीनाथ समाधी संस्थानचे विश्वस्त मंडळ सज्ज झाले असुन अध्यक्ष पंडीतराव कोल्हे, सचिव जिजाबाई लांडे, पालखी प्रमुख पुंडलिक थेटे, त्र्यंबकराव गायकवाड, संजय धोंडगे, पवन भुतडा, रामभाऊ मुळाणे, डॉ.धनश्री हरदास, ललिता शिंदे, जयंत गोसावी, अविनाश गोसावी, योगेश गोसावी आदी प्रयत्नशील आहे.दरम्यान संत निवृत्तीनाथ मंदीर परिसरात चौकीमाथा येथील ठाकुर विहीरी समोरील श्रीहनुमान मंदीर येथे श्रीहनुमानाची यात्रा भरलेली आहे. त्यामुळे उटीच्या वारीबरोबर श्रीहनुमान यात्रा असल्याने गर्दीत भरच पडत आहे.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरReligious programmeधार्मिक कार्यक्रम