शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

त्र्यंबकेश्वर कुंभमेळा शासनाकडून दुर्लक्षित

By admin | Updated: December 23, 2014 22:18 IST

शासनाने साधू-महंतांशी चर्चा न केल्यास जंतरमंतरवर उपोषण करणार

त्र्यंबकेश्वर : कुंभमेळा सात महिन्यांवर येऊन ठेपला आहे. अद्याप एकही काम पूर्ण झाले नसल्याची खंतही साधूंनी व्यक्त केली. जी कामे सुरू आहेत ती समाधानकारक होत नसल्याची तक्रारही बैठकीत केली. ही सर्व कामे पूर्ण होण्यासाठी घाईघाईने कामे केली जात आहेत. पर्यायाने कामांचा दर्जाही घसरत आहे. या कामांचा दर्जा न सुधारल्यास कामे बंद करावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. उत्तर भारतातील कुंभनगरीच्या मंत्र्यांचा महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांनी जरुर आदर्श घ्यावा. राजनाथसिंह, उमाभारती, आजम खान आदि मंत्र्यांनी आपापल्या राज्यातील कुंभमेळ्यांचे केलेले नियोजन कौतुकास्पद ठरले आहे. वास्तविक त्या राज्यांमध्येही भाजपा सरकार आहे. महाराष्ट्रातदेखील भाजपा सरकारच असताना हा विरोधाभास का, असा सवाल येथे झालेल्या दहा आखाड्यांच्या उच्चस्तरीय बैठकीत साधू-महंतांनी उपस्थित केला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वामी सागरानंद सरस्वती होते. सर्वच साधू सरकारवर एकप्रकारे तुटून पडले. महाराष्ट्रात आतापर्यंत जी-जी सरकारे आलीत त्यांच्यापेक्षा सध्याच्या सरकारची कामगिरी खराब असल्याचे साधू-महंतांनी एकमुखाने सांगितले. येथील आनंद तपोनिधी पंचायती आखाड्यात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला येथील दहाही आखाड्यांचे स्थानिक पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त मुख्यालयांमधून वरिष्ठ साधू-महंत आले होते. बैठकीत अनेक मुद्दे चर्चिले गेल. ज्या मुख्यमंत्र्यांना अगर संपर्कमंत्र्यांना कुंभमेळ्याबद्दल ज्ञान नाही अशा मंत्र्यांना पदावर राहण्याचा हक्क नाही, असे सांगून जुना आखाड्याचे महंत हरिगिरीजी यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. महंत नरेंद्रगिरीजी म्हणाले, मध्यंतरी निवडणुकीमळे सिंहस्थ कामात शिथिलता आली. मात्र निदान त्यावेळेस तरी मंत्री, प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे होते. सर्वच साधु पोटतिडीकेने बोलत होते. यावेळी नरेंद्रगिरीजी, आशिषगिरीजी, हरिगिरीजी, प्रेमगिरीजी, उमाशंकर भारती, महंत शंकरानंद सरस्वती , महंत धनराजगिरी, समुद्रगिरीजी, महंत रणधीरपुरीजी, दुर्गानंद ब्रह्मचारी, महानिर्वाणी रामगिरीजी महाराज, महंत उदयगिरीजी, प्रेमानंदजी, विचारवासनी, राजिंदरसिंह तसेच ठाणापती (जुना) महंत पिनाकेश्वरजी, श्यामराव गंगापुत्र, नगरसेवक अभिजित काण्णव, विष्णू दाबाडे आदि उपस्थित होते. शेवटी साधूंनी पुनश्च एकदा चारही शंकराचार्य (चार पीठाचे) यांच्यासह जंतरमंतर (दिल्ली) येथे आमरण उपोषणाचा इशारा दिला. जर महाराष्ट्र शासनाच्या मंत्र्यांनी-मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी चर्चा न केल्यास त्र्यंबकेश्वरला दुर्लक्षित ठेवल्यास नियोजित उपोषण अधीक तीव्र केले जाईल, असे यावेळी ठरविण्यात आले. (वार्ताहर)