शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
2
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
3
YouTube'ने नियम बदलले! आता अशा कंटेंटसाठी पैसे मिळणार नाहीत, जाणून घ्या संपूर्ण माहिती
4
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
5
बीकेसीच्या रिक्षावाल्यानंतर आता कारवाली; कारमध्ये बसून कमावतेय तासाला ₹३५००...
6
Smart Coworking IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला; गुंतवणूकीपूर्वी इश्यू प्राईज, GMP सह जाणून घ्या डिटेल्स
7
सारा तेंडुलकर अन् शुबमन गिल पुन्हा एकत्र; कार्यक्रमाचा VIDEO झाला व्हायरल; चर्चांना उधाण
8
२७ नोव्हेंबरपर्यंत शनि वक्री: ९ राशींना १३८ दिवस लाभ, पद-पैसा; भरघोस भरभराट, भाग्योदय काळ!
9
१०० कोटींची उलाढाल, आलिशान कोठडी अन् सीक्रेट खोली; छांगुर बाबाकडे सापडल्या शक्तिवर्धक गोळ्या
10
EMI वर वस्तू खरेदी करणं किती योग्य? हल्ली अनेकजण करतात हे काम; ईएमआयचं सत्य काय?
11
Maharashtra Politics : ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
12
गुगलमध्ये १.६ कोटी पगार, तरीही 'ती' म्हणते न्यूयॉर्कमध्ये खर्च भागवणं कठीण! भारतीय तरुणीची पोस्ट व्हायरल
13
'चला हवा...'मध्ये अभिनेत्यांनी स्त्री भूमिका केल्या, आता नव्या पर्वात काय? गौरव मोरे म्हणाला, "मी आधीच..."
14
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण
15
२६ वर्षांचे आहात, ५० पर्यंत २ कोटी हवेत? आजपासून कितीची मंथली SIP केल्यास मिळू शकते इतकी रक्कम?
16
PM मोदींचा २७ देशांकडून सन्मान, ८ मुस्लिम देशांचाही समावेश; २०२५ मध्ये विक्रमी कामगिरी...
17
'एक कप और'ची सवय पडेल महागात; गरमागरम चहाच्या नादात माराव्या लागतील हॉस्पिटलच्या चकरा
18
Guru Purnima 2025: आजच्या काळात 'या' गुरूंनाही आहे मोठा मान; तुम्ही कोणाला फॉलो करता?
19
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; वरिष्ठ नेत्यांना भेटणार, राजकीय चर्चांना उधाण
20
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...

त्र्यंबकेश्वर कुंभमेळा शासनाकडून दुर्लक्षित

By admin | Updated: December 23, 2014 22:18 IST

शासनाने साधू-महंतांशी चर्चा न केल्यास जंतरमंतरवर उपोषण करणार

त्र्यंबकेश्वर : कुंभमेळा सात महिन्यांवर येऊन ठेपला आहे. अद्याप एकही काम पूर्ण झाले नसल्याची खंतही साधूंनी व्यक्त केली. जी कामे सुरू आहेत ती समाधानकारक होत नसल्याची तक्रारही बैठकीत केली. ही सर्व कामे पूर्ण होण्यासाठी घाईघाईने कामे केली जात आहेत. पर्यायाने कामांचा दर्जाही घसरत आहे. या कामांचा दर्जा न सुधारल्यास कामे बंद करावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. उत्तर भारतातील कुंभनगरीच्या मंत्र्यांचा महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांनी जरुर आदर्श घ्यावा. राजनाथसिंह, उमाभारती, आजम खान आदि मंत्र्यांनी आपापल्या राज्यातील कुंभमेळ्यांचे केलेले नियोजन कौतुकास्पद ठरले आहे. वास्तविक त्या राज्यांमध्येही भाजपा सरकार आहे. महाराष्ट्रातदेखील भाजपा सरकारच असताना हा विरोधाभास का, असा सवाल येथे झालेल्या दहा आखाड्यांच्या उच्चस्तरीय बैठकीत साधू-महंतांनी उपस्थित केला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वामी सागरानंद सरस्वती होते. सर्वच साधू सरकारवर एकप्रकारे तुटून पडले. महाराष्ट्रात आतापर्यंत जी-जी सरकारे आलीत त्यांच्यापेक्षा सध्याच्या सरकारची कामगिरी खराब असल्याचे साधू-महंतांनी एकमुखाने सांगितले. येथील आनंद तपोनिधी पंचायती आखाड्यात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला येथील दहाही आखाड्यांचे स्थानिक पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त मुख्यालयांमधून वरिष्ठ साधू-महंत आले होते. बैठकीत अनेक मुद्दे चर्चिले गेल. ज्या मुख्यमंत्र्यांना अगर संपर्कमंत्र्यांना कुंभमेळ्याबद्दल ज्ञान नाही अशा मंत्र्यांना पदावर राहण्याचा हक्क नाही, असे सांगून जुना आखाड्याचे महंत हरिगिरीजी यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. महंत नरेंद्रगिरीजी म्हणाले, मध्यंतरी निवडणुकीमळे सिंहस्थ कामात शिथिलता आली. मात्र निदान त्यावेळेस तरी मंत्री, प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे होते. सर्वच साधु पोटतिडीकेने बोलत होते. यावेळी नरेंद्रगिरीजी, आशिषगिरीजी, हरिगिरीजी, प्रेमगिरीजी, उमाशंकर भारती, महंत शंकरानंद सरस्वती , महंत धनराजगिरी, समुद्रगिरीजी, महंत रणधीरपुरीजी, दुर्गानंद ब्रह्मचारी, महानिर्वाणी रामगिरीजी महाराज, महंत उदयगिरीजी, प्रेमानंदजी, विचारवासनी, राजिंदरसिंह तसेच ठाणापती (जुना) महंत पिनाकेश्वरजी, श्यामराव गंगापुत्र, नगरसेवक अभिजित काण्णव, विष्णू दाबाडे आदि उपस्थित होते. शेवटी साधूंनी पुनश्च एकदा चारही शंकराचार्य (चार पीठाचे) यांच्यासह जंतरमंतर (दिल्ली) येथे आमरण उपोषणाचा इशारा दिला. जर महाराष्ट्र शासनाच्या मंत्र्यांनी-मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी चर्चा न केल्यास त्र्यंबकेश्वरला दुर्लक्षित ठेवल्यास नियोजित उपोषण अधीक तीव्र केले जाईल, असे यावेळी ठरविण्यात आले. (वार्ताहर)