शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
3
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
4
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
5
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
6
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
7
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
8
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
9
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
11
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
12
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
13
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
14
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
15
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
16
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
17
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
18
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
19
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
20
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

नाशिकच्या आखाड्यांचे यंदा त्र्यंबकलाही स्नान

By admin | Updated: June 4, 2015 00:33 IST

शेकडो वर्षांची परंपरा बदलणार : महंत ग्यानदास महाराज यांची पत्रकार परिषदेत माहिती

नाशिकच्या आखाड्यांचे यंदा त्र्यंबकलाही स्नानशेकडो वर्षांची परंपरा बदलणार : महंत ग्यानदास महाराज यांची पत्रकार परिषदेत माहिती नाशिक : शैव आणि वैष्णव आखाड्यातील वाद मिटून समन्वय व्हावा, यासाठी पेशव्यांनी त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे दोन्ही पंथीयांना स्नानाचे ठिकाण निश्चित केले असले, तरी त्र्यंबकेश्वर येथे वैष्णव पंथीयांना स्नानासाठी वेळ राखीव ठेवला जातो. आजवर वैष्णव पंथीयांनी त्र्यंबकेश्वरी स्नान केले नसले तरी, यंदा मात्र नाशिकमधील वैष्णव आखाडे २५ सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथे शाही स्नान करणार आहेत. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी बुुधवारी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. नाशिकमध्ये वैष्णवांचे तीन, तर त्र्यंबकेश्वरी शैव पंथीयांचे दहा आखाड्यांचे साधू- महंत स्नान करतात. पूर्वी शैव आणि वैष्णव हे नाशिक शहरानजीक गंगापूर धरणाजवळ स्नान करीत. परंतु शेकडो वर्षांपूर्वी शैव आणि वैष्णव यांच्यात स्नानावरून वाद झाले आणि त्याचे पर्यवसान हाणामारीत झाल्याने शेकडो साधूंना प्राण गमवावे लागले. त्यावेळी पेशव्यांनी शैव पंथीय साधू त्र्यंबकेश्वर आणि वैष्णव पंथीय साधू नाशिकच्या रामकुंडात स्नान करतील, असा निवाडा दिला होता. (पान २ वर)त्यानुसार आजपर्यंत परंपरा सुरू असली तरी, त्र्यंबकेश्वरी वैष्णव पंथीयांना पर्वणीच्या दिवशी दोन तास स्नानासाठी राखीव असतात. पेशव्यांनी तशी सोय करून दिली आहे; परंतु नाशिकचे आखाडे जात नाहीत. यंदा मात्र नाशिकचे वैष्णव पंथीय त्र्यंबकेश्वरलाही स्नान करतील, अशी माहिती महंत ग्यानदास यांनी दिली. कुंभमेळ्यात यंदा २९ आॅगस्ट आणि १३ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पर्वणी कालावधीत स्नान होणार आहे. त्यानंतर नाशिकमध्ये १८ सप्टेंबर रोजी तिसरे आणि अखेरचे शाहीस्नान होणार असून, त्र्यंबकेश्वर येथे २५ सप्टेंबर रोजी अखेरचे शाहीस्नान होईल. त्याच दिवशी नाशिकचे आखाडे त्र्यंबकेश्वरी जातील, असे त्यांनी सांगितले...इन्फो...वाद निर्माण करायचा नाही, पण...कुंभमेळा खरा कुठे नाशिक की त्र्यंबकेश्वर याबाबत त्र्यंबकेश्वरच्या महंतांनी अलीकडेच घेतलेल्या भूमिकेविषयी बोलताना महंत ग्यानदास यांनी कुंभमेळा नाशिकलाच भरतो. पुराणात नाशिकचाच उल्लेख आहे, असे स्पष्ट करून महंत ग्यानदास यांनी त्र्यंबकेश्वर येथेही स्नानाचे महत्त्व आहे. मी त्यांचा कधीही अनादर करणार नाही आणि कोणीही करू नये, त्र्यंबकेश्वर हे नाशिक जिल्ह्णातच आहे, त्र्यंबकेश्वर जिल्ह्णात नाही यातच सारे प्रमाण मिळते, असेही ते म्हणाले.