शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

त्र्यंबक तालुक्यात यावर्षी २४,४०० हेक्टर खरीप लागवड होणार; पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग

By admin | Updated: June 1, 2014 01:09 IST

त्र्यंबकेश्वर- पावसाचे ठिकाण व आदिवासी बहुल म्हणून प्रसिद्ध असणार्‍या त्र्यंबकेश्वर तालुक्यात यावर्षी २४,४०० हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार असून, मशागतीच्या कामांना वेग आला आहे. तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ (भौगोलिक) ८९५८२ हेक्टर असून, वहिती लायक क्षेत्र ३३५२४ आहे. वनक्षेत्र ३३६६७ हेक्टर क्षेत्र असून, तालुक्यात आज खरीप क्षेत्र २६,४०० हेक्टर आहे. रब्बी क्षेत्र फक्त ७०० हेक्टर असून, बागायती क्षेत्र ३३४ हेक्टर इतके आहे. तालुक्यात भात, नागली ही मुख्य पिके असून, त्यांच्या जोडीला उडीद खुरसणी, भुईमूग आदि पिके घेतली जातात. घोटीबरोबरच त्र्यंबकचा तांदूळदेखील प्रसिद्ध आहे. भात व नागलीच्या रोपांसाठी जमीन भाजणी, राख गोळा करून रोपांची जेवढी जागा हवी असेल तेवढ्या जागेत राख-गोवर्‍या पसरणे व त्यास आग लावून जमीन भाजणीला वेग आला आहे. ग्रामीण भागात जिकडे-तिकडे धूर दिसत आहे. त्यानंतर पाऊ

त्र्यंबकेश्वर- पावसाचे ठिकाण व आदिवासी बहुल म्हणून प्रसिद्ध असणार्‍या त्र्यंबकेश्वर तालुक्यात यावर्षी २४,४०० हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार असून, मशागतीच्या कामांना वेग आला आहे. तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ (भौगोलिक) ८९५८२ हेक्टर असून, वहिती लायक क्षेत्र ३३५२४ आहे. वनक्षेत्र ३३६६७ हेक्टर क्षेत्र असून, तालुक्यात आज खरीप क्षेत्र २६,४०० हेक्टर आहे. रब्बी क्षेत्र फक्त ७०० हेक्टर असून, बागायती क्षेत्र ३३४ हेक्टर इतके आहे. तालुक्यात भात, नागली ही मुख्य पिके असून, त्यांच्या जोडीला उडीद खुरसणी, भुईमूग आदि पिके घेतली जातात. घोटीबरोबरच त्र्यंबकचा तांदूळदेखील प्रसिद्ध आहे. भात व नागलीच्या रोपांसाठी जमीन भाजणी, राख गोळा करून रोपांची जेवढी जागा हवी असेल तेवढ्या जागेत राख-गोवर्‍या पसरणे व त्यास आग लावून जमीन भाजणीला वेग आला आहे. ग्रामीण भागात जिकडे-तिकडे धूर दिसत आहे. त्यानंतर पाऊस पडल्यास लगेच पेरणी केली जाईल. तत्पूर्वी जागा नांगरून दिली जात आहे. तालुक्यातील खरीप उत्पन्न निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असते. निसर्गचक्रही साधारणत: एक महिना पुढे वाढले असून, आता तर केव्हाही निसर्गाचे वातावरण बदलत असून, अवकाळी पाऊस, कधी थंडी आदि बदल होत असतात. याचा परिणाम अवकाळी पाऊस पडणे किंवा वेळेवर पाऊस न पडणे, कडकडीत ऊन पडणे अशा नैसर्गिक आपत्ती येत असल्याने पीक उत्पन्नावर परिणाम होणे असा प्रकार या परिसरात पाचवीच्या पुजलेला असतो. यातूनही या भागातील शेतकरी उभा राहिला आहे. तालुक्यात जवळपास १२९१ विहिरी असल्या तरी त्या प्रत्येक विहिरींना पाणी असतेच असे नाही. या पार्श्वभूमीवर जवाहर विहिरी आता ही योजना रोजगार हमी योजनेखाली आणण्यात आली आहे.