शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

त्र्यंबक तालुक्यात यावर्षी २४,४०० हेक्टर खरीप लागवड होणार; पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग

By admin | Updated: June 1, 2014 01:09 IST

त्र्यंबकेश्वर- पावसाचे ठिकाण व आदिवासी बहुल म्हणून प्रसिद्ध असणार्‍या त्र्यंबकेश्वर तालुक्यात यावर्षी २४,४०० हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार असून, मशागतीच्या कामांना वेग आला आहे. तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ (भौगोलिक) ८९५८२ हेक्टर असून, वहिती लायक क्षेत्र ३३५२४ आहे. वनक्षेत्र ३३६६७ हेक्टर क्षेत्र असून, तालुक्यात आज खरीप क्षेत्र २६,४०० हेक्टर आहे. रब्बी क्षेत्र फक्त ७०० हेक्टर असून, बागायती क्षेत्र ३३४ हेक्टर इतके आहे. तालुक्यात भात, नागली ही मुख्य पिके असून, त्यांच्या जोडीला उडीद खुरसणी, भुईमूग आदि पिके घेतली जातात. घोटीबरोबरच त्र्यंबकचा तांदूळदेखील प्रसिद्ध आहे. भात व नागलीच्या रोपांसाठी जमीन भाजणी, राख गोळा करून रोपांची जेवढी जागा हवी असेल तेवढ्या जागेत राख-गोवर्‍या पसरणे व त्यास आग लावून जमीन भाजणीला वेग आला आहे. ग्रामीण भागात जिकडे-तिकडे धूर दिसत आहे. त्यानंतर पाऊ

त्र्यंबकेश्वर- पावसाचे ठिकाण व आदिवासी बहुल म्हणून प्रसिद्ध असणार्‍या त्र्यंबकेश्वर तालुक्यात यावर्षी २४,४०० हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार असून, मशागतीच्या कामांना वेग आला आहे. तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ (भौगोलिक) ८९५८२ हेक्टर असून, वहिती लायक क्षेत्र ३३५२४ आहे. वनक्षेत्र ३३६६७ हेक्टर क्षेत्र असून, तालुक्यात आज खरीप क्षेत्र २६,४०० हेक्टर आहे. रब्बी क्षेत्र फक्त ७०० हेक्टर असून, बागायती क्षेत्र ३३४ हेक्टर इतके आहे. तालुक्यात भात, नागली ही मुख्य पिके असून, त्यांच्या जोडीला उडीद खुरसणी, भुईमूग आदि पिके घेतली जातात. घोटीबरोबरच त्र्यंबकचा तांदूळदेखील प्रसिद्ध आहे. भात व नागलीच्या रोपांसाठी जमीन भाजणी, राख गोळा करून रोपांची जेवढी जागा हवी असेल तेवढ्या जागेत राख-गोवर्‍या पसरणे व त्यास आग लावून जमीन भाजणीला वेग आला आहे. ग्रामीण भागात जिकडे-तिकडे धूर दिसत आहे. त्यानंतर पाऊस पडल्यास लगेच पेरणी केली जाईल. तत्पूर्वी जागा नांगरून दिली जात आहे. तालुक्यातील खरीप उत्पन्न निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असते. निसर्गचक्रही साधारणत: एक महिना पुढे वाढले असून, आता तर केव्हाही निसर्गाचे वातावरण बदलत असून, अवकाळी पाऊस, कधी थंडी आदि बदल होत असतात. याचा परिणाम अवकाळी पाऊस पडणे किंवा वेळेवर पाऊस न पडणे, कडकडीत ऊन पडणे अशा नैसर्गिक आपत्ती येत असल्याने पीक उत्पन्नावर परिणाम होणे असा प्रकार या परिसरात पाचवीच्या पुजलेला असतो. यातूनही या भागातील शेतकरी उभा राहिला आहे. तालुक्यात जवळपास १२९१ विहिरी असल्या तरी त्या प्रत्येक विहिरींना पाणी असतेच असे नाही. या पार्श्वभूमीवर जवाहर विहिरी आता ही योजना रोजगार हमी योजनेखाली आणण्यात आली आहे.