शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी गावे विकासापासून वंचित

By admin | Updated: June 4, 2016 23:53 IST

बेलगाव कुऱ्हे : पेसा योजनेच्या निधीची कमतरता

बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील डोंगराळ भागात विविध जमातींच्या आदिवासींची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. काळानुसार, होत असलेल्या बदलानुसार आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी शासनाने गेल्या वर्षापासून आदिवासींचे जीवनमान उंचविण्यासाठी सुरू केलेली ‘पेसा’ या महत्त्वपूर्ण योजनेत तालुक्यातील एकूण साठ टक्के आदिवासी ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली असून, त्यात तालुक्यातील काही आदिवासी गावांना विकासकामे करण्यासाठी निधी मिळाला आहे. अधिकाऱ्यांच्या चुकीच्या माहितीमुळे ९ ते १० गावांना निधी मिळाला नसल्याने ते अजूनही विकासापासून वंचित आहेत. तालुक्यातील ज्या गावांना निधी मिळाला आहे त्यांनी मात्र तो खर्च केला नसल्याचे चित्र आहे. तालुक्यातील शेवंगे डांग या ग्रामपंचायतीला अपुरा निधी मिळाल्याने गावाचा विकास साधण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे. शेवंगे डांग या आदिवासी गावाचादेखील सदर योजनेत समावेश असून, शासनाने निधीची रक्कम अदा करण्यासाठी लोकसंख्येचा निकष लावला आहे. येथील लोकवस्ती सुमारे १८८१ एवढी असताना विकासकामे करण्यासाठी फक्त सतेचाळीस हजार रु पये देण्यात आले आहेत. या रकमेत विकासकामे होणार नसल्याने येथील उपसरपंच साहेबराव उत्तेकर यांनी इगतपुरी पंचायत समिती विभागाचे विस्तार अधिकारी ढवळे व त्यांचे वरिष्ठ यांच्याशी सहा महिने अनेकवेळा पत्रव्यवहार केला; परंतु त्याची कुठलीही दखल घेतली नसल्याचे प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.तालुक्यातील इतर गावांच्या तुलनेत रक्कम खूप कमी असल्याने येथील ग्रामपंचायतींनी ही रक्कम अजून खर्च केलेली नाही. आणि विशेष म्हणजे या योजनेत सहभागी असलेल्या गावांनी मिळालेला निधी या वर्षी विकासकामांमध्ये खर्च केला नसेल, त्यांना पुढच्या वर्षी निधी मिळणार नसल्याने काही ग्रामपंचायती हतबल झाल्या आहेत. सदर ग्रामपंचायतींना जर निधी आला नाही तर आदिवासी जनता या योजनेपासून वंचित राहिल्यास यास सर्वस्वी विस्तार अधिकारी ढवळे व त्यांचे वरिष्ठ जबाबदार राहतील,असा इशारा देण्यात आला आहे.पेसा या नवसंजीवनी योजनेच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत इगतपुरी तालुक्यातील कोणत्याच विषयावर माहिती पाठवली नसल्यामुळे चर्चा झाली नाही.पेसा या योजनेच्या आराखड्यात आदिवासींना पिण्याचे पाणी, शिक्षण, पौष्टिक आहार, आरोग्यविषयक सेवा, वर्षभर पुरेल इतका रोजगार त्यांना वेळीच उपलबध होत नसल्याने आदिवासींचे स्थलांतर होत आहे. या योजनेमधील ९ गावांना तत्काळ लोकसंख्येच्या नियमाप्रमाणे आदिवासी भागातील विकास साधण्यासाठी त्वरित निधी उपलबध करून देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)