शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
3
“धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा”; ठाकरे गटाच्या नेत्याची सुप्रीम कोर्टाला विनंती
4
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
5
बंपर लिस्टिंग...! या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी केली; दुप्पट केला पैसा, दिला छप्परफाड परतावा
6
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा 'या' ५ वस्तू, कुबेर महाराज म्हणतील तथास्तु!
7
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?
8
झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी त्यांच्याच चुलत भावाला अटक; सिंगापूर यॉट पार्टीशी काय संबंध?
9
सांगली ते दुबई व्हाया सुरत; मुंबईच्या सलीम डोलाचं ड्रग्ज साम्राज्य, महाराष्ट्र पोलिसांनी केला होता पर्दाफाश
10
TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का?
11
सोनम वांगचूक यांना भेटायला तुरुंगात पोहोचल्या पत्नी गीतांजली! पुढे काय करणार? सांगितला प्लॅन
12
Priyanka Gandhi : Video - प्रियंका गांधींनी का मागितली अभिनेत्री आलिया भटची माफी?, टॅग करून म्हणाल्या...
13
"स्मिता पाटीलच्या मृतदेहावर मी मेकअप करत होतो आणि डोळ्यातून...", अभिनेत्रीच्या मेकअप आर्टिस्टचा खुलासा
14
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
16
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
17
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
18
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
19
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
20
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले

आदिवासी ग्रामपंचायत सदस्याचा राजीनामा नाट्यमयरीत्या माघारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:17 IST

नांदूरशिंगोटे येथील आदिवासी महिला ग्रामपंचायत सदस्य सगुना वाळिबा मेंगाळ यांनी सोमवार (दि.२) रोजी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा ग्रामविकास अधिकारी एस.डी. ...

नांदूरशिंगोटे येथील आदिवासी महिला ग्रामपंचायत सदस्य सगुना वाळिबा मेंगाळ यांनी सोमवार (दि.२) रोजी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा ग्रामविकास अधिकारी एस.डी. अहिरे यांच्याकडे दिला होता. मात्र, अवघ्या दहा दिवसांतच राजीनामा पडताळणीअगोदर मेंगाळ यांनी प्रसिद्धीपत्रक देत आपला राजीनामा माघारी घेत सर्वांचे लक्ष केंद्रित केले आहे. येथील ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी (दि.१३) विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी सरपंच गोपाल शेळके यांच्या अध्यक्षतेखाली मासिक बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अजेंड्यावर मेंगाळ यांच्या राजीनामा पडताळणीचा विषय होता. बैठकीस मेंगाळ या आपल्या पती वाळिबा मेंगाळ यांच्यासह हजर होत्या. गेल्या साडेतीन वर्षांच्या काळात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एकलव्यनगर व बोगदेवाडी या दोन्ही आदिवासी वस्त्यांवर शौचालय अनुदान, वीज, पाणीपुरवठा, घरकुल, रस्ते आदी विकासकामे राबविण्यात आली आहेत, तसेच ग्रामपंचायत सभागृहात नेहमीच आदिवासी बांधवांना सन्मानपूर्वक वागणूक दिलेली असून, विविध योजनांचा लाभ आदिवासी घटकांना मिळाला असल्याचे मेंगाळ यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

यावेळी बैठकीस सरपंच गोपाल शेळके, उपसरपंच दीपाली पठारे, ग्रामपंचायत सदस्य उत्तम बर्के, शरद शेळके, अनिल शेळके, निवृत्ती शेळके, शशिकांत येरेकर, रामदास सानप, तुळशीराम गिऱ्हे, विद्या भाबड, रंजना शेळके, अनिता शेळके, ग्रामविकास अधिकारी एस.डी. अहिरे आदींची उपस्थिती होती.

कोट...

गैरसमजुतीने राजीनामा

गावातील काही राजकीय व्यक्तींनी माझे पती व मला सरपंच तसेच ग्रामपंचायत प्रशासन यांच्याविरुद्ध गैरसमज निर्माण करून दिला होता. माझ्यावर दबाव आणून राजीनामा देण्यास भाग पाडले होते. मात्र, प्रत्यक्षात वस्तुस्थिती समोर आल्यानंतर माझी शहानिशा झाली आहे. त्यामुळे माझा गैरसमज दूर झाला आहे. कुठल्याही दबावास बळी न पडता माझा सदस्यपदाचा राजीनामा स्वखुशीने मागे घेत आहे.

-सगुना मेंगाळ, ग्रामपंचायत सदस्य

कोट ...

सर्वच घटकांना न्याय

स्वच्छ भारत अभियान प्रकरणाबाबत यापूर्वीच ग्रामपंचायत प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. शासनाच्या विविध योजना राबविताना गावातील सर्वच समाजघटकांना न्याय देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत प्रशासन करीत आहे. मात्र, गावात विविध प्रकारची विकासकामे सुरू असल्याने काही लोक राजकारण करीत आहेत. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण केले पाहिजे व चुकीच्या पद्धतीने ग्रामपंचायत प्रशासनावर सुरू असलेली चिखलफेक थांबवावी.

-गोपाल शेळके, सरपंच, नांदूरशिंगोटे