शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

आदिवासी ग्रामपंचायत सदस्याचा राजीनामा नाट्यमयरीत्या माघारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:17 IST

नांदूरशिंगोटे येथील आदिवासी महिला ग्रामपंचायत सदस्य सगुना वाळिबा मेंगाळ यांनी सोमवार (दि.२) रोजी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा ग्रामविकास अधिकारी एस.डी. ...

नांदूरशिंगोटे येथील आदिवासी महिला ग्रामपंचायत सदस्य सगुना वाळिबा मेंगाळ यांनी सोमवार (दि.२) रोजी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा ग्रामविकास अधिकारी एस.डी. अहिरे यांच्याकडे दिला होता. मात्र, अवघ्या दहा दिवसांतच राजीनामा पडताळणीअगोदर मेंगाळ यांनी प्रसिद्धीपत्रक देत आपला राजीनामा माघारी घेत सर्वांचे लक्ष केंद्रित केले आहे. येथील ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी (दि.१३) विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी सरपंच गोपाल शेळके यांच्या अध्यक्षतेखाली मासिक बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अजेंड्यावर मेंगाळ यांच्या राजीनामा पडताळणीचा विषय होता. बैठकीस मेंगाळ या आपल्या पती वाळिबा मेंगाळ यांच्यासह हजर होत्या. गेल्या साडेतीन वर्षांच्या काळात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एकलव्यनगर व बोगदेवाडी या दोन्ही आदिवासी वस्त्यांवर शौचालय अनुदान, वीज, पाणीपुरवठा, घरकुल, रस्ते आदी विकासकामे राबविण्यात आली आहेत, तसेच ग्रामपंचायत सभागृहात नेहमीच आदिवासी बांधवांना सन्मानपूर्वक वागणूक दिलेली असून, विविध योजनांचा लाभ आदिवासी घटकांना मिळाला असल्याचे मेंगाळ यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

यावेळी बैठकीस सरपंच गोपाल शेळके, उपसरपंच दीपाली पठारे, ग्रामपंचायत सदस्य उत्तम बर्के, शरद शेळके, अनिल शेळके, निवृत्ती शेळके, शशिकांत येरेकर, रामदास सानप, तुळशीराम गिऱ्हे, विद्या भाबड, रंजना शेळके, अनिता शेळके, ग्रामविकास अधिकारी एस.डी. अहिरे आदींची उपस्थिती होती.

कोट...

गैरसमजुतीने राजीनामा

गावातील काही राजकीय व्यक्तींनी माझे पती व मला सरपंच तसेच ग्रामपंचायत प्रशासन यांच्याविरुद्ध गैरसमज निर्माण करून दिला होता. माझ्यावर दबाव आणून राजीनामा देण्यास भाग पाडले होते. मात्र, प्रत्यक्षात वस्तुस्थिती समोर आल्यानंतर माझी शहानिशा झाली आहे. त्यामुळे माझा गैरसमज दूर झाला आहे. कुठल्याही दबावास बळी न पडता माझा सदस्यपदाचा राजीनामा स्वखुशीने मागे घेत आहे.

-सगुना मेंगाळ, ग्रामपंचायत सदस्य

कोट ...

सर्वच घटकांना न्याय

स्वच्छ भारत अभियान प्रकरणाबाबत यापूर्वीच ग्रामपंचायत प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. शासनाच्या विविध योजना राबविताना गावातील सर्वच समाजघटकांना न्याय देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत प्रशासन करीत आहे. मात्र, गावात विविध प्रकारची विकासकामे सुरू असल्याने काही लोक राजकारण करीत आहेत. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण केले पाहिजे व चुकीच्या पद्धतीने ग्रामपंचायत प्रशासनावर सुरू असलेली चिखलफेक थांबवावी.

-गोपाल शेळके, सरपंच, नांदूरशिंगोटे