शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

आदिवासी ग्रामपंचायत सदस्याचा राजीनामा नाट्यमयरीत्या माघारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:17 IST

नांदूरशिंगोटे येथील आदिवासी महिला ग्रामपंचायत सदस्य सगुना वाळिबा मेंगाळ यांनी सोमवार (दि.२) रोजी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा ग्रामविकास अधिकारी एस.डी. ...

नांदूरशिंगोटे येथील आदिवासी महिला ग्रामपंचायत सदस्य सगुना वाळिबा मेंगाळ यांनी सोमवार (दि.२) रोजी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा ग्रामविकास अधिकारी एस.डी. अहिरे यांच्याकडे दिला होता. मात्र, अवघ्या दहा दिवसांतच राजीनामा पडताळणीअगोदर मेंगाळ यांनी प्रसिद्धीपत्रक देत आपला राजीनामा माघारी घेत सर्वांचे लक्ष केंद्रित केले आहे. येथील ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी (दि.१३) विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी सरपंच गोपाल शेळके यांच्या अध्यक्षतेखाली मासिक बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अजेंड्यावर मेंगाळ यांच्या राजीनामा पडताळणीचा विषय होता. बैठकीस मेंगाळ या आपल्या पती वाळिबा मेंगाळ यांच्यासह हजर होत्या. गेल्या साडेतीन वर्षांच्या काळात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एकलव्यनगर व बोगदेवाडी या दोन्ही आदिवासी वस्त्यांवर शौचालय अनुदान, वीज, पाणीपुरवठा, घरकुल, रस्ते आदी विकासकामे राबविण्यात आली आहेत, तसेच ग्रामपंचायत सभागृहात नेहमीच आदिवासी बांधवांना सन्मानपूर्वक वागणूक दिलेली असून, विविध योजनांचा लाभ आदिवासी घटकांना मिळाला असल्याचे मेंगाळ यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

यावेळी बैठकीस सरपंच गोपाल शेळके, उपसरपंच दीपाली पठारे, ग्रामपंचायत सदस्य उत्तम बर्के, शरद शेळके, अनिल शेळके, निवृत्ती शेळके, शशिकांत येरेकर, रामदास सानप, तुळशीराम गिऱ्हे, विद्या भाबड, रंजना शेळके, अनिता शेळके, ग्रामविकास अधिकारी एस.डी. अहिरे आदींची उपस्थिती होती.

कोट...

गैरसमजुतीने राजीनामा

गावातील काही राजकीय व्यक्तींनी माझे पती व मला सरपंच तसेच ग्रामपंचायत प्रशासन यांच्याविरुद्ध गैरसमज निर्माण करून दिला होता. माझ्यावर दबाव आणून राजीनामा देण्यास भाग पाडले होते. मात्र, प्रत्यक्षात वस्तुस्थिती समोर आल्यानंतर माझी शहानिशा झाली आहे. त्यामुळे माझा गैरसमज दूर झाला आहे. कुठल्याही दबावास बळी न पडता माझा सदस्यपदाचा राजीनामा स्वखुशीने मागे घेत आहे.

-सगुना मेंगाळ, ग्रामपंचायत सदस्य

कोट ...

सर्वच घटकांना न्याय

स्वच्छ भारत अभियान प्रकरणाबाबत यापूर्वीच ग्रामपंचायत प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. शासनाच्या विविध योजना राबविताना गावातील सर्वच समाजघटकांना न्याय देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत प्रशासन करीत आहे. मात्र, गावात विविध प्रकारची विकासकामे सुरू असल्याने काही लोक राजकारण करीत आहेत. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण केले पाहिजे व चुकीच्या पद्धतीने ग्रामपंचायत प्रशासनावर सुरू असलेली चिखलफेक थांबवावी.

-गोपाल शेळके, सरपंच, नांदूरशिंगोटे