शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
4
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
5
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
6
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
7
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
8
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
9
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
10
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
11
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
12
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
13
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
14
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
15
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
16
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
17
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
18
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
19
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
20
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे

‘आदिवासींचे विस्थापन थांबणे गरजेचे’

By admin | Updated: August 1, 2016 00:50 IST

‘आदिवासींचे विस्थापन थांबणे गरजेचे’

 नाशिक : निसर्गाच्या सान्निध्यात राहून आपले दैनंदिन जीवन व्यथित करणारा आदिवासी समाज आजही विस्थापनाच्या गराड्यात अडकलेला आहे. मागील अनेक वर्षांपासून हा समाज भरडला जात असून, या समाजाचे विस्थापन थांबणे काळाची गरज आहे, असा सूर ‘आदिरंग’मध्ये उमटलादिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालय व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भाभानगरच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात तीन दिवसीय आदिरंग महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने भारतातील विविध राज्यांमध्ये लोककलेचे संवर्धन करत निसर्ग रक्षणावर भर देणाऱ्या आदिवासी समाजाच्या व्यथा, समस्यांवर रविवारी (दि. ३१) परिसंवादात मंथन झाले. आदिवासी समाजाच्या अधोगतीची सुरुवात ४०० वर्षांपूर्वी झाली हे वास्तव लपवूनही हा आदिवासी समाज तितक्याच स्वाभिमानाने जीवन जगत समाजाचे मनोरंजन करत आहे. आदिवासी समाज आधुनिक मूल्यांकडे झुकत असला तरी त्याचे विस्थापन थांबलेले नाही, अशी खंत राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे उपाध्यक्ष अर्जुन चरण यांनी व्यक्त केले. आदिरंग महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘निसर्ग आणि आदिवासी संगीत, नृत्य आणि नाट्य यांचा आंतरसंबंध’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाअंतर्गत सोनल कुलकर्णी यांनी आदिवासी जीवनातून समानता, सरळता आणि स्वाभाविकता झळकत असल्याचे सांगितले. आदिवासी समाजातील जीवन जगण्याची कला त्यांना ऊर्जा देत असल्याचेही कुलकर्णी म्हणाल्या. प्रा. गोविंद शर्मा, एस. ए. कृष्णय्या, प्रा. एन. भकत वत्सल रेडडी यांनी देशााच्या विविध राज्यांमध्ये उपेक्षित जीवन जगणाराया आदिवासींच्या समस्यांवर प्रकाशझोत टाकला. आदिवासींचे पुनर्वसन, आरोग्य, शिक्षण, रोजगार आदि बाबींवर मंथन झाले. (प्रतिनिधी)