शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

‘आदिवासींचे विस्थापन थांबणे गरजेचे’

By admin | Updated: August 1, 2016 00:50 IST

‘आदिवासींचे विस्थापन थांबणे गरजेचे’

 नाशिक : निसर्गाच्या सान्निध्यात राहून आपले दैनंदिन जीवन व्यथित करणारा आदिवासी समाज आजही विस्थापनाच्या गराड्यात अडकलेला आहे. मागील अनेक वर्षांपासून हा समाज भरडला जात असून, या समाजाचे विस्थापन थांबणे काळाची गरज आहे, असा सूर ‘आदिरंग’मध्ये उमटलादिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालय व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भाभानगरच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात तीन दिवसीय आदिरंग महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने भारतातील विविध राज्यांमध्ये लोककलेचे संवर्धन करत निसर्ग रक्षणावर भर देणाऱ्या आदिवासी समाजाच्या व्यथा, समस्यांवर रविवारी (दि. ३१) परिसंवादात मंथन झाले. आदिवासी समाजाच्या अधोगतीची सुरुवात ४०० वर्षांपूर्वी झाली हे वास्तव लपवूनही हा आदिवासी समाज तितक्याच स्वाभिमानाने जीवन जगत समाजाचे मनोरंजन करत आहे. आदिवासी समाज आधुनिक मूल्यांकडे झुकत असला तरी त्याचे विस्थापन थांबलेले नाही, अशी खंत राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे उपाध्यक्ष अर्जुन चरण यांनी व्यक्त केले. आदिरंग महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘निसर्ग आणि आदिवासी संगीत, नृत्य आणि नाट्य यांचा आंतरसंबंध’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाअंतर्गत सोनल कुलकर्णी यांनी आदिवासी जीवनातून समानता, सरळता आणि स्वाभाविकता झळकत असल्याचे सांगितले. आदिवासी समाजातील जीवन जगण्याची कला त्यांना ऊर्जा देत असल्याचेही कुलकर्णी म्हणाल्या. प्रा. गोविंद शर्मा, एस. ए. कृष्णय्या, प्रा. एन. भकत वत्सल रेडडी यांनी देशााच्या विविध राज्यांमध्ये उपेक्षित जीवन जगणाराया आदिवासींच्या समस्यांवर प्रकाशझोत टाकला. आदिवासींचे पुनर्वसन, आरोग्य, शिक्षण, रोजगार आदि बाबींवर मंथन झाले. (प्रतिनिधी)