नाशिक : आदिवासी विकास महामंडळ व शबरी विकास महामंडळातील कथित भरती घोटाळा प्रकरणी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी आदिवासी विकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती उद्या (दि. २६) नाशिकला येणार असल्याचे वृत्त आहे.तसेच याच भरती घोटाळा प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात एका उमेदवाराने तक्रार अर्ज दाखल केल्याचे समजते. या अर्जानुसार कागदपत्रांची शहानिशा करून पोलीस गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे.आदिवासी व शबरी विकास महामंडळांतर्गत ५८४ पदांसाठी झालेल्या नोेकर भरतीत ३०० कोटींचा भ्रष्टाचार झाला असून, या नोकर भरतीची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लागलीच याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश आदिवासी विकास (पान ५ वर)विभागाला दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांच्या अध्यक्षतेखाली समितीही नियुक्त करण्यात आली होती. त्याच दरम्यान शुक्रवारी (दि.२२) रात्री अचानक आदिवासी विकास विभागात आग लागून त्यात काही संगणक जळाले. भरती घोटाळ्यातील चौकशी सुरू होण्यापूर्वीच हे जळीतकांड घडल्याने त्याचा भरती घोटाळ्याशी संबंध असून, तो पुरावा नष्ट करण्याचाच एक भाग असल्याचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी दुसऱ्या दिवशी या जळीतकांडाची पाहणी करताना आरोप केला होता. तसेच याप्रकरणी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याशी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी चर्चा करून भरती घोटाळ्यातील या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा अन्यथा त्यांची अन्यत्र बदली करा, अशी मागणी केली होती. याप्रकरणी चंौकशी करण्यासाठी समिती नाशिकच्या दौऱ्यावर येत असल्याचे समजते. (प्रतिनिधी)
आदिवासी विकास भरती घोटाळा प्रकरण:
By admin | Updated: April 26, 2016 00:08 IST