शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्यात धक्कादायक रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
5
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
6
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
7
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
8
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
9
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
10
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
11
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
12
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
13
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
14
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
15
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
16
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
17
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
18
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
19
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
20
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते

ट्रायकॉममध्ये आजपासून टाळेबंदी

By admin | Updated: November 16, 2015 00:01 IST

ट्रायकॉममध्ये आजपासून टाळेबंदी

गोकुळ सोनवणे  सातपूरवेतनवाढ आणि अन्य मागण्यांसाठी सातपूर येथील ट्रायकॉम इंडिया कंपनीतील कामगारांनी सीटू युनियनच्या नेतृत्वाखाली २४ दिवसांपासून संप पुकारला आहे. या संपाला कंपनी व्यवस्थापनाने ‘टाळेबंदी’ जाहीर करून उत्तर दिले आहे. कामगार उपआयुक्त कार्यालयात अनेकवेळा बैठका होऊनही अपेक्षित मार्ग निघालेला नाही. दिवाळीसारखा सण अंधारात गेल्याने त्रासलेल्या आणि वैतागलेल्या कामगारांनी आमचा हिशेब चुकता करावा आम्ही दुसरीकडे नोकरी शोधू अशा भावना व्यक्त केल्या आहेत, तर कामगार उपआयुक्त कार्यालय, ग्राहक आणि कामगार यांच्या त्रासामुळे कंपनी सुरू ठेवणे अवघड असल्याची भावना कंपनी संचालकांनी व्यक्त केली आहे. सोमवार (दि. १६) पासून टाळेबंदी घोषित केल्याने आणि या वेगवेगळ्या भूमिकांमुळे ट्रायकॉम इंडिया हा आयटी उद्योग अल्पायुषी ठरण्याची शक्यता उद्योग वर्तुळात चर्चिला जात आहे.सातपूर औद्योगिक वसाहतीत २००७ साली ट्रायकॉम इंडिया नावाचा आय. टी. उद्योग सुरू झाला. त्यावेळी कामगारांना अडीच हजार रुपये दरमहा वेतन दिले जात होते. २०१३ पर्यंत ७५०० रुपये ते ६८०० रुपये वेतन मिळू लागले. २०१२ साली कामगारांनी दिवाळीत संप पुकारला तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांनी लागलीच दखल घेऊन कंपनीत धाव घेतली. यशस्वी मध्यस्थी केल्याने कामगारांनी संप मागे घेतला होता. किमान वेतनदेखील मिळत नसल्याने या कामगारांनी २०१३ साली सीटू युनियनचे नेतृत्व स्वीकारले. त्यानंतर या युनियनने किमान वेतनाची मागणी केल्यानंतर दोन हजार रुपये इन्क्रिमेंट व्यवस्थापनाने कामगारांना दिल्याने कामगारांना ८८०० रुपये वेतन मिळू लागले. २०१४चा दिवाळी बोनस मिळावा म्हणून कामगारांनी मार्च २०१५ मध्ये पुन्हा संप पुकारला.