शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

छाटणीच्या नावाखाली झाडांचा बिघडतोय ‘तोल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:12 IST

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजवाहिन्यांना फांद्या घासून, दुर्घटना घडू नये आणि वीजपुरवठा खंडित होऊ नये, या उद्देशाने दरवर्षी महावितरणकडून झाडांच्या फांद्या ...

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजवाहिन्यांना फांद्या घासून, दुर्घटना घडू नये आणि वीजपुरवठा खंडित होऊ नये, या उद्देशाने दरवर्षी महावितरणकडून झाडांच्या फांद्या छाटल्या जातात. झाडांची छाटणी करताना केवळ वीजतारांना होणारा अडथळा लक्षात घेतला जातो. मात्र, त्यांची नैसर्गिक रचना आणि शास्त्रीय पद्धतीचा अवलंब छाटणीसाठी केला जात नसल्याने झाडांची नैसर्गिक रचना धोक्यात आली आहे. यामुळे दरवर्षी पावसाळ्यात शहरातील डेरेदार वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना अधिक घडत असल्याची टीका पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. शहरात रेन ट्री, काशिद, गुलमोहर, पेल्ट्राफोरम, चोपडी सावर यांच्यासारखी विदेशी झाडे अधिक आहेत. ही झाडे अधिक कमकुवत असतात आणि त्यातच जर त्यांच्या पर्णसंभाराचा तोल बिघडला तर लवकर कोसळतात, असे वृक्ष अभ्यासकांचे म्हणणे आहे. ही बाब वृक्षांची छाटणी करताना अत्यंत महत्त्वाची ठरते. मात्र, याकडे कोणीही लक्ष देत नाही. केवळ झाडांच्या फांद्या छाटून त्यांच्या नैसर्गिक वाढीमध्ये अडथळा निर्माण केला जात असल्याचे आपले पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष, वृक्षप्रेमी शेखर गायकवाड यांनी सांगितले.

---इन्फो--

मनपा उद्यान समितीचाही कानाडोळा

नाशिक शहरातील वृक्षांचे संरक्षण-संवर्धनाची जबाबदारी मनपा प्रशासनावर आहे. शहरातील झाडांची महावितरणकडून अशास्त्रीय पद्धतीने सर्रासपणे दरवर्षी केली जाते. मात्र, याकडे मनपाच्या उद्यान विभागाकडूनही कानाडोळा होतो. झाडांच्या वाढीवर याचा परिणाम तर होतच आहे. मात्र, शहरात पावसाळ्यात झाडे कोसळून नागरिकांच्या वाहनांच्या होणाऱ्या नुकसानीच्या घटनाही घडतात.

---इन्फो---

सोशल मीडियावरही संताप

महावितरण कंपनीने वीजतारा भूमिगत करण्याचा प्रयत्न प्राधान्याने करायला हवा. मात्र, त्यावर महावितरण प्रशासनाकडून लक्ष दिले जात नाही आणि झाडांच्या फांद्या मात्र सर्रासपणे अशास्त्रीय पद्धतीने दरवर्षी न चुकता तोडल्या जात असल्याच्या चर्चा आता सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. शहरातील शरणपूर रोड भागात तोडलेल्या झाडांची छायाचित्रे सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत.