शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘कचऱ्यातून नंदनवन’ उपक्रम

By admin | Updated: June 10, 2016 22:24 IST

महेश नवमी : माहेश्वरी भवन येथे विविध कार्यक्रम

नाशिकरोड : घरातील कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची जबाबदारी गृहिणींची असून, ती व्यवस्थितपणे नीट पार पाडल्यास कचऱ्यातून नंदनवन निर्माण होईल, असे प्रतिपादन मंजू नावंदर व किरण झंवर यांनी केले. आर्टिलरी सेंटररोड येथील श्रीमती मोनाबाई नंदलाल राठी माहेश्वरी भवन येथे शुक्रवारी दुपारी भगवान श्री महेश नवमीनिमित्त आयोजित ‘कचऱ्यातून नंदनवन’ या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी मंजू नावंदर व किरण झंवर यांनी उपस्थिताना प्रत्येक प्रकारचा कचरा वेगळा असतो, असे सांगून स्लाइड-शोद्वारे इलेक्ट्रॉनिक, प्लास्टिक, कुजणारा (स्वयंपाकघरातील), देवाचे निर्माल्य आदि प्रकारच्या कचऱ्याचे फायदे व तोटे स्पष्ट करून सांगितले. ओला व सुका कचरा याचे वर्गीकरण कसे करावे तसेच स्वयंपाकघरातील कुजणारा कचरा व झाडांचा पालापाचोळा यातून खताची निर्मिती कशी करता येते याची सविस्तर माहिती नावंदर व झंवर यांनी दिली. कचऱ्याचे वर्गीकरण करून विल्हेवाट लावल्यास कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होऊन पर्यावरणाची होणारी हानी ही कमी झाल्याशिवाय राहणार नाही, असे नावंदर व झंवर यांनी स्लाइड-शोद्वारे स्पष्ट करून सांगितले. पुणे येथील संदीप बाहेती यांचे पसायदानावरील व्याख्यान झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माहेश्वरी प्रगती मंडळचे अध्यक्ष श्रीनिवास लोया, अशोक भट्टड, राधेश्याम राठी, महेश बूब, मुकेश चांडक, दिनेश करवा, रमेश कासट, दीपिका कापडिया, वर्षा कलंत्री आदि मान्यवर उपस्थित होते. परिचय श्रद्धा कासट व सूत्रसंचालन मीनल बियाणी यांनी केले. यावेळी कांता लोया, वर्षा कलंत्री, मंगल नावंदर, आशा जाजू, कल्पना लोया, अरुणा कलंत्री, शशिकला बूब, राखी लोया, स्वाती झंवर, प्रणिता भुतडा, अलका करवा, आशा राठी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)