शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मातोरी  गावात हॉटेल व्यावसायिकांकडून कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:37 IST

गावातील व्यावसायिकांकडून गावात कचरा टाकला जात असून, त्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.

मातोरी : गावातील व्यावसायिकांकडून गावात कचरा टाकला जात असून, त्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.  गावातील काही व्यावसायिकांनी नव्याने हॉटेल्स थाटली असून, व्यवसाय जोमात होत आहे. परंतु दिवसभर जमा होणारे खरकटे, प्लॅस्टिक, कागदी कचरा आदी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केली नसल्याचे दिसत आहे. सर्व कचरा स्मशानभूमीलगतच्या नाल्यात टाकला जात आहे. अनेकदा स्थानिकांनी ही बाब ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिली मात्र पंचायत दुर्लक्ष करत आहे. कचºयाचे ढीग साचल्यामुळे गावात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रस्त्याने फिरणे मुश्कील झाले आहे. हॉटेल व्यावसायिक व स्थानिक शेतकरी यांच्यात कचरा टाकू नये यावरून वारंवार वाद होतात. स्वच्छ अभियानाच्या मोहिमेस मातोरी ग्रामपंचायतीने केराची टोपली दाखविल्याचे बोलले जात आहे. याबाबत योग्य ते पावले ग्रामपंचायतीने उचलावे. गावात असल्या व्यावसायिकांसाठी कचराकुंडीची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. हॉटेल व्यावसायिकांची अन्न सुरक्षा प्रशासनाने तपासावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत