शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

दळवटला धरपकड

By admin | Updated: June 5, 2017 00:25 IST

अभोणा पोलिसांनी दळवटच्या त्या युवकांची धरपकड केल्याच्या निषेधार्थ दळवट येथे चौफुलीवर चक्काजाम आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : दळवटच्या शेतकरी संपाच्या आंदोलनस्थळी शनिवारी रात्री झालेला लाठीचार्ज, मारहाण व हवेत गोळीबार प्रकरणानंतर रविवारी सकाळी अभोणा पोलिसांनी दळवटच्या त्या युवकांची धरपकड केल्याच्या निषेधार्थ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी दळवट येथे चौफुलीवर चक्काजाम आंदोलन केले. संप काळात शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे ही प्रमुख मागणी केल्यानंतर अभोणा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवकांची तत्काळ सुटका केल्याने रास्ता रोको मागे घेण्यात येऊन भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. शेतकरी संपाच्या निमित्ताने दळवट आंदोलनाचे केंद्र झाल्याने सलग तीन दिवस आदिवासी शेतकरी बांधवांनी गुजरातकडे जाणारी शेतमालाची व भाजीपाला वाहतूक रोखली. शनिवारी रात्री अभोणा पोलीसांनी आदीवासी आंदोलकांवर लाठीचार्ज , हवेत गोळीबार करुन जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. रविवारी दळवट गावात पोलीसांनी आदीवासी युवकांची धरपकड सुरु केली. यामुळे दळवट व परिसरातील गावातील ग्रामस्थांनी पोलीसांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली . दळवट परिसरातील आदीवासी जनतेने जियश्री पवार व नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरुन दळवट चौफुलीवर वाहतूक रोखून धरत जो पर्यंत ताब्यात घेतलेल्या आदीवासी युवकांची पोलीस सुटका करणार नाही तोपर्यंत रस्ता रोको आंदोलन मागे घेणारी नाही ही भूमिका घेतल्यामुळे आंदोलन चिघळण्याची चिन्हे दिसू लागल्याने प्रशासनाने सावध पावले उचलली. ताब्यात घेतलेल्या युवकांची सुटका केली. परंतु जमावावर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असल्याचे समजते.दरम्यान आंदोलन स्थळी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार, कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, उपसभापती डी एम गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, सोमनाथ सोनवणे, राजू पवार माजी सभापती मधुकर जाधव यांनी धाव घेऊन भाजप सरकारवर जोरदार टीका केली . शेतकरी संप आंदोलन काळात कळवण तालुक्यात पोलीसांनी शेतकरी बांधवांवर व युवकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी पोलिस उपअधिक्षक देवीदास पाटील, पोलिस निरीक्षक राहूल फूला उपस्थित होते .कळवण तालुक्यातून दळवट मार्ग गुजरात राज्याकडे मोठ्या प्रमाणात भाजीपाला व अन्य शेतमालाची वाहतूक होत असून शेतकरी संप काळात वाहतूकदार व वाहन मालक व चालक यांनी शेतकरी संपाची भूमिका समजून घ्यावी व शेतकरी बांधवांना सहकार्य करावे असे आवाहन शेतकरी संघटनेसह सर्वपक्षीय पदाधिकारी व शेतकरी नेते, शेतकरी बांधवांनी केले आहे.