शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

किसान रेल्वेच्या माध्यमातून १७ हजार टन मालाची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:14 IST

नाशिक रोड : देशातील पहिली कृषी रेल्वे गाडी असलेल्या देवळाली-दानापूर किसान रेल्वेने आतापर्यंत शंभर फेऱ्यांद्वारे १७ हजार ३३ ...

नाशिक रोड : देशातील पहिली कृषी रेल्वे गाडी असलेल्या देवळाली-दानापूर किसान रेल्वेने आतापर्यंत शंभर फेऱ्यांद्वारे १७ हजार ३३ टन नाशवंत शेती मालाची वाहतूक केली आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर केंद्र सरकारने देशातील रेल्वे सेवा बंद केली होती, त्यामुळे प्रवासी, मालवाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. विशेषकरून शेतमालाची देशात टंचाई व त्याची नासधूस होऊ लागल्याने केंद्र सरकारने प्रायोगिक तत्त्वावर किसान रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. नाशिक जिल्ह्यात भाजीपाला व फळे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्याने नाशिकच्या देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकातून

देवळाली-दानापूर किसान रेल्वे ७ ऑगस्ट सुरू झाली. या रेल्वेला देशभरात मिळालेला प्रतिसाद पाहता, देशातील अनेक भागांतून जाणारी किसान रेल्वे सुरू करण्यात आली. ऑगस्ट २०२० ते १५ मार्च २०२१ पर्यंत किसान रेलने १७ हजार ३३ टन नाशवंत शेती उत्पादने १०० फेऱ्यांमध्ये वाहून नेली. कोरोना महामारीत या गाडीद्वारे देवळाली, नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा या प्रमुख स्थानकांतून फळे, भाज्या तसेच आवश्यक कृषीसंबंधित वस्तूंची वाहतूक करण्यात आली. किसान रेलने महाराष्ट्रातील अनेक लहान शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन केले आहे. त्यांच्या उत्पन्नामध्ये मोठी वाढ झाली असून त्यांचे जीवनमान, उदरनिर्वाह, समृद्धी यात वाढ केली आहे. शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढू लागल्याने देशभरात अशा किसान रेल गेल्या वर्षभरात सुरू करण्यात आल्या आहेत.