शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
5
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
6
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
7
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
8
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
9
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
10
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
11
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
12
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
13
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
14
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
15
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
16
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
17
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
18
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
19
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
20
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र

बदल्यांची जत्रा, तिथे कारभारी सतरा

By admin | Updated: June 9, 2014 00:43 IST

बदल्या आणि पदोेन्नत्या म्हटल्या की, अर्थपूर्ण घडामोडीही आल्याच म्हणून समजायच्या.

गणेश धुरी जिल्हा मिनी मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि पदोेन्नत्या म्हटल्या की, अर्थपूर्ण घडामोडीही आल्याच म्हणून समजायच्या. त्यातल्या त्यात मे महिन्यात तर बदल्या करण्यासाठी आणि टाळण्यासाठी अशा इच्छुकांचा दरवर्षी मेळाच भरत असतोे. याही वर्षी थोड्या फार फरकाने बदल्यांची जत्रा भरलीच. मात्र ती काहीअंशी थोपविण्यात नवनियुक्त शिपे-सालेदार सुखदेव बनकर यांना यश आले. मात्र अंशत:च्या नावाखाली आता सोयीच्या ठिकाणी बदल्या करण्याचा अर्थपूर्ण ‘खेळ’ही रंगल्याचे लपून राहिले नाही.बदल्या आणि पदोन्नत्या ही तशी पाहता सर्वस्वी प्रशासकीय बाब असली तरी आजवर याच बदल्यांमध्ये आणि पदोन्नत्यांमध्ये नको तितके पदाधिकाऱ्यांनी नाक खुपसण्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत, येत आहेत आणि भविष्यातही येतील, हे सांगणे नको. अगदी व्यवस्थित आणि पारदर्शक बदल्या केल्यानंतर खरे म्हणजे सोेयीच्या आणि अंशत: बदल्यांची तसे पाहता गरज राहता कामा नये. मात्र प्रशासनाच्या झारीतील शुक्राचार्य असलेल्या काहींना ते चुकचुकल्यासारखे वाटते. म्हणूनच बदल्या आणि पदोन्नत्यांची कार्यवाही सुरू झाली रे झाली की, कर्णापकर्णी निरोप वजा अर्थपूर्ण सूचना इच्छुकांकडे पाठविल्या जातात. तसे भोळेभाबडे कर्मचारीही त्याला कसे काय भुलतात, हाही एक संशोधनाचा विषय ठरावा. कारण बदल्यांच्या कार्यवाहीत हमखास प्रशासनाकडून दरवेळी बदल्यांसाठी कोणत्याही कर्मचाऱ्याने कोणाशीही संपर्क साधू नये, असे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत आले असले तरी कर्मचारी सोयीच्या बदल्यांसाठी हमखास पुढाऱ्यांची आणि काही अधिकारी-कर्मचाऱ्यांची दारे अन् उंबरठे पुजतात म्हणजे पुजतात. बरे ज्यांच्या सोयीने बदल्या होणार आहेत, असेही कर्मचारी नेमके पुढाऱ्यांच्या गळाला कसे लागतात, हाही तसे पाहता संशोधनाचा विषय आहे. आताही अंशत: बदल्यांच्या नावाखाली चार-दोन कर्मचाऱ्यांना सोयीच्या ठिकाणी बदल्या करण्यासाठी सांगावा पाठविण्यात आला खरा; मात्र हा सांगावा प्रशासनातील काही धूर्त झारीतील शुक्राचार्यांनी कांगावासारखा सर्वांना निरोप धाडला. जिथे चार कर्मचाऱ्यांच्या बदल्या करायच्या होत्या, तिथे चाळीस कर्मचाऱ्यांना बोलविण्यात आले आणि प्रत्यक्षात चाळीसहून अधिक कर्मचाऱ्यांनी सहकुटुंब जिल्हा परिषदेत हजेरी लावली. त्यामुळे जिल्हा परिषदेत अंशत: बदल्यांची जत्राच भरली होती. यातही एका कर्मचारी पुढारी ‘सेविकेने’ म्हणे अंशत: बदल्यांसाठी अन्य सेविकांकडून पाच- पन्नासचा पाला-पाचोळा गोळा केल्याची चर्चा जिल्हा परिषदेत जोर धरू लागली आहे. या सेविकेला एका पुढाऱ्याने आपल्या वाक्‘बाणाने’ मदत केल्याचीही कर्णाेपकर्णी चर्चा जिल्हा परिषदेत रंगू लागली आहे. याला आणखी जोड म्हणून प्रशासनातीलच काही शुक्राचार्य त्यांना फळास आल्याचे बोलले गेले. आता नेमक्या या अंशत: बदल्या होतील की नाही, हा भाग अलाहिदा असला तरी या बदल्यांच्या नावावर गोळा झालेला मलिदा मात्र आतापर्यंत सफाचट झाला असेल, यात शंका नाही. यालाच आता सुखदेव बनकरांनी आळा घातला पाहिजे. मात्र बनकर सर्वांचे ‘मन’ राखण्यातच धन्यता मानत असल्याने त्यांनीही आता कणखर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. चार-दोन कर्मचाऱ्यांना बोलविणे आणि चाळीस कर्मचाऱ्यांनी गोळा होणे, हे वास्तविक पाहता संशयाला बळकटी देण्याचे ‘चित्र’ त्यांच्या प्रामाणिक ‘दृष्टीआड’ झालेच कसे, हेही त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. मागच्यास ठेच, पुढचा शहाणा, ही म्हण आत्मसात करून सुखदेव बनकर यांनी आता तरी पदोन्नतीसह विशेष बाब म्हणून आलेल्या बदल्यांबाबत कठोर तपासणी करून नंतरच त्या विभागीय आयुक्तांच्या मंजुरीस पाठविणे आवश्यक आहे. आता तरी बनकर धडा घेतील काय, हाच खरा मूळ प्रश्न आहे.