शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सात दिवसांत अधिकाऱ्यांच्या बदल्या करा 

By श्याम बागुल | Updated: February 13, 2019 19:02 IST

लोकसभा निवडणुकीची गेल्या दोन वर्षांपासून प्रक्रिया पार पाडणाºया निवडणूक अधिकाºयांच्या ऐन निवडणुकीच्या काळात त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून बदल्या करण्याचे धोरण आयोगाने स्वीकारले असून, त्यात प्रामुख्याने स्वजिल्हा असलेले, एकाच जिल्ह्यात चार वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेले,

ठळक मुद्देनिवडणूक आयोग : आचारसंहिता लवकर लागण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून बदलीपात्र अधिकाºयांच्या बदल्या २८ फेब्रुवारीच्या आत करण्याचे आदेश देणा-या निवडणूक आयोगाने पुन्हा एकवार आपला निर्णय फिरविला असून, आता २० फेब्रुवारीच्या आत राज्य सरकारने बदल्या कराव्यात तसा अहवाल २५ फेब्रुवारीपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवावे, असे आदेश दिले आहेत. अधिका-यांच्या बदल्यांच्या घाईमुळे एरव्ही मार्च महिन्याच्या दुस-या आठवड्यात निवडणूक आचारसंहिता जारी होण्याची शक्यता आता पहिल्या आठवड्यातच लागू होते काय अशी चर्चा होऊ लागली आहे.

लोकसभा निवडणुकीची गेल्या दोन वर्षांपासून प्रक्रिया पार पाडणाºया निवडणूक अधिकाºयांच्या ऐन निवडणुकीच्या काळात त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून बदल्या करण्याचे धोरण आयोगाने स्वीकारले असून, त्यात प्रामुख्याने स्वजिल्हा असलेले, एकाच जिल्ह्यात चार वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेले, ३१ मे २०१९ रोजी तीन वर्षे पूर्ण होणारे, फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले अशा एक नव्हे तर अर्धा डझनाहून अधिक नियम व निकष तयार करून अधिकाºयांच्या बदल्या करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाºयांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या होणार असून, त्यातील काही नियम, निकष जाचक असल्याबद्दल अधिकाºयांचे आक्षेप कायम आहेत. त्यातील एक नियम गेल्या तीन वर्षांत ज्या अधिकाºयांनी लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीचे काम केले असेल त्यांच्यादेखील बदल्या करण्यात याव्यात, अशा सूचना आयोगाने दिल्या होत्या. परंतु तीन वर्षांचा कालावधी नेमका कोणता याबाबत संभ्रम निर्माण झाला असता, काही राज्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण मागितले असता त्यावर आयोगाला पुन्हा माघार घ्यावी लागली व २०१५ ते २०१७ या तीन वर्षांत निवडणुकीत अधिकाºयांचा सहभाग नको, असा निर्णय घ्यावा लागला आहे. आयोगाच्या सातत्याने बदलत जाणाºया भूमिकेचा मात्र अधिकाºयांना मनस्ताप सहन करावा लागत असून, दर दोन दिवसाआड बदल्यांच्या प्रस्तावात तसेच अधिकाºयांच्या नियुक्त्या, नेमणुकांमध्ये बदल करावा लागत आहे. गैरसोयीच्या बदल्या होण्याच्या भीतीने अधिकाºयांच्या मंत्रालयात ‘गाठीभेठी’ वाढल्या आहेत. त्यातून गैरप्रकाराला तसेच गैरसोयीच्या बदल्यांना प्रोत्साहन मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. येत्या सात दिवसांत अधिकाºयांच्या बदल्या करण्याचे आदेश दिल्यामुळे अधिकाºयांच्या बदल्यांबाबत आयोग करीत असलेली घाई पाहता, निवडणूक आचारसंहितेची घोषणा आता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने यंत्रणा कामाला लागली आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयGovernmentसरकार