मनमाड : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून बरसणाऱ्या धुवाधार पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यात लोहमार्गावरील खडीची भर वाहून गेल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. मुंबईहून गुजरातमार्गे उत्तर व दक्षिण भारतात जाणाऱ्या रेल्वेगाड्या मनमाडमार्गे सोडण्यात आल्याने मनमाड स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली होती. पावसामुळे रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, अनेक गाड्या विलंबाने धावत आहेत.
गुजरातला जाणाऱ्या गाड्या मनमाडमार्गे वळवल्या
By admin | Updated: July 12, 2016 22:32 IST