शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

मुंबईकडे जाणाºया गाड्यांना अजूनही ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:20 IST

गेल्या बुधवारी आसनगाव-वाशिंद दरम्यान दुरांतो एक्स्प्रेसला अपघात झाल्यापासून या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. शुक्रवारीही पंचवटी वगळता इतर गाड्या मुंबईला पोहचू शकल्या नाहीत. यामुळे मुंबईकडे जाणाºया प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, भुसावळ स्थानकात रेल रोको करीत प्रवाशांनी संतापाला वाट मोकळी करून दिली.

नाशिक : गेल्या बुधवारी आसनगाव-वाशिंद दरम्यान दुरांतो एक्स्प्रेसला अपघात झाल्यापासून या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. शुक्रवारीही पंचवटी वगळता इतर गाड्या मुंबईला पोहचू शकल्या नाहीत. यामुळे मुंबईकडे जाणाºया प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, भुसावळ स्थानकात रेल रोको करीत प्रवाशांनी संतापाला वाट मोकळी करून दिली.गेल्या तीन दिवसांपासून मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अपघातानंतर तिसºया दिवशीही मुंबईकडे जाणाºया गाड्या या नाशिकरोड, मनमाड आणि भुसावळपर्यंतच चालविण्यात येत आहेत. यामुळे प्रवाशांना खासगी वाहने तसेच बसचा आधार घेत प्रवास करावा लागत आहे, तर चाकरमान्यांच्या कामांचा खोळंबा होत असल्याने त्यांचेही आर्थिक नुकसान होत आहे. नाशिकहून मुंबईला जाणाºया पंचवटी, गोदावरी, राज्यराणी या गाड्यांपैकी केवळ पंचवटी एक्स्प्रेसच मुंबईला पोहचत असून, सदर गाडीही तीन तास उशिराने धावत आहे. शुक्रवारीही पंचवटी एक्स्प्रेस वगळता इतर गाड्या मुंबईकडे जाऊ शकल्या नाहीत. मुंबईकडून येणाºया गाड्याही सुमारे दोन तास विलंबाने धावत असून, सकाळपासून एकच गाडी मुंबईहून नाशिकला आली. गेल्या बुधवारी साडेसहा वाजेच्या सुमारा आसनगाव-वाशिंद स्थानकादरम्यान दुरांतो एक्स्प्रेसचे नऊ डबे रुळावरून घसरल्याने या मार्गावरील वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. तीन दिवसांनंतरही या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत होऊ शकलेली नाही. अपघातानंतर सात तासांत वाहतूक सुरळीत होईल, असे सांगितले जात होते. परंतु ही डेडलाइन टळल्यानंतर दोनदा पुन्हा नव्याने वेळ देण्यात आली होती. मात्र बुधवारी सायंकाळपर्यंतही या मार्गावरील वाहतूक सुरू होऊ शकलेली नव्हती. ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी दोन पदरी व्यवस्था असल्याने आणि एका लाइनवरही अपघातग्रस्त रेल्वे दूर करण्याचे आणि दुरुस्तीचे काम अद्यापही सुरू असल्याने सध्यातरी एकेरी वाहतूक सुरू आहे. डोंगराचा भाग आणि दुपदरी लाइन असल्यामुळे तसेच रस्तामार्गेही जवळ नसल्याने मदतकार्य आणि दुरुस्तीला विलंब होत असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.