शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

मुंबईकडे जाणाºया गाड्यांना अजूनही ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:20 IST

गेल्या बुधवारी आसनगाव-वाशिंद दरम्यान दुरांतो एक्स्प्रेसला अपघात झाल्यापासून या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. शुक्रवारीही पंचवटी वगळता इतर गाड्या मुंबईला पोहचू शकल्या नाहीत. यामुळे मुंबईकडे जाणाºया प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, भुसावळ स्थानकात रेल रोको करीत प्रवाशांनी संतापाला वाट मोकळी करून दिली.

नाशिक : गेल्या बुधवारी आसनगाव-वाशिंद दरम्यान दुरांतो एक्स्प्रेसला अपघात झाल्यापासून या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. शुक्रवारीही पंचवटी वगळता इतर गाड्या मुंबईला पोहचू शकल्या नाहीत. यामुळे मुंबईकडे जाणाºया प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, भुसावळ स्थानकात रेल रोको करीत प्रवाशांनी संतापाला वाट मोकळी करून दिली.गेल्या तीन दिवसांपासून मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अपघातानंतर तिसºया दिवशीही मुंबईकडे जाणाºया गाड्या या नाशिकरोड, मनमाड आणि भुसावळपर्यंतच चालविण्यात येत आहेत. यामुळे प्रवाशांना खासगी वाहने तसेच बसचा आधार घेत प्रवास करावा लागत आहे, तर चाकरमान्यांच्या कामांचा खोळंबा होत असल्याने त्यांचेही आर्थिक नुकसान होत आहे. नाशिकहून मुंबईला जाणाºया पंचवटी, गोदावरी, राज्यराणी या गाड्यांपैकी केवळ पंचवटी एक्स्प्रेसच मुंबईला पोहचत असून, सदर गाडीही तीन तास उशिराने धावत आहे. शुक्रवारीही पंचवटी एक्स्प्रेस वगळता इतर गाड्या मुंबईकडे जाऊ शकल्या नाहीत. मुंबईकडून येणाºया गाड्याही सुमारे दोन तास विलंबाने धावत असून, सकाळपासून एकच गाडी मुंबईहून नाशिकला आली. गेल्या बुधवारी साडेसहा वाजेच्या सुमारा आसनगाव-वाशिंद स्थानकादरम्यान दुरांतो एक्स्प्रेसचे नऊ डबे रुळावरून घसरल्याने या मार्गावरील वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. तीन दिवसांनंतरही या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत होऊ शकलेली नाही. अपघातानंतर सात तासांत वाहतूक सुरळीत होईल, असे सांगितले जात होते. परंतु ही डेडलाइन टळल्यानंतर दोनदा पुन्हा नव्याने वेळ देण्यात आली होती. मात्र बुधवारी सायंकाळपर्यंतही या मार्गावरील वाहतूक सुरू होऊ शकलेली नव्हती. ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी दोन पदरी व्यवस्था असल्याने आणि एका लाइनवरही अपघातग्रस्त रेल्वे दूर करण्याचे आणि दुरुस्तीचे काम अद्यापही सुरू असल्याने सध्यातरी एकेरी वाहतूक सुरू आहे. डोंगराचा भाग आणि दुपदरी लाइन असल्यामुळे तसेच रस्तामार्गेही जवळ नसल्याने मदतकार्य आणि दुरुस्तीला विलंब होत असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.