शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

मुंबईकडे जाणाºया गाड्यांना अजूनही ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:20 IST

गेल्या बुधवारी आसनगाव-वाशिंद दरम्यान दुरांतो एक्स्प्रेसला अपघात झाल्यापासून या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. शुक्रवारीही पंचवटी वगळता इतर गाड्या मुंबईला पोहचू शकल्या नाहीत. यामुळे मुंबईकडे जाणाºया प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, भुसावळ स्थानकात रेल रोको करीत प्रवाशांनी संतापाला वाट मोकळी करून दिली.

नाशिक : गेल्या बुधवारी आसनगाव-वाशिंद दरम्यान दुरांतो एक्स्प्रेसला अपघात झाल्यापासून या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. शुक्रवारीही पंचवटी वगळता इतर गाड्या मुंबईला पोहचू शकल्या नाहीत. यामुळे मुंबईकडे जाणाºया प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, भुसावळ स्थानकात रेल रोको करीत प्रवाशांनी संतापाला वाट मोकळी करून दिली.गेल्या तीन दिवसांपासून मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अपघातानंतर तिसºया दिवशीही मुंबईकडे जाणाºया गाड्या या नाशिकरोड, मनमाड आणि भुसावळपर्यंतच चालविण्यात येत आहेत. यामुळे प्रवाशांना खासगी वाहने तसेच बसचा आधार घेत प्रवास करावा लागत आहे, तर चाकरमान्यांच्या कामांचा खोळंबा होत असल्याने त्यांचेही आर्थिक नुकसान होत आहे. नाशिकहून मुंबईला जाणाºया पंचवटी, गोदावरी, राज्यराणी या गाड्यांपैकी केवळ पंचवटी एक्स्प्रेसच मुंबईला पोहचत असून, सदर गाडीही तीन तास उशिराने धावत आहे. शुक्रवारीही पंचवटी एक्स्प्रेस वगळता इतर गाड्या मुंबईकडे जाऊ शकल्या नाहीत. मुंबईकडून येणाºया गाड्याही सुमारे दोन तास विलंबाने धावत असून, सकाळपासून एकच गाडी मुंबईहून नाशिकला आली. गेल्या बुधवारी साडेसहा वाजेच्या सुमारा आसनगाव-वाशिंद स्थानकादरम्यान दुरांतो एक्स्प्रेसचे नऊ डबे रुळावरून घसरल्याने या मार्गावरील वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. तीन दिवसांनंतरही या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत होऊ शकलेली नाही. अपघातानंतर सात तासांत वाहतूक सुरळीत होईल, असे सांगितले जात होते. परंतु ही डेडलाइन टळल्यानंतर दोनदा पुन्हा नव्याने वेळ देण्यात आली होती. मात्र बुधवारी सायंकाळपर्यंतही या मार्गावरील वाहतूक सुरू होऊ शकलेली नव्हती. ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी दोन पदरी व्यवस्था असल्याने आणि एका लाइनवरही अपघातग्रस्त रेल्वे दूर करण्याचे आणि दुरुस्तीचे काम अद्यापही सुरू असल्याने सध्यातरी एकेरी वाहतूक सुरू आहे. डोंगराचा भाग आणि दुपदरी लाइन असल्यामुळे तसेच रस्तामार्गेही जवळ नसल्याने मदतकार्य आणि दुरुस्तीला विलंब होत असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.