शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

महिनाभरातील धक्कादायक वास्तव : आॅक्सिजनचा तुटवडा, निधी मंजूर होऊनही मिळेना मुहूर्त जिल्हा रुग्णालयात ५५ अर्भकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:11 IST

जिल्हा शासकीय रुग्णालयात विविध कारणांसाठी दाखल असलेल्या नवजात अर्भकांपैकी तब्बल ५५ अर्भकांचा एका महिन्यातच मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. इनक्युबेटरसह अन्य सुविधा अपुºया असल्याने हा प्रकार घडल्याचे उघड झाले आहे.

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात विविध कारणांसाठी दाखल असलेल्या नवजात अर्भकांपैकी तब्बल ५५ अर्भकांचा एका महिन्यातच मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. इनक्युबेटरसह अन्य सुविधा अपुºया असल्याने हा प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. महाराष्टÑाचे गोरखपूर ठरावे अशी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.मुळात अठरा ‘वॉर्मर’ठेवण्याची क्षमता असलेल्या विशेष नवजात शिशू दक्षता विभागात उपचारासाठी साडेतीनशे अर्भके आॅगस्टमध्ये दाखल झाली होती. त्यापैकी ५५ बालकांचा श्वास ‘व्हेंटिलेटर’अभावी थांबल्याचा प्रकार समोर आला आहे.नाशिकचे जिल्हा शासकीय रुग्णालय श्रेणी दोनमध्ये समाविष्ट असल्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार या रुग्णालयात ‘टर्शरी केअर सेंटर’ नसल्यामुळे आॅक्सिजनची गरज भासणाºया नवजात शिशुंना व्हेंटिलेटरसह तज्ज्ञ डॉक्टरदेखील पुरविणे शक्य होत नाही. यामुळे अखेरच्या टप्प्यात धोक्याची पातळी ओलांडलेल्या गंभीर शिशुंचा आॅक्सिजनअभावी मृत्यू होत असल्याचे रुग्णालयाच्या प्रशासनाने क बूल केले. २९१ बालकांचा जीव वाचविण्यास प्रशासनाला यश आले असून, सध्या ५२ अर्भकांवर उपचार सुरू आहेत. सरकारी यंत्रणेने याबाबत हतबलता व्यक्त केली आहे. विशेष नवजात शिशू दक्षता विभागाच्या विस्तारासाठी मंजूर असलेल्या नूतन इमारतीकरिता शासनाने २१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध क रून दिला आहे; मात्र अद्याप जिल्हा रुग्णालयाच्या आवारात केवळ बोटावर मोजण्याइतक्या झाडांच्या अडथळ्यामुळे पाच मजली इमारतीच्या भूमिपूजनाला मुहूर्त लाभत नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले. महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीकडून गुलमोहरसारख्या पर्यावरणपूरक नसलेल्या वृक्षतोडीला परवानगी दिली जात नसल्यामुळे नवजात शिशू दक्षता विभागाच्या विस्तारासह त्या विभागातील ‘वॉर्मर’ची संख्या वाढविण्यास अडथळा येत असल्याचे जगदाळे म्हणाले. ‘इन्क्युबेटर’ कालबाह्य होऊन ‘वॉॅर्मर’ हे अपुºया वाढीचे जन्माला आलेल्या अद्ययावत वैद्यकीय आधुनिक यंत्र नवजात शिशुंसाठी उपलब्ध झाले आहे. अत्यवस्थ अर्भकांचे प्रमाण लक्षात घेता किमान ४४ वॉर्मर आणि प्रत्येकी ‘वार्मर’मागे एक अशा ४४ परिचारिकांची गरज आहे. निर्देशानुसार एका वॉर्मरवर एक अर्भक उपचारासाठी आवश्यक आहे; मात्र वॉर्मरची संख्या अपुरी आणि ते हाताळण्यासाठी मनुष्यबळही अपुरे असल्यामुळे सध्या रुग्णालयात १८ वॉर्मरवर विभागाची भिस्त अवलंबून आहे, सदर बाबीला व्यवस्थापनानेही दुजोरा दिला आहे. नवजात शिशु दक्षता विभागात एप्रिल महिन्यापासून आॅगस्ट अखेर दीड हजार नवजात शिशूंना दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान १८७ शिशूंना जीव गमवावा लागला. सर्वाधिक मृत्यू आॅगस्ट महिन्यात झाले.