शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
4
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
5
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
6
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
7
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
8
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
9
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
10
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
11
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
12
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
13
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
14
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
15
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
16
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
17
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
18
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
19
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
20
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 

जिल्हा परिषद मार्गावर वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:16 IST

नाशिक : शहरातील विविध भागात वेगवेगळ्या कामांसाठी रस्ते खोदल्यामुळे या परिसरामध्ये धुळीचे साम्राज्य पसरले आहे. वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ ...

नाशिक : शहरातील विविध भागात वेगवेगळ्या कामांसाठी रस्ते खोदल्यामुळे या परिसरामध्ये धुळीचे साम्राज्य पसरले आहे. वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने दुचाकीस्वारांना त्याचा अधिक त्रास सहन करावा लागतो. धुळीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

यात्रोत्सव रद्द झाल्याने नाराजी

नाशिक : नाशिकरोड येथे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात होणारा बाल येशु यात्रोत्सव यावर्षी कोरोनामुळे रद्द झाल्याने अनेक व्यावसायिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. दरवर्षी या यात्रोत्सवात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. यावर्षी मात्र यात्रोत्सव रद्द करण्यात आला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

नेहरू नगरमधील सदनिकांची दुरवस्था

नाशिक : प्रेस कामगारांची वसाहत म्हणून प्रसिद्ध असलेल्या नेहरू नगर वसाहतीमधील अनेक सदनिका रिकाम्या असून, या सदनिकांची दुरवस्था झाली आहे. परिसरात नागरिकांचा वावर कमी झाल्याने संपूर्ण वसाहतीला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक सदनिकांच्या दार खिडक्यांची मोडतोड झाली आहे.

कॅनॉल रोडवर अंधाराचे साम्राज्य

नाशिक : कॅनॉल रोडवरील अनेक पथदीप बंद असल्यामुळे या मार्गावर रात्रीच्यावेळी ठिकठिकाणी अंधाराजे साम्राज्य पसरते. या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते, तसेच झोपडपट्टीतील नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात वावर असतो. अंधारामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, तसेच अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. येथील पथदीप सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.

फिजिकल डिस्टसिंगकडे दुर्लक्ष

नाशिक : येथील बाजार समितीमध्ये सायंकाळच्यावेळी होणाऱ्या गर्दीमुळे फिजिकल डिस्टसिंगच्या नियमाचा फज्जा उन्हाळा असून, अनेकांचे मास्क वापराकडेही दुर्लक्ष होत असल्याने कोरोनाचा प्रार्दुभाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. माल विक्रीसाठी समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांनी तोंडाला मास्क लावावा, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पंडित कॉलनीत पायी चालणेही मुस्कील

नाशिक :पंडित कॉलनीत रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे या रस्त्यावरून पायी चालणेही कठीण झाले आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या परिसरातील व्यावसायिकांना याबाबत समज देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

वीज वितरण कंपनीबाबत नाराजी

नाशिक : राज्य वीज वितरण कंपनीने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. थकबाकी भरण्यास काही सवलत देण्यात यावी व वीज पुरवठा खंडित करू नये, अशी मागणी करण्यात येत आहे.