शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

वाहतूक कोंडीने  येवलेकर हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:18 IST

स्वच्छ शहर, सुंदर शहर, येवला शहर ही संकल्पना कागदावरच राहिली आहे. पण ट्रॅफिक जॅमचे शहर म्हणून ओळख व्हायला सुरु वात झाली आहे. येथील नगर-मनमाड रस्त्यावर येवला-विंचूर चौफुलीसह फत्तेबुरुज नाका, गंगा दरवाजा भागात चौफुलीवर सध्या कायम वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

येवला : स्वच्छ शहर, सुंदर शहर, येवला शहर ही संकल्पना कागदावरच राहिली आहे. पण ट्रॅफिक जॅमचे शहर म्हणून ओळख व्हायला सुरु वात झाली आहे. येथील नगर-मनमाड रस्त्यावर येवला-विंचूर चौफुलीसह फत्तेबुरुज नाका, गंगा दरवाजा भागात चौफुलीवर सध्या कायम वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अभावानेच पोलीस या ठिकाणी आढळतात. कोणीही यावं आणि कशीही गाडी रस्त्यावरून न्यावी. नगर- मनमाड राज्यमार्गावर येवला-विंचूर चौफुली या भागातून शहरात येण्यासाठी असलेला मार्ग सध्या सर्व्हे नंबर ३८०७ व ३९०९ या भागात गेल्या साडेतीन वर्षांपासून शॉपिंग सेंटरचे काम चालू असल्याने या भागातून शहराशी अनेकदा संपर्क तुटतो. त्याला पर्यायी मार्ग म्हणून लक्कडकोट देवी मार्गापासून वाहतूक वळविण्यात आली आहे. येवला-विंचूर चौफुली या भागातून नाशिक, नगर, औरंगाबाद, धुळे या चारही जिल्ह्यांतील वाहने जात असतात. सध्या तर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. नगर व औरंगाबाद येथून नाशिकला जाणारी वाहने जाताना वाहनचालकांना शहरात लावलेल्या या अभिनंदनाच्या फलकाचा अडथळा येत असल्याने नाशिक रस्त्याकडे कसे वळावे हेच समजत नाही. वाहतूक करणाऱ्या गाड्या येथे उभ्या राहतात. अनेकदा मोठ्या गाड्यांना वळणदेखील घेता येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. शहरातील या तीनही चौफुलींवर वाहतूक पोलीस २४ तास आवश्यक आहे. येथे पोलीस चौकी असून नसल्यासारखी आहे. येवला-विंचूर चौफुलीवर वाहनचालकास खाली उतरून वाहतूक नियमन करावे लागते व स्वत:सह आपल्या वाहनाची सुटका करून घ्यावी लागते, असे चित्र अनेक वेळा पहावयास मिळते. येवला-विंचूर चौफुलीवर सिग्नलची अत्यंत आवश्यकता आहे. या चौफुलीवर मध्यभागी पोलिसांना वाहतूक नियमन करण्यासाठी शेड नाही. त्यामुळे पोलीसदेखील याठिकाणी वाहतूक नियमनासाठी उभा राहू शकत नाही, पण याचा विचार कधी झाला नाही. शहरात अनेक समाजसेवी संस्था आहेत, त्यांच्या सहकार्याने शेड तयार करता येऊ शकते. या साºया वाहतुकीच्या कोंडीतून व अडथळ्यांमधून येवलेकरांची सुटका कोण करील? याच्या प्रतीक्षेत नागरिक  आहेत.सीसीटीव्ही बंदरायगड ग्रुपच्या माध्यमातून सुमारे ६० हजार रु पये खर्च करून अद्ययावत अशी हाय डेफिनेशन व नाइटव्हिजन कॅमेरायुक्त सीसीटीव्ही यंत्रणा विंचूर चौफुलीवर शहर पोलिसांना उभारून दिली. या यंत्रणेचा लाभ गुन्हे तपासासाठी होणार असला तरी काहींची या सीसीटीव्ही कॅमेºयांवर नजर आहे, या विचारानेच अवसान गळायचे. ही यंत्रणा सध्या पूर्णपणे बंद असल्याची माहिती आहे. शिवाय येवला-विंचूर चौफुलीसह पारेगाव रस्त्याच्या वळण मार्गावर वाहतूक सिग्नल बसवावेत, अशी अनेक दिवसांची मागणी आहे. या सिग्नलसाठी कोणी प्रायोजक होऊन निरपराध लोकांचे अपघातात जाणारे बळी थांबतील अशी अशा येवलेकरांना आहे. शहराबाहेरून बायपास काढण्याच्या हालचाली झाल्यात, परंतु येवल्यात अडथळा आणणारे कमी नाहीत. तांत्रिक मुद्दे उपस्थित करून एखादे काम कसे लांबणीवर टाकायचे याबाबत माहीर असणाºया काही धुरिणांनी हे काम लांबविले आहे. आता येवल्याला मंत्रिपद नाही, त्यामुळे हा प्रश्न काही तत्काळ सुटण्यासारखा नाही. केवळ ट्रॅफिक सिग्नल, २४ तास वाहतूक पोलीस यामुळे फरक पडेल.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी