शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक कोंडीने  येवलेकर हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:18 IST

स्वच्छ शहर, सुंदर शहर, येवला शहर ही संकल्पना कागदावरच राहिली आहे. पण ट्रॅफिक जॅमचे शहर म्हणून ओळख व्हायला सुरु वात झाली आहे. येथील नगर-मनमाड रस्त्यावर येवला-विंचूर चौफुलीसह फत्तेबुरुज नाका, गंगा दरवाजा भागात चौफुलीवर सध्या कायम वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

येवला : स्वच्छ शहर, सुंदर शहर, येवला शहर ही संकल्पना कागदावरच राहिली आहे. पण ट्रॅफिक जॅमचे शहर म्हणून ओळख व्हायला सुरु वात झाली आहे. येथील नगर-मनमाड रस्त्यावर येवला-विंचूर चौफुलीसह फत्तेबुरुज नाका, गंगा दरवाजा भागात चौफुलीवर सध्या कायम वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अभावानेच पोलीस या ठिकाणी आढळतात. कोणीही यावं आणि कशीही गाडी रस्त्यावरून न्यावी. नगर- मनमाड राज्यमार्गावर येवला-विंचूर चौफुली या भागातून शहरात येण्यासाठी असलेला मार्ग सध्या सर्व्हे नंबर ३८०७ व ३९०९ या भागात गेल्या साडेतीन वर्षांपासून शॉपिंग सेंटरचे काम चालू असल्याने या भागातून शहराशी अनेकदा संपर्क तुटतो. त्याला पर्यायी मार्ग म्हणून लक्कडकोट देवी मार्गापासून वाहतूक वळविण्यात आली आहे. येवला-विंचूर चौफुली या भागातून नाशिक, नगर, औरंगाबाद, धुळे या चारही जिल्ह्यांतील वाहने जात असतात. सध्या तर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. नगर व औरंगाबाद येथून नाशिकला जाणारी वाहने जाताना वाहनचालकांना शहरात लावलेल्या या अभिनंदनाच्या फलकाचा अडथळा येत असल्याने नाशिक रस्त्याकडे कसे वळावे हेच समजत नाही. वाहतूक करणाऱ्या गाड्या येथे उभ्या राहतात. अनेकदा मोठ्या गाड्यांना वळणदेखील घेता येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. शहरातील या तीनही चौफुलींवर वाहतूक पोलीस २४ तास आवश्यक आहे. येथे पोलीस चौकी असून नसल्यासारखी आहे. येवला-विंचूर चौफुलीवर वाहनचालकास खाली उतरून वाहतूक नियमन करावे लागते व स्वत:सह आपल्या वाहनाची सुटका करून घ्यावी लागते, असे चित्र अनेक वेळा पहावयास मिळते. येवला-विंचूर चौफुलीवर सिग्नलची अत्यंत आवश्यकता आहे. या चौफुलीवर मध्यभागी पोलिसांना वाहतूक नियमन करण्यासाठी शेड नाही. त्यामुळे पोलीसदेखील याठिकाणी वाहतूक नियमनासाठी उभा राहू शकत नाही, पण याचा विचार कधी झाला नाही. शहरात अनेक समाजसेवी संस्था आहेत, त्यांच्या सहकार्याने शेड तयार करता येऊ शकते. या साºया वाहतुकीच्या कोंडीतून व अडथळ्यांमधून येवलेकरांची सुटका कोण करील? याच्या प्रतीक्षेत नागरिक  आहेत.सीसीटीव्ही बंदरायगड ग्रुपच्या माध्यमातून सुमारे ६० हजार रु पये खर्च करून अद्ययावत अशी हाय डेफिनेशन व नाइटव्हिजन कॅमेरायुक्त सीसीटीव्ही यंत्रणा विंचूर चौफुलीवर शहर पोलिसांना उभारून दिली. या यंत्रणेचा लाभ गुन्हे तपासासाठी होणार असला तरी काहींची या सीसीटीव्ही कॅमेºयांवर नजर आहे, या विचारानेच अवसान गळायचे. ही यंत्रणा सध्या पूर्णपणे बंद असल्याची माहिती आहे. शिवाय येवला-विंचूर चौफुलीसह पारेगाव रस्त्याच्या वळण मार्गावर वाहतूक सिग्नल बसवावेत, अशी अनेक दिवसांची मागणी आहे. या सिग्नलसाठी कोणी प्रायोजक होऊन निरपराध लोकांचे अपघातात जाणारे बळी थांबतील अशी अशा येवलेकरांना आहे. शहराबाहेरून बायपास काढण्याच्या हालचाली झाल्यात, परंतु येवल्यात अडथळा आणणारे कमी नाहीत. तांत्रिक मुद्दे उपस्थित करून एखादे काम कसे लांबणीवर टाकायचे याबाबत माहीर असणाºया काही धुरिणांनी हे काम लांबविले आहे. आता येवल्याला मंत्रिपद नाही, त्यामुळे हा प्रश्न काही तत्काळ सुटण्यासारखा नाही. केवळ ट्रॅफिक सिग्नल, २४ तास वाहतूक पोलीस यामुळे फरक पडेल.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी