शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक कोंडीने  येवलेकर हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:18 IST

स्वच्छ शहर, सुंदर शहर, येवला शहर ही संकल्पना कागदावरच राहिली आहे. पण ट्रॅफिक जॅमचे शहर म्हणून ओळख व्हायला सुरु वात झाली आहे. येथील नगर-मनमाड रस्त्यावर येवला-विंचूर चौफुलीसह फत्तेबुरुज नाका, गंगा दरवाजा भागात चौफुलीवर सध्या कायम वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

येवला : स्वच्छ शहर, सुंदर शहर, येवला शहर ही संकल्पना कागदावरच राहिली आहे. पण ट्रॅफिक जॅमचे शहर म्हणून ओळख व्हायला सुरु वात झाली आहे. येथील नगर-मनमाड रस्त्यावर येवला-विंचूर चौफुलीसह फत्तेबुरुज नाका, गंगा दरवाजा भागात चौफुलीवर सध्या कायम वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अभावानेच पोलीस या ठिकाणी आढळतात. कोणीही यावं आणि कशीही गाडी रस्त्यावरून न्यावी. नगर- मनमाड राज्यमार्गावर येवला-विंचूर चौफुली या भागातून शहरात येण्यासाठी असलेला मार्ग सध्या सर्व्हे नंबर ३८०७ व ३९०९ या भागात गेल्या साडेतीन वर्षांपासून शॉपिंग सेंटरचे काम चालू असल्याने या भागातून शहराशी अनेकदा संपर्क तुटतो. त्याला पर्यायी मार्ग म्हणून लक्कडकोट देवी मार्गापासून वाहतूक वळविण्यात आली आहे. येवला-विंचूर चौफुली या भागातून नाशिक, नगर, औरंगाबाद, धुळे या चारही जिल्ह्यांतील वाहने जात असतात. सध्या तर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. नगर व औरंगाबाद येथून नाशिकला जाणारी वाहने जाताना वाहनचालकांना शहरात लावलेल्या या अभिनंदनाच्या फलकाचा अडथळा येत असल्याने नाशिक रस्त्याकडे कसे वळावे हेच समजत नाही. वाहतूक करणाऱ्या गाड्या येथे उभ्या राहतात. अनेकदा मोठ्या गाड्यांना वळणदेखील घेता येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. शहरातील या तीनही चौफुलींवर वाहतूक पोलीस २४ तास आवश्यक आहे. येथे पोलीस चौकी असून नसल्यासारखी आहे. येवला-विंचूर चौफुलीवर वाहनचालकास खाली उतरून वाहतूक नियमन करावे लागते व स्वत:सह आपल्या वाहनाची सुटका करून घ्यावी लागते, असे चित्र अनेक वेळा पहावयास मिळते. येवला-विंचूर चौफुलीवर सिग्नलची अत्यंत आवश्यकता आहे. या चौफुलीवर मध्यभागी पोलिसांना वाहतूक नियमन करण्यासाठी शेड नाही. त्यामुळे पोलीसदेखील याठिकाणी वाहतूक नियमनासाठी उभा राहू शकत नाही, पण याचा विचार कधी झाला नाही. शहरात अनेक समाजसेवी संस्था आहेत, त्यांच्या सहकार्याने शेड तयार करता येऊ शकते. या साºया वाहतुकीच्या कोंडीतून व अडथळ्यांमधून येवलेकरांची सुटका कोण करील? याच्या प्रतीक्षेत नागरिक  आहेत.सीसीटीव्ही बंदरायगड ग्रुपच्या माध्यमातून सुमारे ६० हजार रु पये खर्च करून अद्ययावत अशी हाय डेफिनेशन व नाइटव्हिजन कॅमेरायुक्त सीसीटीव्ही यंत्रणा विंचूर चौफुलीवर शहर पोलिसांना उभारून दिली. या यंत्रणेचा लाभ गुन्हे तपासासाठी होणार असला तरी काहींची या सीसीटीव्ही कॅमेºयांवर नजर आहे, या विचारानेच अवसान गळायचे. ही यंत्रणा सध्या पूर्णपणे बंद असल्याची माहिती आहे. शिवाय येवला-विंचूर चौफुलीसह पारेगाव रस्त्याच्या वळण मार्गावर वाहतूक सिग्नल बसवावेत, अशी अनेक दिवसांची मागणी आहे. या सिग्नलसाठी कोणी प्रायोजक होऊन निरपराध लोकांचे अपघातात जाणारे बळी थांबतील अशी अशा येवलेकरांना आहे. शहराबाहेरून बायपास काढण्याच्या हालचाली झाल्यात, परंतु येवल्यात अडथळा आणणारे कमी नाहीत. तांत्रिक मुद्दे उपस्थित करून एखादे काम कसे लांबणीवर टाकायचे याबाबत माहीर असणाºया काही धुरिणांनी हे काम लांबविले आहे. आता येवल्याला मंत्रिपद नाही, त्यामुळे हा प्रश्न काही तत्काळ सुटण्यासारखा नाही. केवळ ट्रॅफिक सिग्नल, २४ तास वाहतूक पोलीस यामुळे फरक पडेल.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी